शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तीन दशकांनंतर छत्रपती संभाजीनगरात भरला ‘घोडेबाजार’; पांढऱ्या अश्वास सर्वाधिक मागणी

By मुजीब देवणीकर | Updated: May 25, 2023 14:17 IST

छावणीत अश्वप्रेमींची दिवसभर गर्दी; पांढरा, काळा, चॉकलेटी या तीन रंगांच्या घोड्यांना ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी होती.

छत्रपती संभाजीनगर : शहरात तब्बल तीन दशकांनंतर छावणीतील आठवडी बाजारात बुधवारी घोड्यांचा बाजार भरला. सुरत, येवाला, उत्तर प्रदेश आदी भागातून मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांनी घोडे आणले होते. घोडे पाहण्यासाठी, हॉर्सरायडिंगसाठी अश्वप्रेमींनी गर्दी केली होती. दिवसभरात १० पेक्षा अधिक घोड्यांची विक्री झाली. गुरुवारीही बाजार भरविला जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. नागरिकांचा प्रतिसाद पाहून आणखी घोडे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

शहरात हौशी अश्वप्रेमींची संख्या वाढत आहे. फार्म हाऊस, शेतात, गोडाऊनवर घोडे पाळले जात आहेत. पूर्वी शहरात देशभरातील घोडे विक्रीसाठी येत. ही परंपरा तीन दशकांपासून खंडित झाली हाेती. घोडे खरेदीसाठी नागरिकांना नाशिक जिल्ह्यातील येवला येथील बाजारात जावे लागत असे. व्यापाऱ्यांच्या विनंतीवरून छत्रपती संभाजीनगर शहरात बाजार भरविण्यात आला. अनेक व्यापाऱ्यांना अद्याप बाजाराबाबत माहिती नाही. त्यामुळे बुधवारी पहिल्या दिवशी ४५ पेक्षा अधिक घाेडे आणण्यात आले. २२ हजारांपासून ६५ हजारांपर्यंत १० घोड्यांची विक्री झाली. 

सकाळी ११:०० वाजता खा. इम्तियाज जलील यांचे चिरंजीव बिलाल जलील यांच्या हस्ते बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार कंत्राटदार मोहमद रफीक, जकीयोद्दीन सिद्दीकी, शेरबाज खान पठाण, सलमान खान, सऊद चाऊस, विजू सरोदे आदींची उपस्थिती होती. बाजारातील सोयी सुविधा पाहून व्यापारी मुन्नाभाई यांनी आभार मानले. पुढील दोन ते तीन आठवड्यात बाजार आणखी चांगल्या पद्धतीने भरेल. देशभरातील व्यापारी या मध्यवर्ती ठिकाणी येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गुरुवारीही बाजार अशाच पद्धतीने भरविला जाईल.

घोड्याची उंची, दातघोड्याची उंची किती आहे, किमान ६० सेंटीमीटर उंची असावी, दोन दात आहेत का चार दात, घोडेस्वारी करताना घोडा किंवा घोडी कशी आहे, हे तपासूनच अश्वप्रेमी व्यवहार करीत होते. खरेदीसाठी आलेले नागरिक घोडेस्वारी करून पाहत होते. घोडा दिसायला किती सुंदर आहे, असे अनेक बारकावे खरेदी करणारे पाहत होते. मारवाड, काठीयावाड, चालबाज या प्रजातींना सर्वाधिक मागणी होती.

टाग्यांचे शहर म्हणून होती ओळखमराठवाड्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरला कधीकाळी टाग्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते. ही ओळख १९८०च्या दशकात हळूहळू पुसट होत गेली. बजाज कंपनीने दुचाकी, तीन चाकी वाहने बाजारात क्रांती आणली. त्यामुळे झपाट्याने टांगे बंद झाले. टांग्यांमुळे छावणीत घोड्यांचा बाजारही भरत होता. १९९० मध्ये तोसुद्धा बंद झाला. तीन दशकानंतर आता पुन्हा शहरातील अश्वप्रेमींनी एकत्र येत घोड्यांचा बाजार भरविण्याचा निर्णय घेतला. 

असे झाले बाजाराचे नियोजनशहरात किमान ४० पेक्षा अधिक नागरिकांकडे प्रत्येकी दोन ते घोडे आहेत. छंद म्हणून अश्वप्रेमी लाखो रुपये यावर खर्च करीत आहेत. एका घोड्याचा उत्कृष्ट सांभाळ करण्यासाठी दरमहा किमान ६० ते ९० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे घोड्यांचा मोठा बाजार भरतो. मराठवाड्यातील अश्वप्रेमींना घोडे खरेदी, पाहण्यासाठी तेथे ये-जा करावी लागत होती. येवला येथे देशभरातून व्यापारी घोडे घेऊन येतात. मात्र, त्यांचा बाजारात योग्य सन्मान होत नाही. कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीत. जुन्या व्यापाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील अश्वप्रेमींना तुम्हीच बाजार भरवा, अशी विनंती केली. व्हाॅटसॲपवर अश्वप्रेमींचा एक ग्रुप तयार केला. त्यानंतर बैठक घेण्यात आली. सर्वानुमते बाजार भरविण्याचा निर्णय झाला. छावणी बाजारातील जबाबदार मंडळींनीही हिरवी झेंडी दाखविली. व्यापाऱ्यांच्या राहण्याची सोयही करण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार