शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

बनावट बियाणे, रासायनिक खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला

By बापू सोळुंके | Updated: May 8, 2024 13:27 IST

यासाठी कृषी विभागाने तालुका, विभाग आणि जिल्हास्तरीय अशी सुमारे १० भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यात एक तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर : बोगस बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशक शेतकऱ्यांच्या माथी मारून उखळ पांढरे करून घेणाऱ्या व्यापारी, कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे.

यासाठी कृषी विभागाने तालुका, विभाग आणि जिल्हास्तरीय अशी सुमारे १० भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यात एक तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यात शेतकरी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करत असतात. यामुळे आतापासूनच खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीची सुरुवात शेतकऱ्यांकडून सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत शेतकरी खरीप हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी बाजारात येतील. जिल्ह्यासाठी आवश्यक तेवढे खत आणि बियाणे कृषी विभागाकडून उपलब्ध करण्यात आली आहे.

गतवर्षी विशिष्ट वाणांचा तुटवडा बियाणे विक्रेत्यांकडून होत असतो. तसेच बऱ्याचदा बोगस बियाणे आणि रासायनिक खते शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. असे प्रकार रोखण्यासाठी कृषी विभाग सक्रिय झाला आहे. कृषी विभागाने जिल्ह कृषी अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक याप्रमाणे जिल्ह्यात एकूण १० भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहे. यासोबतच खते आणि बियाणांसंबंधी तक्रार करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे १० तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागात ३० निरीक्षक आहेत. यात जिल्हास्तरीय ६, उपविभाग स्तरावर ६ आणि तालुकास्तरावर १८ निरीक्षकांचा यात समावेश आहे. या अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्री दुकानांची आणि गुदामांची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक भेटीत अधिकारी कीटकनाशक, रासायनिक खते आणि विविध बियाणांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविणार आहे. प्रयोगशाळेच्या तपासणीत बोगसगिरी आढळून आल्यास संबंधित बियाणे, खताचा साठा जप्त केला जातो. पोलिस केस, खटला दाखल करणे अशा प्रकारची कारवाई केली जाते.

जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांची संख्या-- २५२१परवानाधारक रासायनिक खत विक्रेत्यांची संख्या-२५४०कीटकनाशक विक्रेत्यांची संख्या- १४९६

कृषी निरीक्षकांना १९०५ नमुन्यांची तपासणीचे उद्दिष्टबियाणे -११९३खते- ५२३कीटकनाशक- १८९

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद