शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जुन्या दराने जमीन अधिग्रहण, घोळ महसूल अधिकाऱ्याचा; लाखोंचा चुना शेतकऱ्यांना

By बापू सोळुंके | Updated: June 13, 2023 19:12 IST

तुटपुंजा मोबदला, बागायती जमिनी काेरडवाहू दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर : नांदूर मधमेश्वर कालवा, वितरिका, उपवितरकांसाठी जलसंपदा विभागाने संपादित जमिनीचा थेट खरेदी धोरण कायद्यानुसार मोबदला देताना एकूण मोबदल्याच्या २५ टक्के वाढीव रक्कम देणे बंधनकारक आहे. यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील भूसंपादन अधिकाऱ्यांनी तेथील शेतकऱ्यांना कायद्यानुसार मोबदला दिला. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील भूसंपादन अधिकाऱ्यांनी वैजापूर, गंगापूर तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांना एकूण मोबदल्याच्या केवळ १२.५ टक्केच मोबदला देऊन नुकसान केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

जलसंपदा विभागाने २००२ ते २०१२ या कालावधीत नांदूर- मधमेश्वर कालव्यासाठी वैजापूर ४५ गावे आणि गंगापूर तालुक्यांतील २५ तर कोपरगाव तालुक्यातील ७ गावांतील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन संपादित केली होती. नांदूर -मधमेश्वर कालवा लवकर व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी विनाअट त्यांच्या जमिनी दिल्या होत्या. या कालव्यामुळे वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील ७० गावांना दरवर्षी कालव्यातून पाणी मिळत असल्याने त्यांच्या जमिनी बागायती झाल्या आहेत.

या शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मावेजा २०१२ नंतर शासनाने देण्यास सुरुवात केली. कोणत्याही प्रकल्पासासाठी जमीन थेट खरेदीने घेताना भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३०च्या व शेड्युल १ च्या तरतुदीनुसार संबंधित जमिनीसाठी देय होणाऱ्या मोबदल्याची परिगणना जमिनीशी संबंधित सर्व बाबींची विचारात घेऊन करावी. त्यानंतर परिगणित होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रक्कमेवर २५ टक्के रक्कम वाढीव देण्यात यावी, असा नियम आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी मात्र असे केले नाही. एवढेच नव्हे तर काही प्रकरणांत अचूक परिगणना न करता शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला दिला. बागायती जमिनी काेरडवाहू दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

काय म्हणतात शेतकरी ?नागमठाण (ता.वैजापूर) येथे ४७ आर. जमीन नांदूर मधमेश्वर कालव्याच्या वितरकीसाठी संपादित करण्यात आली. आम्हाला २५ टक्के वाढीव मोबदला दिला नाही. अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी आम्हाला कोर्टाकडून आदेश आणण्याचे सांगितले.- सोन्याबापू कचरू शिरसाट (शेतकरी)

अधिकाऱ्यांनी अन्याय केलावैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथे २० आर. जमीन संपादित करण्यात आली. मोबदला २०१६ साली प्रति गुंठा दोन हजार रुपये या दराने देण्यात आला. माझ्यासह वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांवर भूसंपादन अधिकाऱ्यांनी अन्याय केला.- पंडित भानुदास शिंदे (रा. डोंगरी,धोत्रे ,ता. कोपरगाव)

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग