एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्रातून खोडेगाव ग्रामस्थांना पाणी मिळावे, यासाठी गावकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले होते. खोडेगावला सध्या जो पाणीपुरवठा होतो, तो अशुद्ध आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने एमआयडीसी विभागाकडे मागणी केली होती. परंतु, त्यांच्या मागणीकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे साखळी उपोषण सुरू केले. याची दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. येत्या एक ते दीड महिन्यांत गावाला पाणी दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिले गेले. या उपोषणाला पंचायत समिती सदस्य शर्मिला गायकवाड, ग्रामपंचायत सरपंच मनीषा डिगोळे, माजी सरपंच अर्जुन ढगे, उपसरपंच अंबरसिंग बहुरे, कल्याण गायकवाड, कनिष्ठा अभियंता प्रशांत बनसोडे, गणेश कोतवाल यांची उपस्थिती होती. तर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आगामी काळात मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला.
आश्वासनानंतर खोडेगाव येथील उपोषण घेतले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:07 AM