शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
3
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
4
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
5
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
6
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
7
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
8
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
9
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
10
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
11
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
13
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
14
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
15
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
16
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
17
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
18
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
19
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
20
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...

सुमारे २०० घरांवर पाडापाडीचे संकट; विकास आराखड्यात साताऱ्यातील ‘तो’ रस्ता रद्द करा

By मुजीब देवणीकर | Updated: April 8, 2024 13:23 IST

नागरिकांनी राबविली सह्यांची मोहीम; शासनाने या शिफारसीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मागील महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात सातारा परिसरातील विविध गटांमधून टाकण्यात आलेल्या रस्त्यामुळे सुमारे २०० घरांवर संकट कोसळले आहे. नागरिकांनी महापालिकेकडे आक्षेप दाखल केले आहेत. विशेष म्हणजे सिडकोच्या विकास आराखड्यातून हा रस्ता वगळण्यात यावा, अशी शिफारस शासनाकडे करण्यात आली होती. परंतु, शासनाकडून ही शिफारस फेटाळून लावण्यात आली. शासनाने या शिफारसीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

सिडकोने २००९ मध्ये झालर पट्ट्यातील २६ गावांसाठी विकास आराखडा तयार केला होता. सिडकोने तयार केलेल्या आराखड्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. सातारा ग्रामपंचायतीनेही आक्षेप दाखल केला होता. या आक्षेपांची स्थळ पाहणी सिडकोने नियुक्त केलेल्या समितीमार्फत करण्यात आली होती. समितीच्या सदस्यांनी नागरिकांच्या घरावरून हा रस्ता टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. रस्ता रद्द करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याचे आश्वासन दिले होते. शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव शासनाकडून फेटाळण्यात आला.

नवीन आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या रस्त्यामुळे सातारा परिसरातील गटनंबर ९१, ९२, ९५, ९६, ९९, १०३, १०४, १०६, १०९, १५९, १६९ मधील सुमारे दोनशे घरांवर पाडापाडीचे संकट आले आहे. त्यामुळे या गटातील नागरिकांनी आक्षेप दाखल केले आहेत. या आक्षेपावर रामदास खलसे, सुलभा कुलकर्णी, अभयकुमार जोशी, संजय जोशी, अक्षय कुलकर्णी, तानाजी गायकवाड, कलावती मनगटे, अशोक गायकवाड, प्रवीण मोहिते, दीपक महादेकर, विजय राऊत, प्रभाकर चव्हाण, योगेश शिंदे, नारायण गाडेकर, देविदास पाखले, बाळासाहेब कुलकर्णी, विश्वास चौधरी, अमोल खिल्लारे, विजयकुमार माने, अनंतकुमार भारती, दिलीप पाळदे, रुपेश राजहंस, नामदेव शिरसाट, राजीव आढाव यांच्यासह दीडशे नागरिकांच्या सह्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका