शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
5
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
6
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
7
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
8
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
9
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
10
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
11
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
12
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
13
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
14
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
15
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
16
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
17
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
18
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
19
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
20
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...

'माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..? सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का केली..?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 21:14 IST

'ज्यांना फसवणूक झाली आणि पळवले असे वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहे अन् असतील.'- आदित्य ठाकरे

औरंगाबाद: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांची मुठ बांधण्यासाठी शिवसंवाद यात्रा सुरू केली. ही यात्रा आज औरंगाबाद शहरात आली, यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का? यावळी आदित्य ठाकरे यांनी शहराला दिलेल्या निधीचा उल्लेख केला. ते म्हाले, 'आम्ही शरहाला 552 कोटींचा फंड शहराला दिला. 100 कोटी जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला दिले. धक्का याचा लागला की, ज्यांना आपले समजलो त्यांनीच घात केला. बंडखोरी पूर्वी तात्पुरते सत्तेत असलेले गद्दार आमदार माझ्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. त्यांचे खरे मुखवटे फाटले आहेत. ठाकरे परिवारावर प्रेम करणाऱ्यांनी आज आम्हाला धमक्या देत आहेत. मला जनतेने दिलेले असुड मी चालवणार नाही, कारण आता लोकशाही आहे. मतदारांनी मतदानातून धडा शिकवावा,' असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

संबंधित बातमी- 'सरकारची सुरुवात रायगडच्या डागडुजीपासून अन् शेवट संभाजीनगरवर': आदित्य ठाकरे

'बेकायदेशीर सरकार कोसळणारच...'ते पुढे म्हणाले की, हात जोडून सर्वांना शिवसैनिकांनी विचारावे गड्डारी का केली? ज्यांनी ओळख दिली त्या उद्धव यांच्या पाठीत खंजीर का खुपसला? आम्ही जास्त दिल्याने यांना अपचन झालं, आता जेलुसिल घ्यायला हे तिकडे गेले. मला अनेकांनी सांगितलेलं राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, म्हणून बाळासाहेबांच्या मुलाला पायउतार केलं ते हेच दाखवायला की चांगल्याना स्थान नसतं. देशभरात झालेल्या अनेक सर्व्हेतून पुढे आलं आहे की काम करणारा सीएम हीच उद्धव यांची ओळख. आता आलेलं सरकार बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे, हे सरकार लवकरच कोसळणारच,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.

माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..?ते पुढे म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी आपल्या अखत्यारीतील खाती यांना दिली, पण तरीदेखील त्यांच्यात नाराजी होती. एवढं देऊन माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला. जिथे गेलात तिथे सुखात राहा, पण राहण्यासाठी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा. जनता ठरवेल ते मान्य असेल. ज्यांना फसवणूक झाली आणि पळवले असे वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहे अन् असतील,' असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद