शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय रास्तारोको

By बापू सोळुंके | Updated: November 18, 2023 19:18 IST

यासोबतच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये मराठवाड्याची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क् परिषदेने अर्ज दाखल केले

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरले आहे, यापार्श्वभूमीवर येथील जनतेच्या संतप्त भावनांचा आता उद्रेक होत आहे. २० नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने सिंचनभवनसमोर जालना रोडवर रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल पटेल यांनी येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या पत्रकार परिषदेत दिली.

अनिल पटेल म्हणाले की,अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महसूलमंत्री विखे पाटील यांनी मराठवाड्याला पाणी न देण्याचा ठराव घेतला. अशा प्रकारे जिल्हा नियोजन समितीत ठराव घेता येत नाही, हे मंत्री विखे यांना माहिती नाही का, असा सवाल आमचा आहे. मराठवाड्यातील जनतेच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतून सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३० ऑक्टोबर रोजी घेतला. या निर्णयाविरोधात नगर आणि नाशिककरांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. या दोन्ही याचिकांमध्ये न्यायालयाने पाणी सोडण्यास स्थगिती दिलेली नाही. असे असताना केवळ नगर आणि  नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या दबावापुढे पाणी मिळू शकले नाही.

यामुळे आम्ही आता मराठवाडा पाणी जनआंदोलन उभारले आहे. २० नोव्हेंबर रोजी सिंचन भवनसमोर सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आंदाेलनात माजीमंत्री राजेश टोपे, विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्यासह, सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते सहभागी होणार आहेत. यासोबतच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये मराठवाड्याची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क् परिषदेने अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आ. डॉ.कल्याण काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा, शहर काँग्रेस अध्यक्ष शेख युसूफ, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास भुमरे,  शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, पांडुरंग तांगडे, व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, प्रा.आर.एम.दमगिर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण