शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

राजश्री उंबरेंच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी क्रांतीचौक रोखला

By बापू सोळुंके | Updated: September 6, 2024 19:15 IST

मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस हे आरक्षण पूर्ववत ठेवावे आणि अन्य एका मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे यांनी २ सप्टेंबरपासून क्रांतीचौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा यासह अन्य मागण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. या उपोषणाची प्रशासन आणि शासनाने दखल न घेतल्याने संतप्त मराठा समाज कार्यकर्त्यांनी क्रांतीचौकात रास्तारोको केला. यामुळे सुमारे ५० मिनिटे क्रांतीचौकाची वाहतूक बंद होती. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर क्रांतीचौकातील वाहतुक सुरळीत झाली.

मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस हे आरक्षण पूर्ववत ठेवावे आणि अन्य एका मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे यांनी २ सप्टेंबरपासून क्रांतीचौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज शुक्रवारी पाचवा दिवस होता; परंतु प्रशासनाचा अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला नाही. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करीत क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा घातली. यानंतर हे आंदोलक अचानक रस्त्यावर बसून ठिय्या देऊ लागले. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, कोण म्हणतेय देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, जय, राजमाता जिजाऊंचा विजय असो अशा घोषणा आंदोलक देत होते. सुमारे ५० मिनिटे आंदोलक रस्त्यावर बसून होते. शेवटी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना वाहतूक पूर्ववत करता आली.

मराठवाड्यातील आरक्षणाचा प्रश्न सोडवा अन्यथा....आम्ही मराठवाडयात सामील होण्यापूर्वी हैदराबाद संस्थानात होतो. तेव्हा तेथे ओबीसी होतो. मात्र मराठवाड्यात आल्यानंतर आमचे आरक्षण काढून घेण्यात आले. मराठा समाजाची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट आहे. यामुळे मराठवाड्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक होतात. आपल्या लेकरा,बाळांची शैक्षणिक शुल्क भरता येत नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत.मागणी मान्य न झाल्याास आंदोलन तीव्र करण्यात येईल.-राजश्री उंबरे, उपोषणकर्त्या.

अन्य मार्गावर वाहतूक वळविलीआंदोलन सुरू होताच क्रांतीचौकाकडे येणारी वाहतूक उस्मानपुरा, गोपाल टी मार्गे कोकणवाडीकडे वळविण्यात आली. तर सिल्लेखान्याकडून क्रांतीचौकाकडे येणारी वाहने खोकडपुरा मार्गे अमरप्रीत चौकाकडे वळविण्यात आली. तसेच कोर्टाकडून येणारी वाहने उड्डाणपुलाचाच मार्ग वापरण्याचे सांगण्यात आले होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण