शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

पाण्यासाठी चारही दिशेने आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:08 IST

शहराच्या चारही बाजूने सोमवारी पाण्यासाठी जोरदार आंदोलने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराच्या चारही बाजूने सोमवारी पाण्यासाठी जोरदार आंदोलने करण्यात आली. सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवर मनपा टँकरचालकाला मारहाण करून पाणीपुरवठा बंद पाडण्यात आला. शहागंज पाण्याच्या टाकीवर संतप्त एमआयएम नगरसेवकांनी उपोषणाला सुरुवात केली. पाणी प्रश्नाला कंटाळलेल्या भाजप नगरसेविका जयश्री सुरेंद्र कुलकर्णी यांनी महापौरांना थेट राजीनामाच सादर केला. जिकडे तिकडे पाण्यासाठी एकच ओरड सुरू झाली. पाणी प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी मंगळवारी मुंबई आणि तामिळनाडू येथील तज्ज्ञ महापालिकेत दाखल होणार आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मनपा उपाययोजना करणार आहे. तेव्हापर्यंत पावसाळा संपणार हे निश्चित.मागील तीन महिन्यांपासून शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात ११४ नगरसेवकांनी घसा कोरडा होईपर्यंत अनेकदा ओरड केली. त्याचा किंचितही प्रभाव प्रशासनावर पडला नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्यासाठी जास्त ओरड सुरू आहे. जायकवाडीहून येणारे पाणीही मुबलक आहे. महापालिकेकडून नियोजन होत नसल्याने असमाधानकारक पाणीपुरवठा होत आहे. पाणी न आल्यास नागरिक थेट लोकप्रतिनिधीचा गळा धरत आहेत. ज्या दिवशी पाणीपुरवठा होणार त्या दिवशी नगरसेवकांना आता थरकाप उडत आहे. यापूर्वी कधीच पाण्याचा प्रश्न एवढा जटिल बनला नव्हता.पाणीपुरवठ्याचे तज्ज्ञआज येणारमनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मुंबई येथील दशसहस्त्रबुद्धे आणि तामिळनाडू येथील पाणीपुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण केले आहे. मंगळवारी सकाळी हे तज्ज्ञ येणार असून, आयुक्त त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर शहरातील काही भागांत फिरून तज्ज्ञ माहिती घेतील. मनपाची पाणीपुरवठा योजना बघणार आहेत. त्यांच्या अहवालानुसार प्रशासन पुढील पाऊल उचलणार आहे.शहागंज टाकीवर उपोषणसोमवारी सकाळी एमआयएम नगरसेवकांनी शहागंज पाण्याच्या टाकीवर उपोषण सुरू केले. या टाकीवरील जवळपास १८ वॉर्डांना मागील काही दिवसांपासून पाच दिवसांआड म्हणजेच सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. शहरातील कोणत्याच टाकीवर पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत नाही. ऐन रमजान महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संपूर्ण शहरात तीन दिवसांआड पाणी देण्यात येत आहे. शहागंज भागातील वॉर्डावरच अन्याय का? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. या उपोषणाची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग तेथे पोहोचले. त्यांनी नगरसेवकांची समजूत घातली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका