शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

बारावीनंतर विद्यार्थ्यांना ४३ हजारांचा भत्ता ! पं. दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना माहिती आहे का?

By राम शिनगारे | Updated: November 17, 2023 20:20 IST

काय आहे पं. दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना ?

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षांपासून बारावीनंतर मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या, परंतु शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना’ अंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात येत आहे.

काय आहे पं. दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना ?आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याबाबत तरतूद केलेली आहे. २ मार्च २०१९च्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णयानुसार अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजना धनगर समाजासाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही योजना धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

जिल्ह्यांच्या ठिकाणी ४३ हजारांचा भत्ता

भोजन भत्ता २५ हजार : विद्यार्थ्यांना भोजन भत्ता म्हणून वर्षाकाठी २५ हजार रुपयांची रक्कम थेट बँक खात्यात दिली जाते.निवास भत्ता १२ हजार : विद्यार्थ्यांना राहण्यासाठी १२ हजार रुपये प्रतिवर्षी देण्यात येतात.निर्वाह भत्ता सहा हजार : निर्वाह भत्ता सहा हजार रुपये देण्यात येतो. मात्र, महापालिका किंवा महसुली विभागीय शहरांमध्ये ही रक्कम वाढीव आहे.

कोणाला मिळणार लाभ ?बारावीनंतर मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या; परंतु शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

कागदपत्रे काय लागणार ?बारावीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेले असावेत, एकाचवेळी योजनेचा लाभ घेता येईल. मान्यताप्राप्त महाविद्यालय, संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला असावा, योजनेंतर्गत लाभासाठी विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती ६० टक्के असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नसावे.

अर्ज कोठे करायचा ?योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी व संस्थेने महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण