शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

बनावट बियाणे, रासायनिक खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला

By बापू सोळुंके | Updated: May 8, 2024 13:27 IST

यासाठी कृषी विभागाने तालुका, विभाग आणि जिल्हास्तरीय अशी सुमारे १० भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यात एक तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर : बोगस बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशक शेतकऱ्यांच्या माथी मारून उखळ पांढरे करून घेणाऱ्या व्यापारी, कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे.

यासाठी कृषी विभागाने तालुका, विभाग आणि जिल्हास्तरीय अशी सुमारे १० भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यात एक तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यात शेतकरी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करत असतात. यामुळे आतापासूनच खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीची सुरुवात शेतकऱ्यांकडून सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत शेतकरी खरीप हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी बाजारात येतील. जिल्ह्यासाठी आवश्यक तेवढे खत आणि बियाणे कृषी विभागाकडून उपलब्ध करण्यात आली आहे.

गतवर्षी विशिष्ट वाणांचा तुटवडा बियाणे विक्रेत्यांकडून होत असतो. तसेच बऱ्याचदा बोगस बियाणे आणि रासायनिक खते शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. असे प्रकार रोखण्यासाठी कृषी विभाग सक्रिय झाला आहे. कृषी विभागाने जिल्ह कृषी अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक याप्रमाणे जिल्ह्यात एकूण १० भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहे. यासोबतच खते आणि बियाणांसंबंधी तक्रार करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे १० तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागात ३० निरीक्षक आहेत. यात जिल्हास्तरीय ६, उपविभाग स्तरावर ६ आणि तालुकास्तरावर १८ निरीक्षकांचा यात समावेश आहे. या अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्री दुकानांची आणि गुदामांची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक भेटीत अधिकारी कीटकनाशक, रासायनिक खते आणि विविध बियाणांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविणार आहे. प्रयोगशाळेच्या तपासणीत बोगसगिरी आढळून आल्यास संबंधित बियाणे, खताचा साठा जप्त केला जातो. पोलिस केस, खटला दाखल करणे अशा प्रकारची कारवाई केली जाते.

जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांची संख्या-- २५२१परवानाधारक रासायनिक खत विक्रेत्यांची संख्या-२५४०कीटकनाशक विक्रेत्यांची संख्या- १४९६

कृषी निरीक्षकांना १९०५ नमुन्यांची तपासणीचे उद्दिष्टबियाणे -११९३खते- ५२३कीटकनाशक- १८९

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद