शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विकतच्या पाण्यालाही ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’

By admin | Updated: August 6, 2015 00:09 IST

!बीड : उन्हाळ्यात पाणीटंचाई हे आपण ऐकले असेल. पण भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन तहान भागवायची, असे ऐकल्यावर प्रत्येकाला अश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही

 

!बीड : उन्हाळ्यात पाणीटंचाई हे आपण ऐकले असेल. पण भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन तहान भागवायची, असे ऐकल्यावर प्रत्येकाला अश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हे भयाण वास्तव बीड शहरात आहे. सध्या बीडकर आपली तहान विकतच्या पाण्यावर भागवित आहेत. एवढेच नव्हे तर हे विकतचे पाणी मिळविण्यासाठी ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ करावी लागत असल्याने, सध्या किती भयाण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, याची प्रचिती येते. बीड शहरात सध्या नगर पालिकेकडून आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी नागरिकांना अपुरे पडते. दोन ते तीनच दिवसात पालीकेचे आलेले पाणी संपत असल्याने राहिलेले आठ दिवस काढायचे कसे ? असा प्रश्न प्रत्येकापुढे असतो. अगोदरच पाऊस नसल्याने सर्व व्यवहान ठप्प झाले आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट बनल्याचे दिसते. अशा परिस्थितीत विकतचे पाणी घेऊन प्यायचे म्हणजे एक अडचणच. पण, ते केल्याशिवाय आता बीडकरांसाठी पर्याय उरलेला नाही. भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन पिण्याची दुर्दैवी वेळ सध्या बीडकरांवर आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरण सध्या कोरडेठाक पडले आहे. तर माजलगाव धरणातुन माजलगाव, बीड शहरासह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याने हे पाणी सुद्धा जास्त वेळ टिकेल याची शाश्वती देता येणार नाही, असे प्रशासनाने जाहिर केले होते. त्यामुळे नागरीकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बीडकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी अद्यापपर्यंत प्रशासनानेही कुठलेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त होत आहे. पाण्याची सोय करावी, अशी मागणी बीडकरांमधून जोर धरू लागली आहे. बारा महिने विकते पाणी फक्त दुष्काळातच पाणी लागते असे नाही. बाराही महिने काही भागातील नागरीक विकतचे पाणी घेत असल्याचे टँकर चालकाने सांगितले. कोणी बांधकामासाठी तर कोणी पिण्यासाठी पाणी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यात पाणी महागले उन्हाळ्यात तर पाणी महाग होतेच परंतु पावसाळ्यात याच्या किंमतीत अधिक वाढ झाली. उन्हाळ्यात २०० ते २५० रूपयाला मिळणारे टँकर आता २५० ते ३५० रूपयाला विकत घ्यावे लागत आहे. यावरून उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात पाणी महागाल्याचे स्पष्ट दिसते. जार वाल्यांचा धंदा तेजीत शहरात सध्या दुकानदारांपासून ते कार्यालये व घरामध्ये जार चे पाणी पिण्यासाठी घेतले जात आहे. जार ची किंमतही ३० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत आहे. यावर्षी आजही जार ला अधिक मागणी असून ते वेळेवर मिळणेही मुश्किल बनले आहे. (प्रतिनिधी)