शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

मराठवाड्यासाठी ‘क्लायमेंट चेंज’चा ॲक्शन प्लॅन : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 12:31 IST

२०११ पासून २०१८ पर्यंत दुष्काळ, नंतर महापूर, ओला दुष्काळ, ढगफुटीसारखे वातावरण विभागात निर्माण झाल्याचे दिसते आहे. अधूनमधून गारपीट होत आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात ‘क्लायमेंट चेंज’ ( Climate Change) चा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येणार असून लवकरच त्यावर काम सुरू होणार असल्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी २६ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.

विभागीय आयुक्तालयात त्यांनी विविध बैठका घेतल्या. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, औरंगाबाद म्हणून नाही तर, मराठवाड्याच्या क्लायमेंट चेंज ॲक्शन प्लॅनबाबत विचार सुरू आहे. २०११ पासून २०१८ पर्यंत दुष्काळ, नंतर महापूर, ओला दुष्काळ, ढगफुटीसारखे वातावरण विभागात निर्माण झाल्याचे दिसते आहे. अधूनमधून गारपीट होत आहे. शहरी व ग्रामीण भागात वातावरण बदलाबाबत कसा लढा देता येईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. सध्या मराठवाड्यावर वातावरण बदलाचा परिणाम होत आहे. ढगफुटी, गारपीट, अवकाळी पाऊस होत आहे. शेतकऱ्यांपर्यंत वातावरण बदलाबाबत माहिती द्यावी लागेल. शहरी ते ग्रामीण जनजागृती करण्यासाठी ॲक्शन बेस प्लान तयार करावा लागेल. पर्यावरण मैत्रभाव असलेली वाहने वापरावी लागतील. २०२५ पर्यंत उर्जेच्या नवीन स्त्रोतावर लक्ष देण्याचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २५० मेगावॅटचा सोलार एनर्जी प्लांट लावण्याचे नियोजन आहे.

पर्यटनस्थळांचा निर्णय दहा दिवसात ; प्राधिकरणाचा विचारपर्यटनस्थळे कधी खुली करणार, यावर ठाकरे म्हणाले, रुग्णांचे आकडे काही दिवसांत खाली आले तर, सकारात्मक निर्णय होईल. दहा दिवसांत आकडे उतरतील, अशी अपेक्षा आहे. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत आढावा घेऊन निर्णय होईल. पर्यटनासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे हा चर्चेचा मुद्दा आहे. डेक्कन ओडिसीचा लाभ सामान्य प्रवाशांना झाला पाहिजे. मध्यंतरी काढलेले टेंडर व्यपगत (लॅप्स) झाले. आता नव्याने टेंडर काढण्यात येईल.

येत्या बजेटकडून अपेक्षा२०२० च्या बजेटमध्ये पर्यटनाला चालना मिळाली होती. कोरोना काळात वैद्यकीय विभागाला जास्तीचे पैसे द्यावे लागले. अर्थमंत्र्यांनी इतर खात्यांना निधी देण्याचे नाकारलेले नाही. येत्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व खात्यांसाठी तरतुदी होतील, अशी अपेक्षा आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी निधी मिळत नसल्याची टीका केली आहे, यावर ठाकरे म्हणाले, आम्ही एकत्र काम करतो आहोत. त्यामुळे निधी-कमी जास्त मिळतो, असा काही प्रश्न नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर त्यांनी बोलणे टाळले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाenvironmentपर्यावरण