शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अवघ्या तीनशे रुपयांतच बांधली रेशीमगाठ; ऑनलाइनही भरू शकता 'नोंदणी विवाह' अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:51 IST

ना बॅन्डबाजा, ना शाही थाट; पालकांची संमती नसल्यास काय?

छत्रपती संभाजीनगर : हल्ली डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड आलेला आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो आहे. असे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे मागील वर्षभरात सुमारे ६६७ जोडप्यांनी विवाह बॅण्डबाजा, शाही थाट न करता ३०० रुपये खर्चाच्या आत नोंदणी कार्यालयात रेशीमगाठ बांधली. एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक नोंदणी विवाह झाले. कमी खर्चात, कमी गर्दीत आणि कायदेशीररीत्या प्रक्रियेमुळे नाेंदणी विवाह करणाऱ्यांचा आकडा वाढतो आहे.

‘डेस्टिनेशन वेडिंग’चे बजेट ५० लाखांपर्यंत!डेस्टिनेशन वेडिंगचे बजेट सध्या ५० लाखांपर्यंत गेले आहेत. भविष्यात यात आणखी वाढ होईल.

कोरोनात लग्नाला फक्त ५० वऱ्हाडी!...कोरोनात लग्नाला फक्त ५० वऱ्हाडीचे बंधन होते. त्याकाळात नोंदणी विवाहाला अनेकांनी पसंती दिली.

दमछाक नकोय; नोंदणी विवाहाला अनेकांची पसंती ...गर्दी, खर्च, धावपळ नको असणारी मंडळी नोंदणी विवाहाला पसंती देत असल्याचे आकड्यांवरून दिसते आहे.

वर्षभरात किती जोडप्यांनी नोंदणी विवाह केला?महिना.....             विवाहजानेवारी - ६०फेब्रुवारी - ५६मार्च - ५३एप्रिल - ७७मे - ६०जून - ५९जुलै - ५४ऑगस्ट - ४८सप्टेंबर - ३१ऑक्टोबर - ५१नोव्हेंबर - ६४डिसेंबर- ५४

नोंदणी विवाहाला किती खर्च येतो?३०० रुपयांच्या दरम्यान नोंदणी विवाहाला खर्च येतो.

ऑनलाइनही भरू शकता अर्ज...ऑनलाइन अर्ज केल्यानंतर वधू-वरांना ऑनलाईन नोटीस क्रमांक जातो. ३२ दिवसांनंतर विवाहाची तारीख दिली जाते. त्यानंतर ६० दिवसांच्या आत विवाह करणे गरजेचे असते.

काय कागदपत्रे लागतात?वधू-वर यांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, वधू-वर यांच्या वयाचा, ओळखीचा व रहिवासी पत्ता असणारा पुरावा, तीन साक्षीदारांच्या ओळखीचा व रहिवासी पत्ता असणारा पुरावा आवश्यक आहे.

पालकांची संमती नसल्यास काय?वधू-वर सज्ञान असतील तर पालकाच्या संमतीचा मुद्दा नसतो. विवाह नोटीस निघाल्यानंतर कुणी हरकत घेतली तर विवाह प्रक्रिया थांबते.

नाेंदणी विवाहाकडे कल...खर्च नको म्हणून अनेकांचा नोंदणी विवाहाकडे कल वाढतो आहे. चार वर्षांपासून नोंदणी विवाहाचे प्रमाण वाढते आहे.-विवाह नोंदणी अधिकारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmarriageलग्न