शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आज महिलांवर होणारे अत्याचार पाहता लाज वाटावी, अशी परिस्थिती: भालचंद्र नेमाडे

By बापू सोळुंके | Updated: August 12, 2023 12:59 IST

ब्रिटिशांनी एवढी पापं केली की त्यांना काही फाइल बंद ठेवाव्या लागल्या.

छत्रपती संभाजीनगर : बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव यांनी महिलांच्या कल्याणासाठी अनेक कायदे केले. आज महिलांवर होणारे अत्याचार पाहता लाज वाटावी, अशी परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवडमधून दरवर्षी ३०० मुली पळविल्या जातात, तर आसाममध्ये घरकामासाठी दीड लाखात मुलीची विक्री होते. मणिपूरची भयावह परिस्थिती पाहता प्रत्येक जाती-जमातीसाठी स्वतंत्र कायद्याची गरज आहे, असे मत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक बाबा भांड संपादित सार्वभौम महाराजा सयाजीराव स्वातंत्र्यवीरांचे पाठीराखे पुस्तकांचे प्रकाशन शुक्रवारी सायंकाळी एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगीराजे गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. नेमाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि प्रा. डॉ. उमेश बगाडे, लेखक भांड व्यासपीठावर उपस्थित होते.

नेमाडे म्हणाले की, ब्रिटिशांनी एवढी पापं केली की त्यांना काही फाइल बंद ठेवाव्या लागल्या. यातील पंधरा फायलींमधून सयाजीरावांनी क्रांतिकारकांना केलेल्या मदतीचे तपशील मिळतात. त्यांनी सामाजिक सुधारणा अधिक केल्या होत्या. पण, आपल्या इतिहासात त्यांचा उल्लेखही नव्हता. बाबा भांड यांनी लंडनमधील बंद फायलींचा अनुवाद करून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये हे ग्रंथ प्रकाशित केल्याने त्यांचा गुरू म्हणून अभिमान वाटतो. राजद्रोहाच्या कायद्याचा ब्रिटिशांनी स्वैर वापर केला होता. पण, ७५ वर्षांनंतरही आपल्या देशात हा कायदा लागू आहे. स्वातंत्र्याला बेदखल करणारा हा कायदा आहे.

सयाजीराव स्वातंत्र्याचे भोक्तेहा ग्रंथ आपल्याला समकालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो. महाराष्ट्र हा स्वातंत्र्याची प्रेरणा असलेली भूमी आहे आणि सयाजीराव त्या प्रेरणेचे भोक्ते होते. त्यांची राष्ट्रीय चळवळीला सहानुभूती होती, असे डॉ. बगाडे म्हणाले. ब्रिटिश लायब्ररीतून बंद असलेल्या पंधरा फाइल मिळाल्या. त्यातून स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकता आला, असे बाबा भांड प्रास्ताविकात म्हणाले. प्रकल्पासाठी सहकार्य करणारे राहुल मगर, प्राचार्य एम. एम. तांबे, शाहीर अजिंक्य लिंगायत आणि संतोष पाटे यांचा सत्कार करण्यात आला. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. शिव कदम यांनी आभार मानले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्यmarathiमराठी