शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

खोकडपुऱ्यातील शिवाजी हायस्कूल बोगस पटसंख्येसाठी पटाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:29 IST

वर्ग तुकड्या, शिक्षकांची पदे कायम राहावीत यासाठी बोगस पटसंख्या दाखविण्यात खोकडपुरा परिसरातील शिवाजी हायस्कूल पटाईत असल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद : वर्ग तुकड्या, शिक्षकांची पदे कायम राहावीत यासाठी बोगस पटसंख्या दाखविण्यात खोकडपुरा परिसरातील शिवाजी हायस्कूल पटाईत असल्याची माहिती समोर आली आहे. जि.प.च्या प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षणाधिकाºयांनी ही शाळा बंद करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून कार्यवाही हाती घेतल्याचेही समजते.१०० टक्के अनुदानित असलेल्या शिवाजी हायस्कूलमध्ये सोमवारी (दि.३) गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना लस देण्यात येणार होती. या शाळेत पटसंख्येवर असलेले विद्यार्थी प्रत्यक्षात या शाळेत नाहीत. रांजणगाव येथे याच संस्थेची दुसरी शाखा आहे. त्याठिकाणचे विद्यार्थी या शाळेच्या पटसंख्येवर दाखविण्यात आलेले आहेत. विविध शैक्षणिक मोहिमांच्या वेळी या शाळेतील विद्यार्थ्यांना आणण्यात येत असल्याचा प्रकार जि.प. च्या माध्यमिक व प्राथमिकच्या शिक्षणाधिºयांना माहिती असल्यामुळे मागील वेळी झालेल्या पटपडताळणी मोहिमेत ही शाळा दोषी आढळली आहे.माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी शाळांना दिवाळीच्या सुट्या लागण्याच्या शेवटच्या दिवशी (दि.३ नोव्हेंबर) शाळेची अचानक तपासणी केली असता, ६०० पटसंख्येपैकी अवघे २०० विद्यार्थीच शाळेत आढळून आले. यावेळी मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असता, ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी बनावट असल्याची लेखी माहिती मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला दिली. रांजणगाव शाळेसह अस्तित्वात नसलेल्या विद्यार्थ्यांचीही नावे पटावर नोंदविण्यात आल्याचे तपासणीत समोर आले होते. यावरून माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा बंद का करण्यात येऊ नये, अशी नोटीसच शाळेला काही दिवसांपूर्वी दिल्याचे डॉ. चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या नोटीसला शाळेने उत्तर दिलेले नसून, येत्या दोन दिवसांत शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले. प्राथमिक शाळेचीही हीच अवस्था असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी दिली. प्राथमिक शाळेतही बनावट पटसंख्या दाखविण्यात आलेली आहे. या प्रकरणात शाळेला अनेक वेळा नोटिसा दिल्या आहेत; मात्र शाळा व्यवस्थापन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्यामुळे शाळा बंद करण्याची कारवाई प्राथमिक शिक्षण विभागाने मागील महिनाभरापूर्वीच सुरू केल्याचेही जैस्वाल यांनी सांगितले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद