शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक नेतृत्वामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता? रेकॉर्डब्रेक सभेनंतरही आमदारांचे बंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 13:14 IST

मंत्रिपद, आमदार असतानाही औरंगाबाद जिल्ह्यात स्थानिक नेतृत्वाकडून सापत्न वागणूक मिळत होती

औरंगाबाद : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ६ आमदार निवडून आले. त्यातील संदीपान भूमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद, तर अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. यानंतरही अन्य ३ आमदारांसह त्यांनी बंड का केले? यावर आता स्थानिक पातळीवर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. स्थानिक नेतृत्व याला कारणीभूत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. औरंगाबाद जिल्ह्याला अनेक वर्षांनंतर दोन मंत्रिपदे शिवसेनेच्या निमित्ताने मिळाली. विकासकामांचा धूमधडाका शिवसेनेने सुरू केला. पालकमंत्री सुभाष देसाई विकासकामांवर बारकाईने लक्ष ठेवत असत. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक मंगळवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा रोवला. त्यांच्यासोबत औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार असल्याची एकच चर्चा सुरू झाली. संदीपान भूमरे, प्रदीप जैस्वाल यांच्याबद्दल सर्वाधिक आश्चर्य व्यक्त केले जात होते. नेमकी ही परिस्थिती का निर्माण झाली, यासंदर्भात ‘लोकमत’ने सेनेत कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या. मंत्रिपद, आमदार असतानाही औरंगाबाद जिल्ह्यात स्थानिक नेतृत्वाकडून सापत्न वागणूक मिळत होती. योग्य मान- सन्मान कधीच मिळाला नाही. पक्षाचा मोठा कार्यक्रम असताना व्यासपीठावर तर जागा मिळत होती, पण कार्यक्रम आ. अंबादास दानवे हायजॅक करीत होते.

ही आहेत कारणे...ज्येष्ठ शिवसैनिकांनी सांगितले की, क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात स्थानिक आमदारांना अजिबात महत्त्व दिले गेले नाही. दानवे यांनीच सर्व कार्यक्रमावर अधिराज्य गाजवले. आणखी एक उदाहरण द्यायचे झाल्यास ८ जून रोजी सांस्कृतिक मंडळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली होती. या सभेतही दानवे यांनी माईकचा ताबा सोडला नाही. त्यामुळेही सेना आमदारांची नाराजी बरीच वाढली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाटAbdul Sattarअब्दुल सत्तारSandeepan Bhoomraसंदीपान भुमरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ