शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चालक-वाहकानंतर एस. टी. भरणार अधिकाऱ्यांची पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 19:17 IST

आता एस. टी. महामंडळ एकूण ६५ विविध वर्ग-१, वर्ग-२ मधील पदे भरणार आहे.

औैरंगाबाद : एस. टी. महामंडळाने पंधरा जिल्ह्यांमध्ये चालक-वाहकपदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. रविवारी या पदांसाठी जिल्हानिहाय लेखी परीक्षाही घेण्यात आली. यापाठोपाठ महामंडळाने वर्ग-१ आणि वर्ग-२ चा अनुशेषही भरून काढण्याचा निर्णय घेतला असून, एकूण ६५ पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना १९ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. 

मागील अनेक वर्षांपासून एस. टी. महामंडळाने रिक्त पदे भरलीच नव्हती. अनेक महत्त्वाच्या पदांचा अतिरिक्त कार्यभार अधिकाऱ्यांवर सोपवून कामकाज करण्यात येत होते. बेरोजगारीचे प्रमाणही वाढू लागल्याने शिवसेना-भाजप युतीवर तरुणांकडून कडाडून टीकाही करण्यात येत होती. निवडणुकांच्या तोंडावर एस.टी.मध्ये व्यापक प्रमाणात पदे भरण्यात येत आहेत. १५ जिल्ह्यांमध्ये चालक-वाहक पदांसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. ४ हजार २४२ जागांसाठी हजारो तरुणांनी अर्ज दाखल केले.

औरंगाबाद जिल्ह्यात फक्त २४० जागा असताना १७५३ उमेदवारांनी परीक्षा दिली. बेरोजगारांची टक्केवारी यावरून लक्षात येते. आता एस. टी. महामंडळ एकूण ६५ विविध वर्ग-१, वर्ग-२ मधील पदे भरणार आहे. यंत्र अभियंता-११, विभागीय वाहतूक अधिकारी- ८, उपयंत्र अभियंता-१२, लेखाधिकारी-२, भांडार अधिकारी-२, विभागीय वाहतूक अधिकारी-१२, सहायक यंत्र अभियंता-९, सहायक विभागीय लेखा अधिकारी- २, विभागीय सांख्यिकी अधिकारी-७ आदी पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील एकूण २० जागा आहेत. उर्वरित जागा आरक्षणानुसार भरण्यात येणार आहेत. महिलांसाठी ३० टक्केआरक्षण असून, खेळाडूंसाठी ५ टक्केआरक्षण राहील. पात्र उमेदवारांना नियमानुसार प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच नेमणूक देण्यात येईल. 

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportएसटीjobनोकरी