शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

औरंगाबादमधील बीड बायपासवरील अवजड वाहतूक बंद केल्याने घटले प्राणांतिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 19:33 IST

जड वाहनांमुळे बायपासवर होणारे अपघात अडीच महिन्याच्या कालावधीत घटल्याचे समोर आले. 

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचे प्रयत्न  सकाळ, सायंकाळ अवजड वाहतूक बंदच्या प्रयोगाला यश

औरंगाबाद : अपघाताना आळा घालण्यासाठी बीड बायपासवरील जड वाहतूक सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत बंद करण्याचा पोलीस आयुक्तांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. जड वाहनांमुळे बायपासवर होणारे अपघात अडीच महिन्याच्या कालावधीत घटल्याचे समोर आले. 

दहा ते पंधरा वर्षांपासून सकाळी ६ ते रात्री १२ या कालावधीत जालना रस्त्यावर जड वाहनांना प्रवेशबंदी आहे. तेव्हापासून जालना रस्त्यावरील जड वाहनांना  बीड बायपास हा पर्यायी मार्ग देण्यात आला. त्यामुळे जालना रस्त्यावरील अपघातावर नियंत्रण आले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बीड बायपासच्या पलीकडे नागरी वसाहतींची संख्या वाढत आहे. तेव्हापासून बायपासवरील अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच आहे. 

बायपासवरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी २ सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर या रस्त्यावर जड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या कालावधीत प्रवेशबंदी केली. हा निर्णय घेण्यापूर्वी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत बायपासवर विविध अपघातात १२ जणांचे बळी गेले होते. 

शिवाय ८ जण गंभीर आणि ५ जण किरकोळ जखमी झाले होते. तर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षभराच्या कालावधीत ९ जणांचे बळी गेले. १३ जण गंभीर आणि ३ जण किरकोळ जखमी झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बायपासवरील अपघातांमधील मृत्यू आणि गंभीर जखमींची संख्या वाढली होती.  यामुळे पोलीस आयुक्तांनी बीड बायपासवरील अवजड वाहतूक बंद  करण्याचा प्रयोग यशस्वी होत असल्याचे  दिसत आहे. 

पर्यायी रस्ता हवा गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बायपासवरील अपघातांमधील बळींची संख्या वाढल्याचे दिसून येते. या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर जड वाहनांना सकाळ, सायंकाळ प्रवेशबंदी केली. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने बायपासवरील जड वाहनांसाठी दुसरा पर्यायी रस्ता तातडीने होणे आवश्यक आहे.- एच. एस. भापकर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा 

आकडेवारीवर दृष्टिक्षेप                                            गतवर्षी   यावर्षीअपघातांतील बळींची संख्या     ९           १२गंभीर जखमी                          १३          ०८किरकोळ जखमी                     ०३         ०५

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादAccidentअपघात