शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ई-नाम अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या ११ बाजार समित्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 19:06 IST

कृउबामधील विकासकामांची परवानगी रोखण्याबरोबरच कठोर कारवाईचे संकेत पणन संचालकांनी दिले आहेत. 

ठळक मुद्देविकासकामांची परवानगी रोखणारऔरंगाबाद  कृउबाचा समावेश

औरंगाबाद : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या आॅनलाईन राष्ट्रीय कृषी बाजाराला (ई-नाम) राज्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी हरताळ फासला आहे. ई-नामच्या अंमलबजावणीत बाजार समित्यांनी दिरंगाई केल्याचे समोर आले आहे. या कृउबामधील विकासकामांची परवानगी रोखण्याबरोबरच कठोर कारवाईचे संकेत पणन संचालकांनी दिले आहेत. 

राज्यात केंद्र शासन पुरस्कृत दोन टप्प्यांमध्ये ६० बाजार समित्यांचा समावेश ई-नाममध्ये करण्यात आला आहे. ई-नामसाठीच्या तांत्रिक पायाभूत सुविधांसाठी प्रत्येक बाजार समितीला केंद्र शासनाकडून ३० लाखांचा निधी वितरित करण्यात आला होता. सप्टेंबर २०१७ पासून हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला होता. ई-नामच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी कृषी पणन मंडळाचे संचालक डॉ.किशोर तोष्णीवाल, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच आढावा बैठक पुण्यात घेण्यात आली. या बैठकीला ६० कृउबा समित्यांचे सचिव, जिल्हा उपनिबंधक, सहायकांची उपस्थिती होती.  यासंदर्भात पणन मंडळाच्या संचालकांनी सांगितले की, यात बाजार समित्या ई-नामच्या अंमलबजावणीत दिरंगाई करीत असल्याचे आढळून आले.ई- नामची प्राथमिकताच सर्व शेतीमालाची संगणकीकृत नोंद करणे बंधनकारक आहे. असे असतानादेखील बहुतांश बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर संगणकीकृत नोंदणी होत नसल्याचे वास्तव समोर आले. अनेक बाजार समित्यांनी खोटी आकडेवारी सादर केल्याचे प्रकारही स्पष्ट झाले. 

काही बाजार समित्यांनी एकाच शेतीमालाची नोंद करीत असल्याचेही मान्य केले. काही बाजार समित्यांमध्ये तर ई-नामचे कामकाज ठप्प पडल्याचेही दिसून आले. या प्रकारामुळे पणन संचालक डॉ.किशोर तोष्णीवाल यांनी ११ बाजार समित्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. या बाजार समित्यांमध्ये औरंगाबाद, लातूर, हिंगोली, सेनगाव, पिंपळगाव, सोलापूर, गोंदिया, आहेरी, जुन्नर, खामगाव, सांगली या बाजार समित्यांचा समावेश असल्याची माहिती पणन मंडळाने दिली. यामुळे येत्या काळात या बाजार समित्यांमधील विकासकामांवर गंडांतर येऊ शकते. 

बाजार समित्यांची नकारात्मकता- बहुतांश बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची संगणकीकृत नोंद नाही. -  शेतीमालाची आवकच होत नसलेल्यांमध्ये औरंगाबाद, गोंदिया, शिरूर बाजार समित्यांचा समावेश.-  योजनेबाबतचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांमध्ये अज्ञान.-  बनावट आकडेवारीचे सादरीकरण.-  योजनेच्या अंमलबजावणीबाबत निरुत्साह.-  अडत्यांच्या संगनमताने अंमलबजावणीमध्ये टाळाटाळ.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रState Governmentराज्य सरकार