शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गोळीबार करून अपहरण प्रकरणातील आरोपी ८  तासांत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:29 IST

या प्रकरणातील चार आरोपींनी ५० लाखांच्या खंडणीसाठी अखिलेश गुप्ता यांना शिवना भागातील खुपटा गावाच्या शिवारातील त्यांच्या शेताजवळ चारचाकी वाहनातून जात असताना अडविले होते. 

ठळक मुद्देआरोपीनी हे अपहरण ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी केले असल्याची कबुली दिली

सिल्लोड/ शिवना : पन्नास लाखांच्या खंडणीसाठी सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात रविवारी सायंकाळी व्यापाऱ्याच्या अपहरणाचा प्रकार घडला होता. या घटनेत अखिलेश सुधीर गुप्ता आरोपींच्या तावडीतून सुटल्याने त्यांच्यावर गोळीबारसुद्धा करण्यात आला होता. याप्रकरणी अजिंठा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या आठ तासांत अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्टल, एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

जिल्ह्यात खळबळ उडविणाऱ्या या घटनेबाबतची माहिती अशी की, या प्रकरणातील चार आरोपींनी ५० लाखांच्या खंडणीसाठी अखिलेश गुप्ता यांना शिवना भागातील खुपटा गावाच्या शिवारातील त्यांच्या शेताजवळ चारचाकी वाहनातून जात असताना अडविले होते. यादरम्यान आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवीत गाडीतील मजुरांना खाली उतरवले होते. गुप्ता यांना त्यांच्याच गाडीत बसवीत अपहर करण्याचा डाव त्यांनी आखला होता; परंतु गुप्ता आरोपींच्या तावडीतून निसटल्याने आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर गुप्ता यांनी अजिंठा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणात कृष्णा माणिकराव काळे (२२, रा.शिवना), सागर संतोष सोनवणे (२३, रा.आडगाव भोबे), वैभव कालभिले (२३, रा. नाटवी), सचिन चिंधू सोनवणे (२५, रा.जळगाव), या आरोपींना ताब्यात घेतले. यासाठी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर, पोहेकॉ आबासाहेब आव्हाड, अक्रम पठाण, नीलेश शिरस्कर, कौतिक चव्हाण, रविकिरण भारती, प्रवीण बोदवडे, प्रदीप बेदरकर आदींनी आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपींकडून कबुलीआरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्टल, त्यासोबत एक जिवंत काडतूस, मोटारसायकल, ३ मोबाईल व एक लाख रुपये पोलिसांनी जप्त केले. आरोपीनी हे अपहरण ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी केले असल्याची कबुली दिली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांनी दिली. 

अवघ्या ८ तासांत गुन्हा उघडअजिंठा पोलिसांसमोर हा गुन्हा उघड करण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांना गोपनीय मिळालेल्या माहितीवरून त्यांनी प्रथम या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेले दोन आरोपी रात्रीच जेरबंद केले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने इतर दोन आरोपींना ताब्यात घेतले. अजिंठा पोलीस व गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या आठ तासांत हा गुन्हा उघड केला.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद