शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

औरंगाबादेत बाटलीभर पाण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:57 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन परीक्षेच्या काळातच विद्यार्थी, कर्मचा-यांना बाटलीभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : नियोजनाच्या अभावामुळे पाणीटंचाई; कर्मचाऱ्यांच्या ‘चलता है’ संस्कृतीचा फटका, प्रकुलगुरूंनी दिला कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन परीक्षेच्या काळातच विद्यार्थी, कर्मचा-यांना बाटलीभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. प्रकुलगुरूंनी परीक्षांमुळे १५ मे पर्यंत विद्यार्थ्यांना लागेल तेवढे पाणी टँकरने उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. मात्र, कर्मचारी, अधिका-यांच्या ‘चलता है’ संस्कृतीचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.विद्यापीठातील वसतिगृहे, विभाग, अभ्यासिका आणि प्रशासकीय इमारतींमध्ये पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही. गुरुवारी दिवसभर अभ्यासिका, विभागातील विद्यार्थी, कर्मचारी हातात पाण्याच्या बॉटल घेऊन विविध विभागांमध्ये पाणी मिळते का? याचा शोध घेत होते.

सामाजिकशास्त्रे इमारतीमधील एका विभागात पाणी उपलब्ध होताच त्याठिकाणी बॉटल भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत होती, तर ग्रंथालय, अभ्यासिका, प्रशासकीय इमारतीमधील एकाही ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळाले, तर वसतिगृहांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहात पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होते. शहीद भगतसिंग वसतिगृहात तर मागील अनेक महिन्यांपासून पिण्याचे पाणी नाही.व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वसतिगृहात पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र, तापवलेल्या पाण्यापेक्षा अधिक गरम पाणी नळाद्वारे येत होते. यामुळे त्याठिकाणी पाणी असूनही पिण्यासाठी उपयोग करता येत नव्हता. विभागांमध्ये सामाजिकशास्त्रे इमारतीमधील अर्थशास्त्र विभाग वगळता इतर ४१ विभागांत पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचेही पाहायला मिळाले. अभ्यासिकेत अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना ग्रंथालय किंवा प्रशासकीय इमारतीमध्ये बाटलीभर पाणी उपलब्ध होत असे. मात्र, त्याठिकाणीही पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे तेथील कर्मचारीही वणवण भटकंती करत होते.विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन होताच एक, दोन दिवस पाणीपुरवठा व्यवस्थित केला जातो. मात्र, नंतर तिसºया दिवशी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आता आंदोलन करूनही काही फायदा होईल, असे वाटत नाही. कारण किती वेळा एकाच मागणीसाठी भांडावे, यालाही मर्यादा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. आंदोलन करूनही पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. यामुळे आता जिथे पाणी मिळेल तेथून उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे....तर आता थेट कारवाई होईलविद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे १५ मे पर्यंत लागेल तेवढे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. दिवसातून तीन वेळा वसतिगृहे, विभागातील पाण्याचा आढावा घेण्याच्या सूचना आहेत. महापालिकेचे पाणी उपलब्ध झाले नाही, तरी त्यावर विसंबून न राहता लागेल तेवढे टँकर मागविण्याची परवानगी संंबंधित विभागाला दिलेली आहे.तरीही पिण्याचे पाणी कमी पडत असेल, तर नियोजनाचा अभाव असल्याचे स्पष्ट होते. नियोजनात त्रुटी ठेवणाºया, हलगर्जी करणारे अधिकारी, कर्मचाºयांवर आता कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. याची दक्षता घेणार असल्याचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थी