शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

वेरूळ, अजिंठा लेण्यांच्या सुरक्षेचे ग्रामीण पोलिसांकडून ऑडिट; पुरातत्त्व, वनविभागाला सूचना

By राम शिनगारे | Updated: January 5, 2023 18:35 IST

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा जोरदार तयारी करीत आहेत.

औरंगाबाद : ग्रामीण पोलिसांनी जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा येथील लेण्यांचे सुरक्षा ऑडिट केले आहे. या ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना केंद्रीय पुरातत्त्व, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली.

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा जोरदार तयारी करीत आहेत. परदेशातील पाहुणे शहरात आल्यानंतर जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा येथील लेण्यांना भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी पाहुण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी लेण्यांच्या सुरक्षेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केलेल्या ऑडिटमध्ये लेण्यांमध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, संरक्षक भिंत पडलेली असल्यामुळे कोठूनही नागरिक आतमध्ये येतात, तिकीट खिडकीसह लेण्यांमध्ये ठिकठिकाणी खाजगी सुरक्षारक्षकांची कमतरता दिसून आली. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, संरक्षक भिंत दुरुस्त करावी आणि खाजगी सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचना ग्रामीण पोलिसांनी केल्या. त्याशिवाय लेण्यांच्या वरील भाग हा वनविभागाच्या मालकीचा आहे. लेण्यांच्या माथ्यावर मोठ्या प्रमाणात ठिसूळ दगड आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी हे दगड लेण्याच्या समोरील भागात येऊ शकतात, असेही ग्रामीण पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वनविभागाने वरतून येणारे दगड रोखण्यासाठी जाळी बसवावी, असेही ग्रामीण पोलिसांनी वनविभागाला कळविले आहे.

वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंदोबस्तवेरुळसह अजिंठा लेण्यांच्या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांचा त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्त लावला आहे. शनिवार, रविवारच्या दिवशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या दिवशी पोलिस ठाणे व वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिसही तैनात केले जातात, अशी माहिती अधीक्षक कलवानिया यांनी दिली.

पोलीस मदतीसाठी तत्परजगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा येथे पर्यटकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी ११२ वर संपर्क साधल्यास ग्रामीण पोलिस तत्काळ मदत करतील. काही महिन्यांपूर्वी एका परदेशी पर्यटकास फसविले होते. तेव्हा स्टेशन डायरीतील नोंदीवरून संबंधित परदेशी पर्यटकाला मायदेशी परतल्यानंतर फसवणूक झालेली दोन लाख रुपयांची रक्कम परत केली होती. त्यामुळे पर्यटकांनी कोणताही त्रास असेल, तर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा.- मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसtourismपर्यटन