शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पाण्यासाठी चारही दिशेने आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:08 IST

शहराच्या चारही बाजूने सोमवारी पाण्यासाठी जोरदार आंदोलने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराच्या चारही बाजूने सोमवारी पाण्यासाठी जोरदार आंदोलने करण्यात आली. सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवर मनपा टँकरचालकाला मारहाण करून पाणीपुरवठा बंद पाडण्यात आला. शहागंज पाण्याच्या टाकीवर संतप्त एमआयएम नगरसेवकांनी उपोषणाला सुरुवात केली. पाणी प्रश्नाला कंटाळलेल्या भाजप नगरसेविका जयश्री सुरेंद्र कुलकर्णी यांनी महापौरांना थेट राजीनामाच सादर केला. जिकडे तिकडे पाण्यासाठी एकच ओरड सुरू झाली. पाणी प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी मंगळवारी मुंबई आणि तामिळनाडू येथील तज्ज्ञ महापालिकेत दाखल होणार आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मनपा उपाययोजना करणार आहे. तेव्हापर्यंत पावसाळा संपणार हे निश्चित.मागील तीन महिन्यांपासून शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात ११४ नगरसेवकांनी घसा कोरडा होईपर्यंत अनेकदा ओरड केली. त्याचा किंचितही प्रभाव प्रशासनावर पडला नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्यासाठी जास्त ओरड सुरू आहे. जायकवाडीहून येणारे पाणीही मुबलक आहे. महापालिकेकडून नियोजन होत नसल्याने असमाधानकारक पाणीपुरवठा होत आहे. पाणी न आल्यास नागरिक थेट लोकप्रतिनिधीचा गळा धरत आहेत. ज्या दिवशी पाणीपुरवठा होणार त्या दिवशी नगरसेवकांना आता थरकाप उडत आहे. यापूर्वी कधीच पाण्याचा प्रश्न एवढा जटिल बनला नव्हता.पाणीपुरवठ्याचे तज्ज्ञआज येणारमनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मुंबई येथील दशसहस्त्रबुद्धे आणि तामिळनाडू येथील पाणीपुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण केले आहे. मंगळवारी सकाळी हे तज्ज्ञ येणार असून, आयुक्त त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर शहरातील काही भागांत फिरून तज्ज्ञ माहिती घेतील. मनपाची पाणीपुरवठा योजना बघणार आहेत. त्यांच्या अहवालानुसार प्रशासन पुढील पाऊल उचलणार आहे.शहागंज टाकीवर उपोषणसोमवारी सकाळी एमआयएम नगरसेवकांनी शहागंज पाण्याच्या टाकीवर उपोषण सुरू केले. या टाकीवरील जवळपास १८ वॉर्डांना मागील काही दिवसांपासून पाच दिवसांआड म्हणजेच सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. शहरातील कोणत्याच टाकीवर पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत नाही. ऐन रमजान महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संपूर्ण शहरात तीन दिवसांआड पाणी देण्यात येत आहे. शहागंज भागातील वॉर्डावरच अन्याय का? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. या उपोषणाची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग तेथे पोहोचले. त्यांनी नगरसेवकांची समजूत घातली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका