शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

विकतच्या पाण्यालाही ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’

By admin | Updated: August 6, 2015 00:09 IST

!बीड : उन्हाळ्यात पाणीटंचाई हे आपण ऐकले असेल. पण भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन तहान भागवायची, असे ऐकल्यावर प्रत्येकाला अश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही

 

!बीड : उन्हाळ्यात पाणीटंचाई हे आपण ऐकले असेल. पण भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन तहान भागवायची, असे ऐकल्यावर प्रत्येकाला अश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हे भयाण वास्तव बीड शहरात आहे. सध्या बीडकर आपली तहान विकतच्या पाण्यावर भागवित आहेत. एवढेच नव्हे तर हे विकतचे पाणी मिळविण्यासाठी ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ करावी लागत असल्याने, सध्या किती भयाण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, याची प्रचिती येते. बीड शहरात सध्या नगर पालिकेकडून आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी नागरिकांना अपुरे पडते. दोन ते तीनच दिवसात पालीकेचे आलेले पाणी संपत असल्याने राहिलेले आठ दिवस काढायचे कसे ? असा प्रश्न प्रत्येकापुढे असतो. अगोदरच पाऊस नसल्याने सर्व व्यवहान ठप्प झाले आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट बनल्याचे दिसते. अशा परिस्थितीत विकतचे पाणी घेऊन प्यायचे म्हणजे एक अडचणच. पण, ते केल्याशिवाय आता बीडकरांसाठी पर्याय उरलेला नाही. भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन पिण्याची दुर्दैवी वेळ सध्या बीडकरांवर आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरण सध्या कोरडेठाक पडले आहे. तर माजलगाव धरणातुन माजलगाव, बीड शहरासह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याने हे पाणी सुद्धा जास्त वेळ टिकेल याची शाश्वती देता येणार नाही, असे प्रशासनाने जाहिर केले होते. त्यामुळे नागरीकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बीडकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी अद्यापपर्यंत प्रशासनानेही कुठलेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त होत आहे. पाण्याची सोय करावी, अशी मागणी बीडकरांमधून जोर धरू लागली आहे. बारा महिने विकते पाणी फक्त दुष्काळातच पाणी लागते असे नाही. बाराही महिने काही भागातील नागरीक विकतचे पाणी घेत असल्याचे टँकर चालकाने सांगितले. कोणी बांधकामासाठी तर कोणी पिण्यासाठी पाणी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यात पाणी महागले उन्हाळ्यात तर पाणी महाग होतेच परंतु पावसाळ्यात याच्या किंमतीत अधिक वाढ झाली. उन्हाळ्यात २०० ते २५० रूपयाला मिळणारे टँकर आता २५० ते ३५० रूपयाला विकत घ्यावे लागत आहे. यावरून उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात पाणी महागाल्याचे स्पष्ट दिसते. जार वाल्यांचा धंदा तेजीत शहरात सध्या दुकानदारांपासून ते कार्यालये व घरामध्ये जार चे पाणी पिण्यासाठी घेतले जात आहे. जार ची किंमतही ३० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत आहे. यावर्षी आजही जार ला अधिक मागणी असून ते वेळेवर मिळणेही मुश्किल बनले आहे. (प्रतिनिधी)