शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

छत्रपती संभाजीनगरात ४२ दिवसांनंतर बरसल्या जलधारा

By विकास राऊत | Updated: September 7, 2023 12:17 IST

१५० मि.मी. पावसाची तूट : २३ दिवस राहिले पावसाचे

छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात ४२ दिवसांनंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीला पावसाने हजेरी लावली. २६ जुलैपासून पावसाने दडी मारली होती. ऑगस्ट महिन्यांत एक-दोन दिवस वगळता पूर्णत: पावसाचा खंड होता. सप्टेंबर महिन्यांतही ५ तारखेपर्यंत पाऊस झाला नव्हता. बुधवारी सकाळी काही मिनिटांपुरता शहरातील तुरळक भागांत पाऊस झाला. १.४ मि.मी पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. ढगांच्या गर्दीसह बुधवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. बुधवारी कमाल ३२.५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस होते. त्यानंतर आज सकाळपासून शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे.

शहर व परिसरावर ४२ दिवसांनी आभाळ दाटून आले. बुधवारी सकाळी काही भागांत रिमझिम, तर काही भागांमध्ये हलक्या सरी बरसल्या. हळूहळू वातावरणाचा नूर पालटत गेला. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ५८१ मिमी असून, आजवर २६० मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी ४७० मिमी पाऊस या तारखेपर्यंत झाला होता. या तुलनेत सुमारे १५० मिमी पावसाची तूट आहे. पावसाळ्यातील जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांतील ९० पैकी ५० दिवस कोरडे गेले. ऑगस्ट महिन्यांत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. खरीप हंगामातील पिकांसह जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांसह जायकवाडी धरणातील साठ्यांवर परिणाम झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी