शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

जी-२० परिषदेपूर्वी औरंगाबाद ते अजिंठा रस्ता पूर्ण करण्याचा प्रशासनाचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:42 IST

या रस्त्याचे काम २०१८ पासून सुरू आहे. हा सिमेंट काँक्रीटचा असलेला चौपदरी रस्ता अद्याप वाहतुकीसाठी पूर्णपणे वापरता येत नाही.

औरंगाबाद : जी-२० परिषदेपूर्वी औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. या रस्त्याचे १५ टक्के काम शिल्लक असून, जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या शिष्टमंडळाला अजिंठा लेण्यांपर्यंत सुलभपणे जाता यावे, यासाठी हा रस्ता पूर्ण होणे गरजेचे असून, त्या दिशेने प्रशासन कामाला लागले आहे.

या रस्त्याचे काम २०१८ पासून सुरू आहे. हा सिमेंट काँक्रीटचा असलेला चौपदरी रस्ता अद्याप वाहतुकीसाठी पूर्णपणे वापरता येत नाही. भूसंपादनाची काही किरकोळ प्रकरणे, वनविभाग आणि बांधकाम विभागाकडील काही मुद्यांमुळे रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्याच्या कामासाठी १ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. हे काम धुळे व औरंगाबाद बांधकाम विभागाअंतर्गत करण्यात येत आहे. यासाठी तीन कंत्राटदारांनी काम केले आहे. आंध्र प्रदेशच्या ऋत्विक एजन्सीने काम सोडल्यानंतर नव्याने कंत्राटदार नेमण्यात बराच काळ गेला. २०१५ मध्ये चीनच्या उपराष्ट्रपतींसह एक शिष्टमंडळ याच रस्त्याचे अजिंठा लेणी पाहण्यासाठी गेल्यानंतर रस्त्याच्या दुरवस्थेवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून हा रस्ता चर्चेचा मुद्दा बनलेला आहे.

दुपदरी रस्ता तरी पूर्ण झालाच पाहिजेजी-२० परिषदेपूर्वी अजिंठा लेण्यांपर्यंत दुपदरी रस्ता तरी पूर्ण झालाच पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले; तसेच अजिंठा घाटातील कामाच्या निविदा अंतिम झाल्या असून, आठ दिवसांत काम सुरू होणार असल्याचा दावा त्यांनी केला. दोन ते तीन टप्प्यांत १० ते १५ टक्के काम बाकी आहे. रस्त्याचे इतर कामे पूर्ण झाली आहेत.

हर्सूल रस्त्याला लवकरच मंजुरी : जिल्हाधिकारीहर्सूल रस्त्यासाठी किमान १५ कोटी रुपये लागणार आहेत. त्याबाबतची माहिती शुक्रवारी शासनाला ‘व्हीसी’मध्ये सादर करण्यात आली. या कामासाठी १९ कोटींची मागणी होती, बांधकाम विभागाने त्यातील त्रुटी दूर करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुधारित प्रस्ताव शासनासमोर मांडला. या कामाला लवकरच मंजुरी मिळेल, असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद