शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय रास्तारोको

By बापू सोळुंके | Updated: November 18, 2023 19:18 IST

यासोबतच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये मराठवाड्याची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क् परिषदेने अर्ज दाखल केले

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरले आहे, यापार्श्वभूमीवर येथील जनतेच्या संतप्त भावनांचा आता उद्रेक होत आहे. २० नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने सिंचनभवनसमोर जालना रोडवर रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल पटेल यांनी येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या पत्रकार परिषदेत दिली.

अनिल पटेल म्हणाले की,अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महसूलमंत्री विखे पाटील यांनी मराठवाड्याला पाणी न देण्याचा ठराव घेतला. अशा प्रकारे जिल्हा नियोजन समितीत ठराव घेता येत नाही, हे मंत्री विखे यांना माहिती नाही का, असा सवाल आमचा आहे. मराठवाड्यातील जनतेच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतून सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३० ऑक्टोबर रोजी घेतला. या निर्णयाविरोधात नगर आणि नाशिककरांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. या दोन्ही याचिकांमध्ये न्यायालयाने पाणी सोडण्यास स्थगिती दिलेली नाही. असे असताना केवळ नगर आणि  नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या दबावापुढे पाणी मिळू शकले नाही.

यामुळे आम्ही आता मराठवाडा पाणी जनआंदोलन उभारले आहे. २० नोव्हेंबर रोजी सिंचन भवनसमोर सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आंदाेलनात माजीमंत्री राजेश टोपे, विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्यासह, सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते सहभागी होणार आहेत. यासोबतच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये मराठवाड्याची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क् परिषदेने अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आ. डॉ.कल्याण काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा, शहर काँग्रेस अध्यक्ष शेख युसूफ, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास भुमरे,  शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, पांडुरंग तांगडे, व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, प्रा.आर.एम.दमगिर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण