शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

औरंगाबादमधील एअर इंडियाचे बुकिंग कार्यालय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 17:20 IST

जालना रोडवरील एअर इंडियाचे बुकिंग कार्यालय १ मेपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकार्यालयासाठी सोमवार (दि.३०)  हा अखेरचा दिवस ठरला. या निर्णयामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी आॅनलाईन प्रणालीचा वापर करावा लागेल

औरंगाबाद : जालना रोडवरील एअर इंडियाचे बुकिंग कार्यालय १ मेपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कार्यालयासाठी सोमवार (दि.३०)  हा अखेरचा दिवस ठरला. या निर्णयामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी आॅनलाईन प्रणालीचा वापर करावा लागेल, अथवा एअर इंडियाचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बुकिंग काऊंटर गाठावे लागेल.

एअर इंडिया कंपनीने देशभरातील विविध शहरांतील बुकिंग काऊंटर बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. यामध्ये औरंगाबाद शहरातील बुकिंग काऊंटरही बंद करण्याचा निर्णय झाला. आज प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आणि इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आहे. त्याद्वारे अवघ्या काही वेळेत विमानाचे तिकीट काढणे शक्य झाले आहे, त्यामुळे एअर इंडियाचे कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाने प्रवाशांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे म्हटले जात आहे. 

प्रथमच विमान प्रवास करणारे प्रवासी एअर इंडियाच्या कार्यालयात जाऊन आवर्जून चौकशी करीत असत; परंतु आता यापुढे एअर इंडियाचे विमानतळावरील काऊंटर, संकेतस्थळ, टोल फ्री क्रमांकाचा आधार घ्यावा लागेल. औरंगाबाद एअर इंडियाच्या कार्यालयातील बुकिंग काऊंटरची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वीच विमानतळावर नियुक्त करण्यात आले. याविषयी एअर इंडियाचे स्टेशन मॅनेजर अजय भोळे म्हणाले, वरिष्ठाकडून  आदेश प्राप्त झाले. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कामकाज चालले. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ