शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

औरंगाबादेत बाटलीभर पाण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:57 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन परीक्षेच्या काळातच विद्यार्थी, कर्मचा-यांना बाटलीभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : नियोजनाच्या अभावामुळे पाणीटंचाई; कर्मचाऱ्यांच्या ‘चलता है’ संस्कृतीचा फटका, प्रकुलगुरूंनी दिला कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन परीक्षेच्या काळातच विद्यार्थी, कर्मचा-यांना बाटलीभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. प्रकुलगुरूंनी परीक्षांमुळे १५ मे पर्यंत विद्यार्थ्यांना लागेल तेवढे पाणी टँकरने उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. मात्र, कर्मचारी, अधिका-यांच्या ‘चलता है’ संस्कृतीचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.विद्यापीठातील वसतिगृहे, विभाग, अभ्यासिका आणि प्रशासकीय इमारतींमध्ये पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही. गुरुवारी दिवसभर अभ्यासिका, विभागातील विद्यार्थी, कर्मचारी हातात पाण्याच्या बॉटल घेऊन विविध विभागांमध्ये पाणी मिळते का? याचा शोध घेत होते.

सामाजिकशास्त्रे इमारतीमधील एका विभागात पाणी उपलब्ध होताच त्याठिकाणी बॉटल भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत होती, तर ग्रंथालय, अभ्यासिका, प्रशासकीय इमारतीमधील एकाही ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळाले, तर वसतिगृहांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहात पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होते. शहीद भगतसिंग वसतिगृहात तर मागील अनेक महिन्यांपासून पिण्याचे पाणी नाही.व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वसतिगृहात पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र, तापवलेल्या पाण्यापेक्षा अधिक गरम पाणी नळाद्वारे येत होते. यामुळे त्याठिकाणी पाणी असूनही पिण्यासाठी उपयोग करता येत नव्हता. विभागांमध्ये सामाजिकशास्त्रे इमारतीमधील अर्थशास्त्र विभाग वगळता इतर ४१ विभागांत पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचेही पाहायला मिळाले. अभ्यासिकेत अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना ग्रंथालय किंवा प्रशासकीय इमारतीमध्ये बाटलीभर पाणी उपलब्ध होत असे. मात्र, त्याठिकाणीही पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे तेथील कर्मचारीही वणवण भटकंती करत होते.विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन होताच एक, दोन दिवस पाणीपुरवठा व्यवस्थित केला जातो. मात्र, नंतर तिसºया दिवशी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आता आंदोलन करूनही काही फायदा होईल, असे वाटत नाही. कारण किती वेळा एकाच मागणीसाठी भांडावे, यालाही मर्यादा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. आंदोलन करूनही पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. यामुळे आता जिथे पाणी मिळेल तेथून उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे....तर आता थेट कारवाई होईलविद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे १५ मे पर्यंत लागेल तेवढे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. दिवसातून तीन वेळा वसतिगृहे, विभागातील पाण्याचा आढावा घेण्याच्या सूचना आहेत. महापालिकेचे पाणी उपलब्ध झाले नाही, तरी त्यावर विसंबून न राहता लागेल तेवढे टँकर मागविण्याची परवानगी संंबंधित विभागाला दिलेली आहे.तरीही पिण्याचे पाणी कमी पडत असेल, तर नियोजनाचा अभाव असल्याचे स्पष्ट होते. नियोजनात त्रुटी ठेवणाºया, हलगर्जी करणारे अधिकारी, कर्मचाºयांवर आता कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. याची दक्षता घेणार असल्याचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थी