शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

राजश्री उंबरेंच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी क्रांतीचौक रोखला

By बापू सोळुंके | Updated: September 6, 2024 19:15 IST

मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस हे आरक्षण पूर्ववत ठेवावे आणि अन्य एका मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे यांनी २ सप्टेंबरपासून क्रांतीचौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा यासह अन्य मागण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. या उपोषणाची प्रशासन आणि शासनाने दखल न घेतल्याने संतप्त मराठा समाज कार्यकर्त्यांनी क्रांतीचौकात रास्तारोको केला. यामुळे सुमारे ५० मिनिटे क्रांतीचौकाची वाहतूक बंद होती. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर क्रांतीचौकातील वाहतुक सुरळीत झाली.

मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस हे आरक्षण पूर्ववत ठेवावे आणि अन्य एका मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे यांनी २ सप्टेंबरपासून क्रांतीचौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज शुक्रवारी पाचवा दिवस होता; परंतु प्रशासनाचा अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला नाही. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करीत क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा घातली. यानंतर हे आंदोलक अचानक रस्त्यावर बसून ठिय्या देऊ लागले. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, कोण म्हणतेय देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, जय, राजमाता जिजाऊंचा विजय असो अशा घोषणा आंदोलक देत होते. सुमारे ५० मिनिटे आंदोलक रस्त्यावर बसून होते. शेवटी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना वाहतूक पूर्ववत करता आली.

मराठवाड्यातील आरक्षणाचा प्रश्न सोडवा अन्यथा....आम्ही मराठवाडयात सामील होण्यापूर्वी हैदराबाद संस्थानात होतो. तेव्हा तेथे ओबीसी होतो. मात्र मराठवाड्यात आल्यानंतर आमचे आरक्षण काढून घेण्यात आले. मराठा समाजाची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट आहे. यामुळे मराठवाड्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक होतात. आपल्या लेकरा,बाळांची शैक्षणिक शुल्क भरता येत नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत.मागणी मान्य न झाल्याास आंदोलन तीव्र करण्यात येईल.-राजश्री उंबरे, उपोषणकर्त्या.

अन्य मार्गावर वाहतूक वळविलीआंदोलन सुरू होताच क्रांतीचौकाकडे येणारी वाहतूक उस्मानपुरा, गोपाल टी मार्गे कोकणवाडीकडे वळविण्यात आली. तर सिल्लेखान्याकडून क्रांतीचौकाकडे येणारी वाहने खोकडपुरा मार्गे अमरप्रीत चौकाकडे वळविण्यात आली. तसेच कोर्टाकडून येणारी वाहने उड्डाणपुलाचाच मार्ग वापरण्याचे सांगण्यात आले होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण