शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणात केवळ ४ टक्केच जलसाठा, गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाण्याची तूट

By बापू सोळुंके | Updated: July 26, 2024 19:37 IST

पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिने उलटले तरी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात उर्ध्वभागातून पाण्याची आवक झालेली नाही.

छत्रपती संभाजीनगर :गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत जायकवाडी प्रकल्पात २४ टक्के पाण्याची तूट आहे. आज केवळ या जलाशयात ४.२२ टक्के जिवंत जलसाठा उरला आहे. यामुळे उरलेल्या पावसाच्या दिवसात जायकवाडी धरण १०० टक्के भरेल का याची चिंता प्रशासनाला आहे. 

पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिने उलटले तरी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात उर्ध्वभागातून पाण्याची आवक झालेली नाही. परिणामी जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा वाढलेला नाही. गतवर्षी मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती होती. मात्र जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भाग असलेल्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याने २६ जुलैपर्यंत जायकवाडी धरणांत २७.९३ टक्के पाणी जमा झालेले होते.यावर्षी मात्र आतापर्यंत मराठवाड्याकडे जशी पावसाने पाठ फिरवली, तशीच अवस्था अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या बेसीन एरियात आहे. मुख्यत: जायकवाडी प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरातून पाण्याची आवक होते. यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा प्रकल्प भरल्यानंतर गोदापात्रा पाणी येते. 

मात्र जायकवाडीच्या उर्ध्वभागातही आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही. जायकवाडीत उर्ध्वभागातून पाण्याची आवक नसल्याने जायकवाडीचा जलसाठा वाढलेला नाही. आज शुक्रवारी जायकवाडी प्रकल्पात केवळ ४.२२ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या दिवशी २७.९३ टक्के पाणी या प्रकल्पात होते. पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीत जायकवाडी प्रकल्प शंभर टक्के भरेल का, याची चिंता प्रशासनासह शेतकऱ्यांना लागली आहे.

जायकवाडी प्रकल्पावर १ लाख ८० हजार हेक्टर सिंचनक्षमताजायकवाडी प्रकल्पावर मराठवाड्यातील सुमारे १लाख८० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट होते. यात डाव्या कालव्यावर १लाख ४० हजार हेक्टर तर उजव्या कालव्यावर४० हजार हेक्टरचा समावेश होता. मात्र, गतवर्षी ५६ टक्केच जलसंचय जायकवाडी प्रकल्पात झाला होता. यामुळे निदान खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना गतवर्षी पाणी देण्यात आले होते. यावर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत किती पाणीसाठा होतो, यावरच पुढील आवर्तने ठरणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी