शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

पाण्यासाठी चारही दिशेने आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:08 IST

शहराच्या चारही बाजूने सोमवारी पाण्यासाठी जोरदार आंदोलने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराच्या चारही बाजूने सोमवारी पाण्यासाठी जोरदार आंदोलने करण्यात आली. सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवर मनपा टँकरचालकाला मारहाण करून पाणीपुरवठा बंद पाडण्यात आला. शहागंज पाण्याच्या टाकीवर संतप्त एमआयएम नगरसेवकांनी उपोषणाला सुरुवात केली. पाणी प्रश्नाला कंटाळलेल्या भाजप नगरसेविका जयश्री सुरेंद्र कुलकर्णी यांनी महापौरांना थेट राजीनामाच सादर केला. जिकडे तिकडे पाण्यासाठी एकच ओरड सुरू झाली. पाणी प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी मंगळवारी मुंबई आणि तामिळनाडू येथील तज्ज्ञ महापालिकेत दाखल होणार आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मनपा उपाययोजना करणार आहे. तेव्हापर्यंत पावसाळा संपणार हे निश्चित.मागील तीन महिन्यांपासून शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात ११४ नगरसेवकांनी घसा कोरडा होईपर्यंत अनेकदा ओरड केली. त्याचा किंचितही प्रभाव प्रशासनावर पडला नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्यासाठी जास्त ओरड सुरू आहे. जायकवाडीहून येणारे पाणीही मुबलक आहे. महापालिकेकडून नियोजन होत नसल्याने असमाधानकारक पाणीपुरवठा होत आहे. पाणी न आल्यास नागरिक थेट लोकप्रतिनिधीचा गळा धरत आहेत. ज्या दिवशी पाणीपुरवठा होणार त्या दिवशी नगरसेवकांना आता थरकाप उडत आहे. यापूर्वी कधीच पाण्याचा प्रश्न एवढा जटिल बनला नव्हता.पाणीपुरवठ्याचे तज्ज्ञआज येणारमनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मुंबई येथील दशसहस्त्रबुद्धे आणि तामिळनाडू येथील पाणीपुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण केले आहे. मंगळवारी सकाळी हे तज्ज्ञ येणार असून, आयुक्त त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर शहरातील काही भागांत फिरून तज्ज्ञ माहिती घेतील. मनपाची पाणीपुरवठा योजना बघणार आहेत. त्यांच्या अहवालानुसार प्रशासन पुढील पाऊल उचलणार आहे.शहागंज टाकीवर उपोषणसोमवारी सकाळी एमआयएम नगरसेवकांनी शहागंज पाण्याच्या टाकीवर उपोषण सुरू केले. या टाकीवरील जवळपास १८ वॉर्डांना मागील काही दिवसांपासून पाच दिवसांआड म्हणजेच सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. शहरातील कोणत्याच टाकीवर पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत नाही. ऐन रमजान महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संपूर्ण शहरात तीन दिवसांआड पाणी देण्यात येत आहे. शहागंज भागातील वॉर्डावरच अन्याय का? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. या उपोषणाची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग तेथे पोहोचले. त्यांनी नगरसेवकांची समजूत घातली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका