शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

जायकवाडी धरणात केवळ ४ टक्केच जलसाठा, गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाण्याची तूट

By बापू सोळुंके | Updated: July 26, 2024 19:37 IST

पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिने उलटले तरी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात उर्ध्वभागातून पाण्याची आवक झालेली नाही.

छत्रपती संभाजीनगर :गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत जायकवाडी प्रकल्पात २४ टक्के पाण्याची तूट आहे. आज केवळ या जलाशयात ४.२२ टक्के जिवंत जलसाठा उरला आहे. यामुळे उरलेल्या पावसाच्या दिवसात जायकवाडी धरण १०० टक्के भरेल का याची चिंता प्रशासनाला आहे. 

पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिने उलटले तरी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात उर्ध्वभागातून पाण्याची आवक झालेली नाही. परिणामी जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा वाढलेला नाही. गतवर्षी मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती होती. मात्र जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भाग असलेल्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याने २६ जुलैपर्यंत जायकवाडी धरणांत २७.९३ टक्के पाणी जमा झालेले होते.यावर्षी मात्र आतापर्यंत मराठवाड्याकडे जशी पावसाने पाठ फिरवली, तशीच अवस्था अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या बेसीन एरियात आहे. मुख्यत: जायकवाडी प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरातून पाण्याची आवक होते. यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा प्रकल्प भरल्यानंतर गोदापात्रा पाणी येते. 

मात्र जायकवाडीच्या उर्ध्वभागातही आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही. जायकवाडीत उर्ध्वभागातून पाण्याची आवक नसल्याने जायकवाडीचा जलसाठा वाढलेला नाही. आज शुक्रवारी जायकवाडी प्रकल्पात केवळ ४.२२ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या दिवशी २७.९३ टक्के पाणी या प्रकल्पात होते. पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीत जायकवाडी प्रकल्प शंभर टक्के भरेल का, याची चिंता प्रशासनासह शेतकऱ्यांना लागली आहे.

जायकवाडी प्रकल्पावर १ लाख ८० हजार हेक्टर सिंचनक्षमताजायकवाडी प्रकल्पावर मराठवाड्यातील सुमारे १लाख८० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट होते. यात डाव्या कालव्यावर १लाख ४० हजार हेक्टर तर उजव्या कालव्यावर४० हजार हेक्टरचा समावेश होता. मात्र, गतवर्षी ५६ टक्केच जलसंचय जायकवाडी प्रकल्पात झाला होता. यामुळे निदान खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना गतवर्षी पाणी देण्यात आले होते. यावर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत किती पाणीसाठा होतो, यावरच पुढील आवर्तने ठरणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी