शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती

By admin | Updated: December 4, 2014 00:54 IST

हणमंत गायकवाड ,लातूर जिल्ह्यातील ९४३ गावांत ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असल्याने ही गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर झाली असून, या गावांतील शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे

  

हणमंत गायकवाड ,लातूरजिल्ह्यातील ९४३ गावांत ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असल्याने ही गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर झाली असून, या गावांतील शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. याशिवाय, वेगवेगळ्या आठ प्रकारच्या योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा नुकताच दौरा झाला असून, यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीत आणेवारीनुसार स्थानिक पातळीवर उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी आठ प्रकारच्या योजना जाहीर केल्या आहेत. संबंधित विभागांना पत्र पाठवून या सवलती देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. जमीन महसुलात घट, सहकारी कर्जांचे रुपांतरण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीजबिलात ३३.५ टक्के सूट, परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित न करणे या योजनांचा दुष्काळ निवारणात समावेश आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या महसूल विभागानेही खरीप हंगामातील ज्या गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे, ती गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्याने स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर उपाययोजना करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. लातूर परिमंडळात ४ लाखांच्या आसपास कृषी पंपाचे ग्राहक आहेत. त्यांच्या वीजबिलात ३५.५ टक्के कपात होणार असून, लातूर जिल्ह्यातील २४३ गावांतील एकाही शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही. शिवाय, वीजबिलापोटी ज्या पंपधारकांचे कनेक्शन तोडण्यात आले आहे, त्यांना वीज कनेक्शन पूर्ववत् करून देण्यात आले असल्याचे महावितरणने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येताच जाहीर केले असून, डिसेंबरमध्ये ३३.५ टक्क्यांनी वीजबिलात सूट दिली जाईल, अशी माहिती कृषी पंपधारकांना पोहोचविली आहे.लातूर जिल्ह्यातील सर्वच ९४३ गावांत दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना सुरू झाल्या असून, या गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनशैक्षणिक शुल्क घेऊ नये, असे पत्र विद्यापीठांना तसेच शिक्षण उपसंचालकांसह शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. शेतीशी निगडीत असलेल्या कर्जदारांची यादी जिल्हाधिकाऱ्यांनी मागविली असून, या बँकांना कर्जाची वसुली तात्काळ थांबविण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील लीड बँक अधिकाऱ्यांसह जिल्हा मध्यवर्ती बँक व सहकारी विकास संस्थांना वसुलीला स्थगिती देण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विश्वंभर गावंडे यांनी दिली.