शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही कचरा संकलनाचे काम सुरू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 17:23 IST

आयुक्तांच्या आदेशानुसार कंपनीने कोणतीच तयारी केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

ठळक मुद्दे१ डिसेंबरचा मुहूर्त हुकलाकंपनीने कोणतीच तयारी केली नसल्याचे स्पष्ट

औरंगाबाद :  संपूर्ण शहरात कचरा उचलण्याचे कंत्राट दिलेल्या बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीचे प्रायोगिक तत्त्वावरील ३ वॉर्डांमध्ये १ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कामाचा मुहूर्त चुकला आहे.  आयुक्तांच्या आदेशानुसार कंपनीने कोणतीच तयारी केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

शहरातील नऊ झोनमध्ये खाजगीकरणाद्वारेच कचरा उचलण्यात येतो. प्रत्येक कामासाठी वेगळा कंत्राटदार मनपाने नेमला आहे.  दरवर्षी कचरा उचलण्यासाठी मनपा तब्बल ६० कोटी रुपये खर्च करीत आहे. या खर्चात बचत व्हावी म्हणून आयुक्तांनी शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. वर्क आॅर्डर मिळाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांत कंपनीने पूर्ण ताकदीने काम सुरू करावे, असे मनपाला अपेक्षित आहे.

मागील दोन महिन्यांत कंपनीने शहरात कोणतीच यंत्रणा उभी केलेली नाही. प्रायोगिक तत्त्वावर झोन ३, ५ आणि ६ मध्ये काम सुरू करावे, असे आयुक्तांनी १६ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. या तिन्ही वॉर्डातील खाजगी वाहने, खाजगी कर्मचारी यांचे काम १ डिसेंबरपासून बंद करावे, असेही नमूद केले आहे. दरम्यान शहराची फारशी माहिती नसलेल्या कंपनीने स्थानिक पाठबळ मिळविण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू केले आहे. 

कचरा टाकणार कोठे?महापालिकेने शहरातील सर्व कचरा संकलनाची जबाबदारी बंगळुरू येथील कंपनीला दिली असली तरी कंपनीने जमा केलेला कचरा चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल, कांचनवाडी येथे नेऊन टाकावा, असे सूचीत केले आहे. या चारही ठिकाणी मनपा भविष्यात कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी आणखी किमान ६ महिने लागणार आहेत. सध्या चारही ठिकाणी कचऱ्याचे डोंगर रचण्यात येत आहेत.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद