शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय रास्तारोको

By बापू सोळुंके | Updated: November 18, 2023 19:18 IST

यासोबतच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये मराठवाड्याची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क् परिषदेने अर्ज दाखल केले

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरले आहे, यापार्श्वभूमीवर येथील जनतेच्या संतप्त भावनांचा आता उद्रेक होत आहे. २० नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने सिंचनभवनसमोर जालना रोडवर रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल पटेल यांनी येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या पत्रकार परिषदेत दिली.

अनिल पटेल म्हणाले की,अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महसूलमंत्री विखे पाटील यांनी मराठवाड्याला पाणी न देण्याचा ठराव घेतला. अशा प्रकारे जिल्हा नियोजन समितीत ठराव घेता येत नाही, हे मंत्री विखे यांना माहिती नाही का, असा सवाल आमचा आहे. मराठवाड्यातील जनतेच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतून सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३० ऑक्टोबर रोजी घेतला. या निर्णयाविरोधात नगर आणि नाशिककरांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. या दोन्ही याचिकांमध्ये न्यायालयाने पाणी सोडण्यास स्थगिती दिलेली नाही. असे असताना केवळ नगर आणि  नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या दबावापुढे पाणी मिळू शकले नाही.

यामुळे आम्ही आता मराठवाडा पाणी जनआंदोलन उभारले आहे. २० नोव्हेंबर रोजी सिंचन भवनसमोर सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आंदाेलनात माजीमंत्री राजेश टोपे, विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्यासह, सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते सहभागी होणार आहेत. यासोबतच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये मराठवाड्याची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क् परिषदेने अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आ. डॉ.कल्याण काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा, शहर काँग्रेस अध्यक्ष शेख युसूफ, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास भुमरे,  शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, पांडुरंग तांगडे, व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, प्रा.आर.एम.दमगिर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण