शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

खून खटल्यांच्या तपासातील सुसूत्रता आणि सातत्याच्या अभावामुळे मारेकरी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 20:09 IST

अनेक खुनाचा तपास गुलदस्त्यात राहण्याची शक्यता

ठळक मुद्देगुन्हे तपासाऐवजी बंदोबस्तासाठीच पोलिसांचा वापर किरकोळ स्वरूपाच्या कारवाया करताना पोलीस दिसतात.

औरंगाबाद : श्रुती भागवत, अमिनाबी पटेल, अंकुश खाडे, तसेच जुना मोंढा परिसरातील काळीबावडी येथे झालेल्या सेल्समनच्या खुनाच्या तपासाप्रमाणेच गुलमंडीवरील कमलेश ऊर्फ प्रकाश पटेल यांच्या खुनाचा तपास गुलदस्त्यात राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खबऱ्याचे तुटलेले नेटवर्क, तपासातील सुसूत्रता आणि सातत्याच्या अभावामुळे  पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.  

गुलमंडीतील नगारखाना गल्लीतील कुरिअर कंपनीचा व्यवस्थापक  कमलेश ऊर्फ प्रकाश पटेल यांचा ३१ जानेवारी रोजी चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला दीड महिना होत आला तरी पोलिसांना मारेकऱ्याचे धागेदोरे मिळाले नाहीत. सिटीचौक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या खुनाचा तपास करण्यासाठी सुरुवातीला काही दिवस प्रयत्न केले. आता वाहनचोरी, अवैध दारू विक्रे त्यांना पकडणे आदी किरकोळ स्वरूपाच्या कारवाया करताना पोलीस दिसतात. गुन्ह्याच्या तपासाशिवाय पोलिसांची सर्वाधिक शक्ती बंदोबस्ताच्या कामावर खर्ची होते. परिणामी, तपासात सातत्य राहत नाही. झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तपास पथकात अभाव असेल तर यश मिळत नसल्याचे दिसून येते.

रखडलेले तपास१८ मे २०१२ रोजी उल्कानगरी परिसरातील रहिवासी शिक्षिका श्रुती भागवत यांचा घरात घुसून अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला होता. हत्येनंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्नही झाला होता. या घटनेला आठ वर्षे होत आले तरी मारेकरी पोलिसांना पकडता आले नाहीत.

२०१३ साली दूधविक्रेता अंकुश खाडे यांचा गोळी झाडून खून क रण्यात आला. अंकुशच्या खुनाचा तपास मुकुंदवाडी पोलीस आणि गुन्हे शाखेने समांतर पातळीवर केला. मात्र, पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. शेवटी या गुन्ह्याच्या तपासाची अ समरी तयार करून तत्कालीन तपास अधिकारी मोकळे झाले.

३० आॅगस्ट २०१४ रोजी मिटमिटा शिवारात गुरे चारण्यासाठी गेलेल्या अमिनाबी पठाण यांचा निर्घृण खून करून मारेकऱ्यांनी त्यांचा मृतदेह झाडाला लटकावला होता. याविषयी छावणी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. गुन्हे शाखेने या घटनेचा तपास अनेक दिवस केला. मात्र, अजूनही अमिनाबी यांचे मोरकरी मोकाट आहेत.

२०१७ मध्ये सिटीचौकातील औषधी दुकानावर सेल्समन म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा निर्घृण खून करून मृतदेह जुना मोंढा नाक्याजवळील काळीबावडीजवळ फेक ण्यात आला  होता. या खुनाचा उलगडाही पोलिसांना करता आला नाही.                                                                                                     गुन्हे तपासाऐवजी बंदोबस्तासाठीच पोलिसांचा वापरपूर्वीची बीट आणि पोलीस चौकीची अत्यंत महत्त्वाची होती. चौकीत फौजदार बसायचे तर बीट हवालदार रात्रंदिवस बीटमध्ये राहून जनतेशी संपर्क ठेवत. यामुळे त्याच्या बीटमध्ये घडणाऱ्या प्रत्येक हालचालींची माहिती त्यांना मिळत होती. आता बीट हवालदारांना आंदोलन, मोर्चा, सभा, संमेलनाच्या बंदोबस्तासाठी नेमले जाते. परिणामी तपास कामात सातत्य न राहिल्यास कोणत्याही गुन्ह्यांचे तपास रखडतात.

- नरेश मेघराजानी, निवृत्त पोलीस उपअधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस