शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

वेरूळ, अजिंठा लेण्यांच्या सुरक्षेचे ग्रामीण पोलिसांकडून ऑडिट; पुरातत्त्व, वनविभागाला सूचना

By राम शिनगारे | Updated: January 5, 2023 18:35 IST

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा जोरदार तयारी करीत आहेत.

औरंगाबाद : ग्रामीण पोलिसांनी जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा येथील लेण्यांचे सुरक्षा ऑडिट केले आहे. या ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना केंद्रीय पुरातत्त्व, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली.

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा जोरदार तयारी करीत आहेत. परदेशातील पाहुणे शहरात आल्यानंतर जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा येथील लेण्यांना भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी पाहुण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी लेण्यांच्या सुरक्षेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केलेल्या ऑडिटमध्ये लेण्यांमध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, संरक्षक भिंत पडलेली असल्यामुळे कोठूनही नागरिक आतमध्ये येतात, तिकीट खिडकीसह लेण्यांमध्ये ठिकठिकाणी खाजगी सुरक्षारक्षकांची कमतरता दिसून आली. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, संरक्षक भिंत दुरुस्त करावी आणि खाजगी सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचना ग्रामीण पोलिसांनी केल्या. त्याशिवाय लेण्यांच्या वरील भाग हा वनविभागाच्या मालकीचा आहे. लेण्यांच्या माथ्यावर मोठ्या प्रमाणात ठिसूळ दगड आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी हे दगड लेण्याच्या समोरील भागात येऊ शकतात, असेही ग्रामीण पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वनविभागाने वरतून येणारे दगड रोखण्यासाठी जाळी बसवावी, असेही ग्रामीण पोलिसांनी वनविभागाला कळविले आहे.

वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंदोबस्तवेरुळसह अजिंठा लेण्यांच्या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांचा त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्त लावला आहे. शनिवार, रविवारच्या दिवशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या दिवशी पोलिस ठाणे व वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिसही तैनात केले जातात, अशी माहिती अधीक्षक कलवानिया यांनी दिली.

पोलीस मदतीसाठी तत्परजगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा येथे पर्यटकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी ११२ वर संपर्क साधल्यास ग्रामीण पोलिस तत्काळ मदत करतील. काही महिन्यांपूर्वी एका परदेशी पर्यटकास फसविले होते. तेव्हा स्टेशन डायरीतील नोंदीवरून संबंधित परदेशी पर्यटकाला मायदेशी परतल्यानंतर फसवणूक झालेली दोन लाख रुपयांची रक्कम परत केली होती. त्यामुळे पर्यटकांनी कोणताही त्रास असेल, तर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा.- मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसtourismपर्यटन