शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

वाळूजला नळांद्वारे येतेय अळ्यांयुक्त दूषित पाणी

By admin | Updated: May 28, 2014 01:14 IST

वाळूज महानगर : वाळूज भागाला अळ्यांयुक्त दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वाळूज महानगर : वाळूज भागाला अळ्यांयुक्त दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाळूजवासीयांना आठवड्यातून एकदा पाणी मिळते तेही अपुरे. काही खाजगी कंपन्या नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेत असल्या तरी त्यात गावातील काही वरिष्ठ मंडळी आडकाठी आणत आहेत. त्यामुळे नागरिकांना घागरभर पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. नळांद्वारे येणार्‍या पाण्यात अळ्या व केरकचरा येत असून पाण्याला उग्र वासही आहे. दूषित पाण्याची तक्रार देण्यासाठी नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर गेले असता ते बंद होते. त्यांनी सरपंच रंजना भोंड यांना दूषित पाणी येत असल्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ पाहणी करून दूषित पाणीपुरवठा बंद करण्यास सांगितले. तरीही नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दोष जलशुद्धी केंद्रात गावाला एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. नळाच्या पाण्यात अळ्या व केरकचरा येत असल्याने हे पाणी बंद करून स्वच्छ पाणी सोडण्यास सांगितले आहे. यात ग्रामपंचायतीचा दोष नसून एमआयडीसीचा आहे. यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली असून, त्यांनी दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे. बहुतेक एमआयडीसीच्या जलशुद्धी केंद्रातच दोष असून शकतो, असे वाळूजच्या सरपंच रंजना भोंड यांनी सांगितले. (लोकमत ब्युरो) ग्रा.पं.चे दुर्लक्ष पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नळाद्वारे येणार्‍या पाण्यात अळ्या व कचरा असून दुर्गंधीही येत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत अनेक वेळा सांगूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. -संदीप पठारे, रहिवासी आरोग्याला धोका आठवड्यातून एकदा पाणी मिळते; पण ते अळ्यायुक्त व दूषित असते. पाणीटंचाई व ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आम्हाला दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यातून आजार पसरण्याची शक्यता आहे. -नदीम झुमरवाला, रहिवासी