शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रशासन अलर्ट; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमाव बंदीनंतर इंटरनेट सेवा बंद

By विकास राऊत | Updated: November 1, 2023 19:40 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलन, उपोषणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे आदेश जारी केले. शिवाय बुधवारपासून पुढील ४८ तासांसाठी जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा गृहविभागाच्या आदेशाने बंद करण्यात आली आहे.

गृह विभागाकडून आदेश येताच जिल्हा प्रशासनाने तातडीने इंटरनेट सेवा बंद केली. गृहविभागाच्या सचिव सुजाता सौनिक यांनी काढलेल्या आदेशामुळे इंटरनेट सेवा बंद केल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितले. सोशल मीडियातून मेसेज फॉरवर्ड होऊन चुकीच्या अफवा पसरून सार्वजनिक वातावरण खराब होऊ नये. यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, याचा फटका ऑनलाईन व्यवहारांना बसला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी विधाते यांनी बुधवारपासून जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी केले. १५ नोव्हेंबरपर्यंत हे आदेश लागू असतील. शस्त्र बाळगणे, विनापरवानगी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी सभा, मिरवणूक, मोर्चास परवानगी देण्याचे अधिकार ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी नेमलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादPoliceपोलिस