शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

चाळीस आमदारांसाठी अख्खा महाराष्ट्र वेठीस, जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

By स. सो. खंडाळकर | Updated: September 19, 2022 18:13 IST

हे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. त्यांच्यात सोबत गेलेल्या लोकांमध्ये हळूहळू नाराजी उघड होत आहे

औरंगाबाद - राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष फक्त त्यांच्या सोबत असलेल्या चाळीस आमदारांच्या मतदार संघाकडे आहे. त्यामुळे उर्वरित मतदार संघांकडे दुर्लक्ष होत आहे. तर सध्या आमच्यावर टीका करताना त्यांना कोणीतरी ते लिहून देत आहे आणि त्यांचा गुलाम त्याच्या व्यतिरिक्त काही बोलणार नसेल तर मजा येणार नाही अशी टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

नुकतीच माहिती समोर आली आहे की भाजपचे काही लोक शिंदे गटात शमील झाले. त्यामुळे भाजपने सतर्क राहण्याची गरज आहे. तर उपमुख्यमंत्री यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र झालं उलट त्यामुळें ते नाराज आहेत. त्यांची एकदा भाजपची गणित जुळली तर ते सरकार बरखास्त करतील त्यावेळी एकनाथ शिंदे यांना तिकडे गेल्याची चूक लक्षात येईल असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. 

मुख्यमंत्री नुसत्या मोठ्या घोषणा करत आहे. त्यांच्यासोबत असलेल्या 40 आमदारांच्या मतदारसंघात नुसतं लक्ष देऊन उर्वरित 248 मतदार संघाच्या तोंडाला पाणी पुसणार आहात का? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. हे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. त्यांच्यात सोबत गेलेल्या लोकांमध्ये हळूहळू नाराजी उघड होत आहे, असेही ते म्हणाले. 

महाविकास आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरराज्यात महाविकास आघाडीनुसार निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. मात्र स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्याचा ठरवण्यात आला आहे. आमच्या स्थानिक नेत्यांनी इतर दोन पक्षांशी चर्चा करून स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू ठेवायचा का? याबाबत निर्णय घ्यावा असा सूचना देण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेJayant Patilजयंत पाटील