शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

औरंगाबादेत बाटलीभर पाण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:57 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन परीक्षेच्या काळातच विद्यार्थी, कर्मचा-यांना बाटलीभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : नियोजनाच्या अभावामुळे पाणीटंचाई; कर्मचाऱ्यांच्या ‘चलता है’ संस्कृतीचा फटका, प्रकुलगुरूंनी दिला कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन परीक्षेच्या काळातच विद्यार्थी, कर्मचा-यांना बाटलीभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. प्रकुलगुरूंनी परीक्षांमुळे १५ मे पर्यंत विद्यार्थ्यांना लागेल तेवढे पाणी टँकरने उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. मात्र, कर्मचारी, अधिका-यांच्या ‘चलता है’ संस्कृतीचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.विद्यापीठातील वसतिगृहे, विभाग, अभ्यासिका आणि प्रशासकीय इमारतींमध्ये पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही. गुरुवारी दिवसभर अभ्यासिका, विभागातील विद्यार्थी, कर्मचारी हातात पाण्याच्या बॉटल घेऊन विविध विभागांमध्ये पाणी मिळते का? याचा शोध घेत होते.

सामाजिकशास्त्रे इमारतीमधील एका विभागात पाणी उपलब्ध होताच त्याठिकाणी बॉटल भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत होती, तर ग्रंथालय, अभ्यासिका, प्रशासकीय इमारतीमधील एकाही ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळाले, तर वसतिगृहांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहात पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होते. शहीद भगतसिंग वसतिगृहात तर मागील अनेक महिन्यांपासून पिण्याचे पाणी नाही.व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वसतिगृहात पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र, तापवलेल्या पाण्यापेक्षा अधिक गरम पाणी नळाद्वारे येत होते. यामुळे त्याठिकाणी पाणी असूनही पिण्यासाठी उपयोग करता येत नव्हता. विभागांमध्ये सामाजिकशास्त्रे इमारतीमधील अर्थशास्त्र विभाग वगळता इतर ४१ विभागांत पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचेही पाहायला मिळाले. अभ्यासिकेत अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना ग्रंथालय किंवा प्रशासकीय इमारतीमध्ये बाटलीभर पाणी उपलब्ध होत असे. मात्र, त्याठिकाणीही पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे तेथील कर्मचारीही वणवण भटकंती करत होते.विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन होताच एक, दोन दिवस पाणीपुरवठा व्यवस्थित केला जातो. मात्र, नंतर तिसºया दिवशी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आता आंदोलन करूनही काही फायदा होईल, असे वाटत नाही. कारण किती वेळा एकाच मागणीसाठी भांडावे, यालाही मर्यादा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. आंदोलन करूनही पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. यामुळे आता जिथे पाणी मिळेल तेथून उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे....तर आता थेट कारवाई होईलविद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे १५ मे पर्यंत लागेल तेवढे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. दिवसातून तीन वेळा वसतिगृहे, विभागातील पाण्याचा आढावा घेण्याच्या सूचना आहेत. महापालिकेचे पाणी उपलब्ध झाले नाही, तरी त्यावर विसंबून न राहता लागेल तेवढे टँकर मागविण्याची परवानगी संंबंधित विभागाला दिलेली आहे.तरीही पिण्याचे पाणी कमी पडत असेल, तर नियोजनाचा अभाव असल्याचे स्पष्ट होते. नियोजनात त्रुटी ठेवणाºया, हलगर्जी करणारे अधिकारी, कर्मचाºयांवर आता कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. याची दक्षता घेणार असल्याचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थी