शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वेरूळ, अजिंठा लेण्यांच्या सुरक्षेचे ग्रामीण पोलिसांकडून ऑडिट; पुरातत्त्व, वनविभागाला सूचना

By राम शिनगारे | Updated: January 5, 2023 18:35 IST

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा जोरदार तयारी करीत आहेत.

औरंगाबाद : ग्रामीण पोलिसांनी जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा येथील लेण्यांचे सुरक्षा ऑडिट केले आहे. या ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना केंद्रीय पुरातत्त्व, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली.

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा जोरदार तयारी करीत आहेत. परदेशातील पाहुणे शहरात आल्यानंतर जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा येथील लेण्यांना भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी पाहुण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी लेण्यांच्या सुरक्षेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केलेल्या ऑडिटमध्ये लेण्यांमध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, संरक्षक भिंत पडलेली असल्यामुळे कोठूनही नागरिक आतमध्ये येतात, तिकीट खिडकीसह लेण्यांमध्ये ठिकठिकाणी खाजगी सुरक्षारक्षकांची कमतरता दिसून आली. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, संरक्षक भिंत दुरुस्त करावी आणि खाजगी सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचना ग्रामीण पोलिसांनी केल्या. त्याशिवाय लेण्यांच्या वरील भाग हा वनविभागाच्या मालकीचा आहे. लेण्यांच्या माथ्यावर मोठ्या प्रमाणात ठिसूळ दगड आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी हे दगड लेण्याच्या समोरील भागात येऊ शकतात, असेही ग्रामीण पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वनविभागाने वरतून येणारे दगड रोखण्यासाठी जाळी बसवावी, असेही ग्रामीण पोलिसांनी वनविभागाला कळविले आहे.

वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंदोबस्तवेरुळसह अजिंठा लेण्यांच्या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांचा त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्त लावला आहे. शनिवार, रविवारच्या दिवशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या दिवशी पोलिस ठाणे व वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिसही तैनात केले जातात, अशी माहिती अधीक्षक कलवानिया यांनी दिली.

पोलीस मदतीसाठी तत्परजगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा येथे पर्यटकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी ११२ वर संपर्क साधल्यास ग्रामीण पोलिस तत्काळ मदत करतील. काही महिन्यांपूर्वी एका परदेशी पर्यटकास फसविले होते. तेव्हा स्टेशन डायरीतील नोंदीवरून संबंधित परदेशी पर्यटकाला मायदेशी परतल्यानंतर फसवणूक झालेली दोन लाख रुपयांची रक्कम परत केली होती. त्यामुळे पर्यटकांनी कोणताही त्रास असेल, तर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा.- मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसtourismपर्यटन