शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अहो आश्चर्यम्... औरंगाबादेत तिहेरी रेल्वेमार्ग आहे अन् आता चौथा मार्ग प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 19:54 IST

Railway in Aurangabad राष्ट्रीय रेल्वे योजनेतील घोळ; मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे मार्गातून औरंगाबादचा पत्ता पुन्हा कट

ठळक मुद्देमराठवाड्यात वर्षानुवर्षे दुहेरीकरणाची प्रतीक्षा कागदोपत्री थेट तिहेरी रेल्वे मार्ग  दाखविण्याची किमया

औरंगाबाद : औरंगाबादेत तिहेरी रेल्वे मार्ग आहेत, हो तिहेरीच. आणि आता चौथा रेल्वे मार्गही प्रस्तावित आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण रेल्वे बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या नव्या राष्ट्रीय रेल्वे योजनेच्या (एनपीआर) मसुद्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे दुहेरीकरणाची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यात कागदोपत्री थेट तिहेरी रेल्वे मार्ग  दाखविण्याची किमया रेल्वेने केली आहे.

मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, सचिव प्रल्हाद पारटकर आणि स्वानंद सोळुंके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या मसुद्यासाठी कन्सल्टन्सीने कागदोपत्री केलेले सर्वेक्षण आणि  त्रुटींमुळे मराठवाड्यावर अन्याय झाल्याचे नमूद केले. बोरकर म्हणाले, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी १६ डिसेंबर रोजी आगामी ३० ते ४० वर्षांचा ‘एनपीआर’ प्रसिद्ध केला. क्षमता असूनही यात मराठवाड्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ‘एनपीआर’मध्ये मागास भाग आणि औद्योगिक क्षेत्राशी कनेक्टिव्हिटी यासंदर्भातील माहितीत औरंगाबादला तिहेरी रेल्वे मार्ग असल्याचे आणि चौथा मार्ग प्रस्तावित असल्याचे नमूद केले आहे. एकेरी मार्ग असताना तिहेरी मार्ग दाखवून रेल्वेने जनतेची फसवणूक केली आहे. मल्टिमाॅडेल पॅसेंजर टर्मिनलविषयाच्या माहितीत प्रवाशांच्या संख्येनुसार पहिली २४ रेल्वेस्टेशन दाखविण्यात आले. यात औरंगाबादचा समावेश नाही. मात्र, बुलडाण्याचा आहे. तेथे स्थानकच नाही. तरीही २ लाखांहून अधिक प्रवासी दाखविण्यात आले. 

रेल्वे अधिकाऱ्यांकडून खासदारांची फसवणूकमुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे मार्गाला औरंगाबाद, जळगाव या शहरांना वगळून दाखविण्यात आले आहे. हा मार्ग औरंगाबादमार्गे जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकारी खासदारांना देतात आणि दस्तऐवजात मात्र औरंगाबादला वगळण्यात येते. याचा जाब खासदारांनी विचारला पाहिजे. शिवाय हा मार्ग २०५१ पर्यंत कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशीही माहिती बोरकर यांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेMarathwadaमराठवाडाtourismपर्यटन