शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

जी-२० परिषदेपूर्वी औरंगाबाद ते अजिंठा रस्ता पूर्ण करण्याचा प्रशासनाचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:42 IST

या रस्त्याचे काम २०१८ पासून सुरू आहे. हा सिमेंट काँक्रीटचा असलेला चौपदरी रस्ता अद्याप वाहतुकीसाठी पूर्णपणे वापरता येत नाही.

औरंगाबाद : जी-२० परिषदेपूर्वी औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. या रस्त्याचे १५ टक्के काम शिल्लक असून, जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या शिष्टमंडळाला अजिंठा लेण्यांपर्यंत सुलभपणे जाता यावे, यासाठी हा रस्ता पूर्ण होणे गरजेचे असून, त्या दिशेने प्रशासन कामाला लागले आहे.

या रस्त्याचे काम २०१८ पासून सुरू आहे. हा सिमेंट काँक्रीटचा असलेला चौपदरी रस्ता अद्याप वाहतुकीसाठी पूर्णपणे वापरता येत नाही. भूसंपादनाची काही किरकोळ प्रकरणे, वनविभाग आणि बांधकाम विभागाकडील काही मुद्यांमुळे रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्याच्या कामासाठी १ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. हे काम धुळे व औरंगाबाद बांधकाम विभागाअंतर्गत करण्यात येत आहे. यासाठी तीन कंत्राटदारांनी काम केले आहे. आंध्र प्रदेशच्या ऋत्विक एजन्सीने काम सोडल्यानंतर नव्याने कंत्राटदार नेमण्यात बराच काळ गेला. २०१५ मध्ये चीनच्या उपराष्ट्रपतींसह एक शिष्टमंडळ याच रस्त्याचे अजिंठा लेणी पाहण्यासाठी गेल्यानंतर रस्त्याच्या दुरवस्थेवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून हा रस्ता चर्चेचा मुद्दा बनलेला आहे.

दुपदरी रस्ता तरी पूर्ण झालाच पाहिजेजी-२० परिषदेपूर्वी अजिंठा लेण्यांपर्यंत दुपदरी रस्ता तरी पूर्ण झालाच पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले; तसेच अजिंठा घाटातील कामाच्या निविदा अंतिम झाल्या असून, आठ दिवसांत काम सुरू होणार असल्याचा दावा त्यांनी केला. दोन ते तीन टप्प्यांत १० ते १५ टक्के काम बाकी आहे. रस्त्याचे इतर कामे पूर्ण झाली आहेत.

हर्सूल रस्त्याला लवकरच मंजुरी : जिल्हाधिकारीहर्सूल रस्त्यासाठी किमान १५ कोटी रुपये लागणार आहेत. त्याबाबतची माहिती शुक्रवारी शासनाला ‘व्हीसी’मध्ये सादर करण्यात आली. या कामासाठी १९ कोटींची मागणी होती, बांधकाम विभागाने त्यातील त्रुटी दूर करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुधारित प्रस्ताव शासनासमोर मांडला. या कामाला लवकरच मंजुरी मिळेल, असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद