शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

नकोशा बाळांसाठी जीवनदायी ठरतोय 'स्वीकार पाळणा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 19:22 IST

Aurangabad News शहरातील अनाथ बाळांचे संगोपन व त्यांना योग्य कुटुंबात दत्तक देणारी संस्था ‘साकार’ने ज्योतीनगरात संस्थेच्या कार्यालयाबाहेर पाळणा ठेवला आहे.

ठळक मुद्देमागील ६ वर्षांत अभागी मातांनी ५ बाळांना टाकले या पाळण्यात

औरंगाबाद : ज्योतीनगरात रस्त्याचा कडेला एक पाळणा येणारा- जाणारांचे लक्ष वेधत आहे. हा पाळणा येथे का ठेवला असेल, असा प्रश्न पडला नसेल तर नवल. मात्र, मागील सहा वर्षांत अभागी मातांनी ५ नकोशी बाळांचा त्याग करून त्यांना या पाळण्यात सोडले आहे. सध्या हा पाळणा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 

जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला जगण्याचा अधिकार आहे. मात्र, काही माता अशा आहेत की, त्यांना आपल्या बाळाला नाईलाजाने त्यागण्याची वेळ येते. अनेकदा अशा बाळांना कुठे कचरा कुंडीत, तर कुठे निर्मनुष्य ठिकाणी, रस्त्याच्या कडेला टाकून दिले जाते किंवा त्यांची हत्या केली जाते. परिस्थिती कोणतीही असो; पण जन्माला आलेल्या बाळाला जगण्याचा हक्क आहे. 

यामुळेच शहरातील अनाथ बाळांचे संगोपन व त्यांना योग्य कुटुंबात दत्तक देणारी संस्था ‘साकार’ने ज्योतीनगरात संस्थेच्या कार्यालयाबाहेर पाळणा ठेवला आहे. तेथे ‘अनाथ तान्हुल्याचा स्वीकार पाळणा’ असे नाव दिले आहे. एखादी माता काही कारणास्तव आपल्या बाळचे पालन पोषण करण्यास असमर्थ असेल. त्याचा त्याग करायचा असेल, तर तिने भीती पोटी कोणत्याही असुरक्षित ठिकाणी बाळाला न सोडता, साकार संस्थेच्या या पाळण्यात आणून ठेवावे व तिथे असलेली बेल वाजवावी. अशी सूचना लिहिण्यात आली आहे.

१४ नोव्हेंबर २०१४ रोजी हा पाळणा ठेवण्यात आला आहे. आजपर्यंत ५ बाळांना या पाळण्यात ठेवून अभागी माता निघून गेल्या आहेत. यात प्रामुख्याने मुलींचा समावेश होता. या  पाळण्यामुळे त्या बाळांचा जीव वाचला व आज त्या बाळांना दत्तक विधानाद्वारे माता-पिता लाभले आहेत. पाळणा नसता, तर त्या बाळांचे काय झाले असते, याची कल्पना करवत नाही, असे या साकार संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पाळण्यात बाळ आले की, आपण पहिले त्या बाळास उचलून कार्यालयात नेले जाते. नंतर बालकल्याण समितीला व पोलिसांना कळविले जाते. त्या बाळाची घाटीमध्ये तपासणी करून बालकल्याण समितीच्या आदेशाने त्या बाळास प्रवेशित करून घेतले जाते. पाळणा जिथे आहे तिथे एक बेल बसविली आहे व लिहिले आहे की, बाळ पाळण्यात ठेवल्यावर बेल वाजवावी. बेल वाजली की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघून मॅनेजर खात्री करून घेतात व बाळ  दिसल्यास आयाला बोलावून बाळ संस्थेत घेतले जाते, नंतर बालकल्याण समितीशी संपर्क साधला जातो.

बालकल्याण समितीच्या आदेशाने कार्यसेंट्रल आडोप्शन रिसोर्स अथोरिटीच्या नियमानुसार साकार संस्थेने पाळणा ठेवला आहे. कोणी पाळण्यात बाळ आणून टाकल्यानंतर बेल वाजल्यावर लगेच त्या बाळाला संस्थेत नेले जाते व त्याची माहिती पोलिसांना व बालकल्याण समितीला दिली जाते. त्यानंतर तपासणीसाठी त्या अनाथ बाळाला घाटीत नेले जाते. बालकल्याण समितीच्या आदेशाने त्या बाळाला संस्थेत प्रवेश दिला जातो व नंतर दत्तक विधानाद्वारे त्या बालकास हक्काचे आई- वडील मिळवून दिले जातात. -नीलिमा पांडे, उपाध्यक्ष, साकार

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsocial workerसमाजसेवक