शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सुमारे २०० घरांवर पाडापाडीचे संकट; विकास आराखड्यात साताऱ्यातील ‘तो’ रस्ता रद्द करा

By मुजीब देवणीकर | Updated: April 8, 2024 13:23 IST

नागरिकांनी राबविली सह्यांची मोहीम; शासनाने या शिफारसीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मागील महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात सातारा परिसरातील विविध गटांमधून टाकण्यात आलेल्या रस्त्यामुळे सुमारे २०० घरांवर संकट कोसळले आहे. नागरिकांनी महापालिकेकडे आक्षेप दाखल केले आहेत. विशेष म्हणजे सिडकोच्या विकास आराखड्यातून हा रस्ता वगळण्यात यावा, अशी शिफारस शासनाकडे करण्यात आली होती. परंतु, शासनाकडून ही शिफारस फेटाळून लावण्यात आली. शासनाने या शिफारसीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

सिडकोने २००९ मध्ये झालर पट्ट्यातील २६ गावांसाठी विकास आराखडा तयार केला होता. सिडकोने तयार केलेल्या आराखड्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. सातारा ग्रामपंचायतीनेही आक्षेप दाखल केला होता. या आक्षेपांची स्थळ पाहणी सिडकोने नियुक्त केलेल्या समितीमार्फत करण्यात आली होती. समितीच्या सदस्यांनी नागरिकांच्या घरावरून हा रस्ता टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. रस्ता रद्द करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याचे आश्वासन दिले होते. शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव शासनाकडून फेटाळण्यात आला.

नवीन आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या रस्त्यामुळे सातारा परिसरातील गटनंबर ९१, ९२, ९५, ९६, ९९, १०३, १०४, १०६, १०९, १५९, १६९ मधील सुमारे दोनशे घरांवर पाडापाडीचे संकट आले आहे. त्यामुळे या गटातील नागरिकांनी आक्षेप दाखल केले आहेत. या आक्षेपावर रामदास खलसे, सुलभा कुलकर्णी, अभयकुमार जोशी, संजय जोशी, अक्षय कुलकर्णी, तानाजी गायकवाड, कलावती मनगटे, अशोक गायकवाड, प्रवीण मोहिते, दीपक महादेकर, विजय राऊत, प्रभाकर चव्हाण, योगेश शिंदे, नारायण गाडेकर, देविदास पाखले, बाळासाहेब कुलकर्णी, विश्वास चौधरी, अमोल खिल्लारे, विजयकुमार माने, अनंतकुमार भारती, दिलीप पाळदे, रुपेश राजहंस, नामदेव शिरसाट, राजीव आढाव यांच्यासह दीडशे नागरिकांच्या सह्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका