शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

औरंगाबादमधील एअर इंडियाचे बुकिंग कार्यालय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 17:20 IST

जालना रोडवरील एअर इंडियाचे बुकिंग कार्यालय १ मेपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकार्यालयासाठी सोमवार (दि.३०)  हा अखेरचा दिवस ठरला. या निर्णयामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी आॅनलाईन प्रणालीचा वापर करावा लागेल

औरंगाबाद : जालना रोडवरील एअर इंडियाचे बुकिंग कार्यालय १ मेपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कार्यालयासाठी सोमवार (दि.३०)  हा अखेरचा दिवस ठरला. या निर्णयामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी आॅनलाईन प्रणालीचा वापर करावा लागेल, अथवा एअर इंडियाचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बुकिंग काऊंटर गाठावे लागेल.

एअर इंडिया कंपनीने देशभरातील विविध शहरांतील बुकिंग काऊंटर बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. यामध्ये औरंगाबाद शहरातील बुकिंग काऊंटरही बंद करण्याचा निर्णय झाला. आज प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आणि इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आहे. त्याद्वारे अवघ्या काही वेळेत विमानाचे तिकीट काढणे शक्य झाले आहे, त्यामुळे एअर इंडियाचे कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाने प्रवाशांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे म्हटले जात आहे. 

प्रथमच विमान प्रवास करणारे प्रवासी एअर इंडियाच्या कार्यालयात जाऊन आवर्जून चौकशी करीत असत; परंतु आता यापुढे एअर इंडियाचे विमानतळावरील काऊंटर, संकेतस्थळ, टोल फ्री क्रमांकाचा आधार घ्यावा लागेल. औरंगाबाद एअर इंडियाच्या कार्यालयातील बुकिंग काऊंटरची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वीच विमानतळावर नियुक्त करण्यात आले. याविषयी एअर इंडियाचे स्टेशन मॅनेजर अजय भोळे म्हणाले, वरिष्ठाकडून  आदेश प्राप्त झाले. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कामकाज चालले. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ