शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तणनाशक फवारणी केली अन् तीन एकरांतला ऊसच गेला जळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:04 IST

नाचनवेल : परिसरातील टाकळी (शाहू) येथील शेतकरी मंजितराव चिकणे यांनी आपल्या शेतात तीन एकर उसाची लागवड केली. पीक जोमात ...

नाचनवेल : परिसरातील टाकळी (शाहू) येथील शेतकरी मंजितराव चिकणे यांनी आपल्या शेतात तीन एकर उसाची लागवड केली. पीक जोमात आले असून त्यातील गवत जाळण्यासाठी त्यांनी तणनाशक फवारणी केली. मात्र, दुकानदाराच्या अज्ञानाचा फटका त्यांना बसल्याने तीन एकरांतील ऊस जळून गेला आहे. याबाबत त्यांनी दुकानदाराकडे तक्रार केली असता त्याने हात वर केले. अखेर त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी देखील कारवाई करण्याऐवजी कानाडोळा केला आहे.

शेतकरी मंजितराव चिकणे यांनी २० एप्रिल रोजी अंधारी येथील एका कृषी केंद्रातून दुकानदाराच्या सल्ल्याने तणनाशक औषधी खरेदी केली. त्यानंतर २३ एप्रिल रोजी त्यांनी दुकानदाराने सांगितल्याप्रमाणे फवारणी केली. मात्र, अवघ्या आठवडाभरात त्यांचा हिरवागार ऊस वाळू लागला. अखेर त्यांनी दुकानदाराकडे धाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा दुकानदाराने यात माझी काहीच चूक नसून कंपनीकडे बोट दाखवले. त्यानंतर तणनाशक उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधीने पाहणी करून दुकानदारानेच चुकीचे औषध दिल्याचा दावा केला. दीड लाखांवर खर्च करून मोठ्या कष्टाने उगवलेल्या उसाचे वाटोळे झाले. यात दुकानदार आणि कंपनीच्या कचाट्यात ते अडकले.

कृषी विभागाचे ठोठावले दार

चिकणे यांनी अखेर कृषी विभागाचे दार ठोठावले. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. तक्रार करून आठ दिवस झाले तरी देखील अधिकाऱ्यांनी पाहणीदेखील केली नाही. सदर शेतकऱ्याची सर्वच यंत्रणा कुंचबणा करीत असून, मला खरंच न्याय मिळणार आहे का, असा प्रश्न शेतकरी मंजितराव चिकणे यांनी उपस्थित केला आहे.

फोटो : तणनाशक फवारणीनंतर जळालेला ऊस.

270521\screenshot_20210527-165718_gallery_1.jpg

तणनाशक फवारणी नंतर जळून गेलेला ऊस