शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

आज महिलांवर होणारे अत्याचार पाहता लाज वाटावी, अशी परिस्थिती: भालचंद्र नेमाडे

By बापू सोळुंके | Updated: August 12, 2023 12:59 IST

ब्रिटिशांनी एवढी पापं केली की त्यांना काही फाइल बंद ठेवाव्या लागल्या.

छत्रपती संभाजीनगर : बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव यांनी महिलांच्या कल्याणासाठी अनेक कायदे केले. आज महिलांवर होणारे अत्याचार पाहता लाज वाटावी, अशी परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवडमधून दरवर्षी ३०० मुली पळविल्या जातात, तर आसाममध्ये घरकामासाठी दीड लाखात मुलीची विक्री होते. मणिपूरची भयावह परिस्थिती पाहता प्रत्येक जाती-जमातीसाठी स्वतंत्र कायद्याची गरज आहे, असे मत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक बाबा भांड संपादित सार्वभौम महाराजा सयाजीराव स्वातंत्र्यवीरांचे पाठीराखे पुस्तकांचे प्रकाशन शुक्रवारी सायंकाळी एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगीराजे गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. नेमाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि प्रा. डॉ. उमेश बगाडे, लेखक भांड व्यासपीठावर उपस्थित होते.

नेमाडे म्हणाले की, ब्रिटिशांनी एवढी पापं केली की त्यांना काही फाइल बंद ठेवाव्या लागल्या. यातील पंधरा फायलींमधून सयाजीरावांनी क्रांतिकारकांना केलेल्या मदतीचे तपशील मिळतात. त्यांनी सामाजिक सुधारणा अधिक केल्या होत्या. पण, आपल्या इतिहासात त्यांचा उल्लेखही नव्हता. बाबा भांड यांनी लंडनमधील बंद फायलींचा अनुवाद करून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये हे ग्रंथ प्रकाशित केल्याने त्यांचा गुरू म्हणून अभिमान वाटतो. राजद्रोहाच्या कायद्याचा ब्रिटिशांनी स्वैर वापर केला होता. पण, ७५ वर्षांनंतरही आपल्या देशात हा कायदा लागू आहे. स्वातंत्र्याला बेदखल करणारा हा कायदा आहे.

सयाजीराव स्वातंत्र्याचे भोक्तेहा ग्रंथ आपल्याला समकालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो. महाराष्ट्र हा स्वातंत्र्याची प्रेरणा असलेली भूमी आहे आणि सयाजीराव त्या प्रेरणेचे भोक्ते होते. त्यांची राष्ट्रीय चळवळीला सहानुभूती होती, असे डॉ. बगाडे म्हणाले. ब्रिटिश लायब्ररीतून बंद असलेल्या पंधरा फाइल मिळाल्या. त्यातून स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकता आला, असे बाबा भांड प्रास्ताविकात म्हणाले. प्रकल्पासाठी सहकार्य करणारे राहुल मगर, प्राचार्य एम. एम. तांबे, शाहीर अजिंक्य लिंगायत आणि संतोष पाटे यांचा सत्कार करण्यात आला. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. शिव कदम यांनी आभार मानले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्यmarathiमराठी