शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मराठवाड्यासाठी ‘क्लायमेंट चेंज’चा ॲक्शन प्लॅन : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 12:31 IST

२०११ पासून २०१८ पर्यंत दुष्काळ, नंतर महापूर, ओला दुष्काळ, ढगफुटीसारखे वातावरण विभागात निर्माण झाल्याचे दिसते आहे. अधूनमधून गारपीट होत आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात ‘क्लायमेंट चेंज’ ( Climate Change) चा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येणार असून लवकरच त्यावर काम सुरू होणार असल्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी २६ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.

विभागीय आयुक्तालयात त्यांनी विविध बैठका घेतल्या. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, औरंगाबाद म्हणून नाही तर, मराठवाड्याच्या क्लायमेंट चेंज ॲक्शन प्लॅनबाबत विचार सुरू आहे. २०११ पासून २०१८ पर्यंत दुष्काळ, नंतर महापूर, ओला दुष्काळ, ढगफुटीसारखे वातावरण विभागात निर्माण झाल्याचे दिसते आहे. अधूनमधून गारपीट होत आहे. शहरी व ग्रामीण भागात वातावरण बदलाबाबत कसा लढा देता येईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. सध्या मराठवाड्यावर वातावरण बदलाचा परिणाम होत आहे. ढगफुटी, गारपीट, अवकाळी पाऊस होत आहे. शेतकऱ्यांपर्यंत वातावरण बदलाबाबत माहिती द्यावी लागेल. शहरी ते ग्रामीण जनजागृती करण्यासाठी ॲक्शन बेस प्लान तयार करावा लागेल. पर्यावरण मैत्रभाव असलेली वाहने वापरावी लागतील. २०२५ पर्यंत उर्जेच्या नवीन स्त्रोतावर लक्ष देण्याचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २५० मेगावॅटचा सोलार एनर्जी प्लांट लावण्याचे नियोजन आहे.

पर्यटनस्थळांचा निर्णय दहा दिवसात ; प्राधिकरणाचा विचारपर्यटनस्थळे कधी खुली करणार, यावर ठाकरे म्हणाले, रुग्णांचे आकडे काही दिवसांत खाली आले तर, सकारात्मक निर्णय होईल. दहा दिवसांत आकडे उतरतील, अशी अपेक्षा आहे. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत आढावा घेऊन निर्णय होईल. पर्यटनासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे हा चर्चेचा मुद्दा आहे. डेक्कन ओडिसीचा लाभ सामान्य प्रवाशांना झाला पाहिजे. मध्यंतरी काढलेले टेंडर व्यपगत (लॅप्स) झाले. आता नव्याने टेंडर काढण्यात येईल.

येत्या बजेटकडून अपेक्षा२०२० च्या बजेटमध्ये पर्यटनाला चालना मिळाली होती. कोरोना काळात वैद्यकीय विभागाला जास्तीचे पैसे द्यावे लागले. अर्थमंत्र्यांनी इतर खात्यांना निधी देण्याचे नाकारलेले नाही. येत्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व खात्यांसाठी तरतुदी होतील, अशी अपेक्षा आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी निधी मिळत नसल्याची टीका केली आहे, यावर ठाकरे म्हणाले, आम्ही एकत्र काम करतो आहोत. त्यामुळे निधी-कमी जास्त मिळतो, असा काही प्रश्न नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर त्यांनी बोलणे टाळले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाenvironmentपर्यावरण