शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जुन्या दराने जमीन अधिग्रहण, घोळ महसूल अधिकाऱ्याचा; लाखोंचा चुना शेतकऱ्यांना

By बापू सोळुंके | Updated: June 13, 2023 19:12 IST

तुटपुंजा मोबदला, बागायती जमिनी काेरडवाहू दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर : नांदूर मधमेश्वर कालवा, वितरिका, उपवितरकांसाठी जलसंपदा विभागाने संपादित जमिनीचा थेट खरेदी धोरण कायद्यानुसार मोबदला देताना एकूण मोबदल्याच्या २५ टक्के वाढीव रक्कम देणे बंधनकारक आहे. यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील भूसंपादन अधिकाऱ्यांनी तेथील शेतकऱ्यांना कायद्यानुसार मोबदला दिला. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील भूसंपादन अधिकाऱ्यांनी वैजापूर, गंगापूर तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांना एकूण मोबदल्याच्या केवळ १२.५ टक्केच मोबदला देऊन नुकसान केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

जलसंपदा विभागाने २००२ ते २०१२ या कालावधीत नांदूर- मधमेश्वर कालव्यासाठी वैजापूर ४५ गावे आणि गंगापूर तालुक्यांतील २५ तर कोपरगाव तालुक्यातील ७ गावांतील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन संपादित केली होती. नांदूर -मधमेश्वर कालवा लवकर व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी विनाअट त्यांच्या जमिनी दिल्या होत्या. या कालव्यामुळे वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील ७० गावांना दरवर्षी कालव्यातून पाणी मिळत असल्याने त्यांच्या जमिनी बागायती झाल्या आहेत.

या शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मावेजा २०१२ नंतर शासनाने देण्यास सुरुवात केली. कोणत्याही प्रकल्पासासाठी जमीन थेट खरेदीने घेताना भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३०च्या व शेड्युल १ च्या तरतुदीनुसार संबंधित जमिनीसाठी देय होणाऱ्या मोबदल्याची परिगणना जमिनीशी संबंधित सर्व बाबींची विचारात घेऊन करावी. त्यानंतर परिगणित होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रक्कमेवर २५ टक्के रक्कम वाढीव देण्यात यावी, असा नियम आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी मात्र असे केले नाही. एवढेच नव्हे तर काही प्रकरणांत अचूक परिगणना न करता शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला दिला. बागायती जमिनी काेरडवाहू दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

काय म्हणतात शेतकरी ?नागमठाण (ता.वैजापूर) येथे ४७ आर. जमीन नांदूर मधमेश्वर कालव्याच्या वितरकीसाठी संपादित करण्यात आली. आम्हाला २५ टक्के वाढीव मोबदला दिला नाही. अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी आम्हाला कोर्टाकडून आदेश आणण्याचे सांगितले.- सोन्याबापू कचरू शिरसाट (शेतकरी)

अधिकाऱ्यांनी अन्याय केलावैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथे २० आर. जमीन संपादित करण्यात आली. मोबदला २०१६ साली प्रति गुंठा दोन हजार रुपये या दराने देण्यात आला. माझ्यासह वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांवर भूसंपादन अधिकाऱ्यांनी अन्याय केला.- पंडित भानुदास शिंदे (रा. डोंगरी,धोत्रे ,ता. कोपरगाव)

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग