शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यासाठी ‘क्लायमेंट चेंज’चा ॲक्शन प्लॅन : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 12:31 IST

२०११ पासून २०१८ पर्यंत दुष्काळ, नंतर महापूर, ओला दुष्काळ, ढगफुटीसारखे वातावरण विभागात निर्माण झाल्याचे दिसते आहे. अधूनमधून गारपीट होत आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात ‘क्लायमेंट चेंज’ ( Climate Change) चा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येणार असून लवकरच त्यावर काम सुरू होणार असल्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी २६ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.

विभागीय आयुक्तालयात त्यांनी विविध बैठका घेतल्या. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, औरंगाबाद म्हणून नाही तर, मराठवाड्याच्या क्लायमेंट चेंज ॲक्शन प्लॅनबाबत विचार सुरू आहे. २०११ पासून २०१८ पर्यंत दुष्काळ, नंतर महापूर, ओला दुष्काळ, ढगफुटीसारखे वातावरण विभागात निर्माण झाल्याचे दिसते आहे. अधूनमधून गारपीट होत आहे. शहरी व ग्रामीण भागात वातावरण बदलाबाबत कसा लढा देता येईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. सध्या मराठवाड्यावर वातावरण बदलाचा परिणाम होत आहे. ढगफुटी, गारपीट, अवकाळी पाऊस होत आहे. शेतकऱ्यांपर्यंत वातावरण बदलाबाबत माहिती द्यावी लागेल. शहरी ते ग्रामीण जनजागृती करण्यासाठी ॲक्शन बेस प्लान तयार करावा लागेल. पर्यावरण मैत्रभाव असलेली वाहने वापरावी लागतील. २०२५ पर्यंत उर्जेच्या नवीन स्त्रोतावर लक्ष देण्याचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २५० मेगावॅटचा सोलार एनर्जी प्लांट लावण्याचे नियोजन आहे.

पर्यटनस्थळांचा निर्णय दहा दिवसात ; प्राधिकरणाचा विचारपर्यटनस्थळे कधी खुली करणार, यावर ठाकरे म्हणाले, रुग्णांचे आकडे काही दिवसांत खाली आले तर, सकारात्मक निर्णय होईल. दहा दिवसांत आकडे उतरतील, अशी अपेक्षा आहे. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत आढावा घेऊन निर्णय होईल. पर्यटनासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे हा चर्चेचा मुद्दा आहे. डेक्कन ओडिसीचा लाभ सामान्य प्रवाशांना झाला पाहिजे. मध्यंतरी काढलेले टेंडर व्यपगत (लॅप्स) झाले. आता नव्याने टेंडर काढण्यात येईल.

येत्या बजेटकडून अपेक्षा२०२० च्या बजेटमध्ये पर्यटनाला चालना मिळाली होती. कोरोना काळात वैद्यकीय विभागाला जास्तीचे पैसे द्यावे लागले. अर्थमंत्र्यांनी इतर खात्यांना निधी देण्याचे नाकारलेले नाही. येत्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व खात्यांसाठी तरतुदी होतील, अशी अपेक्षा आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी निधी मिळत नसल्याची टीका केली आहे, यावर ठाकरे म्हणाले, आम्ही एकत्र काम करतो आहोत. त्यामुळे निधी-कमी जास्त मिळतो, असा काही प्रश्न नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर त्यांनी बोलणे टाळले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाenvironmentपर्यावरण