शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जी-२० परिषदेपूर्वी औरंगाबाद ते अजिंठा रस्ता पूर्ण करण्याचा प्रशासनाचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:42 IST

या रस्त्याचे काम २०१८ पासून सुरू आहे. हा सिमेंट काँक्रीटचा असलेला चौपदरी रस्ता अद्याप वाहतुकीसाठी पूर्णपणे वापरता येत नाही.

औरंगाबाद : जी-२० परिषदेपूर्वी औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. या रस्त्याचे १५ टक्के काम शिल्लक असून, जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या शिष्टमंडळाला अजिंठा लेण्यांपर्यंत सुलभपणे जाता यावे, यासाठी हा रस्ता पूर्ण होणे गरजेचे असून, त्या दिशेने प्रशासन कामाला लागले आहे.

या रस्त्याचे काम २०१८ पासून सुरू आहे. हा सिमेंट काँक्रीटचा असलेला चौपदरी रस्ता अद्याप वाहतुकीसाठी पूर्णपणे वापरता येत नाही. भूसंपादनाची काही किरकोळ प्रकरणे, वनविभाग आणि बांधकाम विभागाकडील काही मुद्यांमुळे रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्याच्या कामासाठी १ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. हे काम धुळे व औरंगाबाद बांधकाम विभागाअंतर्गत करण्यात येत आहे. यासाठी तीन कंत्राटदारांनी काम केले आहे. आंध्र प्रदेशच्या ऋत्विक एजन्सीने काम सोडल्यानंतर नव्याने कंत्राटदार नेमण्यात बराच काळ गेला. २०१५ मध्ये चीनच्या उपराष्ट्रपतींसह एक शिष्टमंडळ याच रस्त्याचे अजिंठा लेणी पाहण्यासाठी गेल्यानंतर रस्त्याच्या दुरवस्थेवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून हा रस्ता चर्चेचा मुद्दा बनलेला आहे.

दुपदरी रस्ता तरी पूर्ण झालाच पाहिजेजी-२० परिषदेपूर्वी अजिंठा लेण्यांपर्यंत दुपदरी रस्ता तरी पूर्ण झालाच पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले; तसेच अजिंठा घाटातील कामाच्या निविदा अंतिम झाल्या असून, आठ दिवसांत काम सुरू होणार असल्याचा दावा त्यांनी केला. दोन ते तीन टप्प्यांत १० ते १५ टक्के काम बाकी आहे. रस्त्याचे इतर कामे पूर्ण झाली आहेत.

हर्सूल रस्त्याला लवकरच मंजुरी : जिल्हाधिकारीहर्सूल रस्त्यासाठी किमान १५ कोटी रुपये लागणार आहेत. त्याबाबतची माहिती शुक्रवारी शासनाला ‘व्हीसी’मध्ये सादर करण्यात आली. या कामासाठी १९ कोटींची मागणी होती, बांधकाम विभागाने त्यातील त्रुटी दूर करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुधारित प्रस्ताव शासनासमोर मांडला. या कामाला लवकरच मंजुरी मिळेल, असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद