शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
3
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
4
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
5
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
6
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
7
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
8
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
9
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
10
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
11
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
12
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
13
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
14
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
15
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
16
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
17
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
18
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
19
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
20
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...

विकतच्या पाण्यालाही ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’

By admin | Updated: August 6, 2015 00:09 IST

!बीड : उन्हाळ्यात पाणीटंचाई हे आपण ऐकले असेल. पण भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन तहान भागवायची, असे ऐकल्यावर प्रत्येकाला अश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही

 

!बीड : उन्हाळ्यात पाणीटंचाई हे आपण ऐकले असेल. पण भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन तहान भागवायची, असे ऐकल्यावर प्रत्येकाला अश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हे भयाण वास्तव बीड शहरात आहे. सध्या बीडकर आपली तहान विकतच्या पाण्यावर भागवित आहेत. एवढेच नव्हे तर हे विकतचे पाणी मिळविण्यासाठी ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ करावी लागत असल्याने, सध्या किती भयाण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, याची प्रचिती येते. बीड शहरात सध्या नगर पालिकेकडून आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी नागरिकांना अपुरे पडते. दोन ते तीनच दिवसात पालीकेचे आलेले पाणी संपत असल्याने राहिलेले आठ दिवस काढायचे कसे ? असा प्रश्न प्रत्येकापुढे असतो. अगोदरच पाऊस नसल्याने सर्व व्यवहान ठप्प झाले आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट बनल्याचे दिसते. अशा परिस्थितीत विकतचे पाणी घेऊन प्यायचे म्हणजे एक अडचणच. पण, ते केल्याशिवाय आता बीडकरांसाठी पर्याय उरलेला नाही. भर पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन पिण्याची दुर्दैवी वेळ सध्या बीडकरांवर आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरण सध्या कोरडेठाक पडले आहे. तर माजलगाव धरणातुन माजलगाव, बीड शहरासह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याने हे पाणी सुद्धा जास्त वेळ टिकेल याची शाश्वती देता येणार नाही, असे प्रशासनाने जाहिर केले होते. त्यामुळे नागरीकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बीडकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी अद्यापपर्यंत प्रशासनानेही कुठलेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त होत आहे. पाण्याची सोय करावी, अशी मागणी बीडकरांमधून जोर धरू लागली आहे. बारा महिने विकते पाणी फक्त दुष्काळातच पाणी लागते असे नाही. बाराही महिने काही भागातील नागरीक विकतचे पाणी घेत असल्याचे टँकर चालकाने सांगितले. कोणी बांधकामासाठी तर कोणी पिण्यासाठी पाणी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यात पाणी महागले उन्हाळ्यात तर पाणी महाग होतेच परंतु पावसाळ्यात याच्या किंमतीत अधिक वाढ झाली. उन्हाळ्यात २०० ते २५० रूपयाला मिळणारे टँकर आता २५० ते ३५० रूपयाला विकत घ्यावे लागत आहे. यावरून उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात पाणी महागाल्याचे स्पष्ट दिसते. जार वाल्यांचा धंदा तेजीत शहरात सध्या दुकानदारांपासून ते कार्यालये व घरामध्ये जार चे पाणी पिण्यासाठी घेतले जात आहे. जार ची किंमतही ३० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत आहे. यावर्षी आजही जार ला अधिक मागणी असून ते वेळेवर मिळणेही मुश्किल बनले आहे. (प्रतिनिधी)