शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

तणनाशक फवारणी केली अन् तीन एकरांतला ऊसच गेला जळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:04 IST

नाचनवेल : परिसरातील टाकळी (शाहू) येथील शेतकरी मंजितराव चिकणे यांनी आपल्या शेतात तीन एकर उसाची लागवड केली. पीक जोमात ...

नाचनवेल : परिसरातील टाकळी (शाहू) येथील शेतकरी मंजितराव चिकणे यांनी आपल्या शेतात तीन एकर उसाची लागवड केली. पीक जोमात आले असून त्यातील गवत जाळण्यासाठी त्यांनी तणनाशक फवारणी केली. मात्र, दुकानदाराच्या अज्ञानाचा फटका त्यांना बसल्याने तीन एकरांतील ऊस जळून गेला आहे. याबाबत त्यांनी दुकानदाराकडे तक्रार केली असता त्याने हात वर केले. अखेर त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी देखील कारवाई करण्याऐवजी कानाडोळा केला आहे.

शेतकरी मंजितराव चिकणे यांनी २० एप्रिल रोजी अंधारी येथील एका कृषी केंद्रातून दुकानदाराच्या सल्ल्याने तणनाशक औषधी खरेदी केली. त्यानंतर २३ एप्रिल रोजी त्यांनी दुकानदाराने सांगितल्याप्रमाणे फवारणी केली. मात्र, अवघ्या आठवडाभरात त्यांचा हिरवागार ऊस वाळू लागला. अखेर त्यांनी दुकानदाराकडे धाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा दुकानदाराने यात माझी काहीच चूक नसून कंपनीकडे बोट दाखवले. त्यानंतर तणनाशक उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधीने पाहणी करून दुकानदारानेच चुकीचे औषध दिल्याचा दावा केला. दीड लाखांवर खर्च करून मोठ्या कष्टाने उगवलेल्या उसाचे वाटोळे झाले. यात दुकानदार आणि कंपनीच्या कचाट्यात ते अडकले.

कृषी विभागाचे ठोठावले दार

चिकणे यांनी अखेर कृषी विभागाचे दार ठोठावले. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. तक्रार करून आठ दिवस झाले तरी देखील अधिकाऱ्यांनी पाहणीदेखील केली नाही. सदर शेतकऱ्याची सर्वच यंत्रणा कुंचबणा करीत असून, मला खरंच न्याय मिळणार आहे का, असा प्रश्न शेतकरी मंजितराव चिकणे यांनी उपस्थित केला आहे.

फोटो : तणनाशक फवारणीनंतर जळालेला ऊस.

270521\screenshot_20210527-165718_gallery_1.jpg

तणनाशक फवारणी नंतर जळून गेलेला ऊस