शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

चढ्या भावाने खत विक्री करणाऱ्यांना दणका; सिल्लोडमध्ये दोन दुकानांचे परवाने निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 19:23 IST

यापुढेही अचानक भेटी देऊन अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पथकाने दिला

सिल्लोड: शेतकऱ्यांना चढ्या भावाने खत विक्री करणाऱ्या दुकानदारांना जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या पथकाने चांगलाच दणका दिला. चढ्या भावाने खत विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने रविवारी पथकाने कारवाई करत शहरातील दोन दुकानांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली.  

शहरात चढ्या भावाने खत विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने रविवारी कृषी विभागाच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून छापा मारून दुकानदारांना चढ्या भावाने खत विक्री करताना पकडले व  दोन दुकान चालकांचे परवाने निलंबित केले. परवाने निलंबीत करण्यात आलेल्या दुकानांची नावे कालिका कृषी सेवा केंद्र व एकता ऍग्रो अशी आहेत. ही कारवाई औरंगाबाद येथील जिल्हा परिषदचे अधिकारी दीपक गवळी, संतोष चव्हाण जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, संतोष भालेराव कृषी अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांच्या पथकाने केली.

बनावट ग्राहक पाठवून केली खात्रीपथकाने कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. बनावट शेतकरी ग्राहक म्हणून दुकानावर पाठवून खतांची चढ्या दराने विक्री होत असल्याची शहानिशा केली. दरम्यान, कालिका कृषी सेवा केंद्र व एकता ऍग्रो सिल्लोड या दुकानांवर जास्त दराने खतांची विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. यापुढेही अचानक भेटी देऊन अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पथकाने दिला आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी