शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या दराने जमीन अधिग्रहण, घोळ महसूल अधिकाऱ्याचा; लाखोंचा चुना शेतकऱ्यांना

By बापू सोळुंके | Updated: June 13, 2023 19:12 IST

तुटपुंजा मोबदला, बागायती जमिनी काेरडवाहू दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर : नांदूर मधमेश्वर कालवा, वितरिका, उपवितरकांसाठी जलसंपदा विभागाने संपादित जमिनीचा थेट खरेदी धोरण कायद्यानुसार मोबदला देताना एकूण मोबदल्याच्या २५ टक्के वाढीव रक्कम देणे बंधनकारक आहे. यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील भूसंपादन अधिकाऱ्यांनी तेथील शेतकऱ्यांना कायद्यानुसार मोबदला दिला. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील भूसंपादन अधिकाऱ्यांनी वैजापूर, गंगापूर तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांना एकूण मोबदल्याच्या केवळ १२.५ टक्केच मोबदला देऊन नुकसान केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

जलसंपदा विभागाने २००२ ते २०१२ या कालावधीत नांदूर- मधमेश्वर कालव्यासाठी वैजापूर ४५ गावे आणि गंगापूर तालुक्यांतील २५ तर कोपरगाव तालुक्यातील ७ गावांतील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन संपादित केली होती. नांदूर -मधमेश्वर कालवा लवकर व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी विनाअट त्यांच्या जमिनी दिल्या होत्या. या कालव्यामुळे वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील ७० गावांना दरवर्षी कालव्यातून पाणी मिळत असल्याने त्यांच्या जमिनी बागायती झाल्या आहेत.

या शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मावेजा २०१२ नंतर शासनाने देण्यास सुरुवात केली. कोणत्याही प्रकल्पासासाठी जमीन थेट खरेदीने घेताना भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३०च्या व शेड्युल १ च्या तरतुदीनुसार संबंधित जमिनीसाठी देय होणाऱ्या मोबदल्याची परिगणना जमिनीशी संबंधित सर्व बाबींची विचारात घेऊन करावी. त्यानंतर परिगणित होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रक्कमेवर २५ टक्के रक्कम वाढीव देण्यात यावी, असा नियम आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी मात्र असे केले नाही. एवढेच नव्हे तर काही प्रकरणांत अचूक परिगणना न करता शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला दिला. बागायती जमिनी काेरडवाहू दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

काय म्हणतात शेतकरी ?नागमठाण (ता.वैजापूर) येथे ४७ आर. जमीन नांदूर मधमेश्वर कालव्याच्या वितरकीसाठी संपादित करण्यात आली. आम्हाला २५ टक्के वाढीव मोबदला दिला नाही. अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी आम्हाला कोर्टाकडून आदेश आणण्याचे सांगितले.- सोन्याबापू कचरू शिरसाट (शेतकरी)

अधिकाऱ्यांनी अन्याय केलावैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथे २० आर. जमीन संपादित करण्यात आली. मोबदला २०१६ साली प्रति गुंठा दोन हजार रुपये या दराने देण्यात आला. माझ्यासह वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांवर भूसंपादन अधिकाऱ्यांनी अन्याय केला.- पंडित भानुदास शिंदे (रा. डोंगरी,धोत्रे ,ता. कोपरगाव)

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग