शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्रत्येक गावांतून लोकसभेसाठी किमान दोन उमेदवार देण्यासाठी मराठा समाजाच्या बैठकांचे सत्र

By बापू सोळुंके | Updated: March 14, 2024 18:01 IST

तालुकास्तरीय बैठकांमध्ये उमेदवारी दाखल करण्याचे ठराव

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत टिकणारे आरक्षण द्यावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात लावण्यात आलेली एसआयटी रद्द करावी, या मागणीसाठी मराठा समाजाने आता आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यकर्त्यांची कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावांतून किमान दोन उमेदवार देण्याचा ठराव तालुकास्तरीय बैठकांमध्ये घेतला जात आहे. शासनाने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला १० टक्के एसईबीसी आरक्षण दिले. जरांगे यांनी हे आरक्षण अमान्य करीत सगेसोयऱ्याचा कायदा करावा आणि ओबीसीतूनच आरक्षण द्यावे, ही मागणी लावून धरली आहे. यानंतर राज्य सरकारने जरांगे यांच्याविरोधात एसआयटीची स्थापना केली. यादरम्यान मराठा आरक्षणाविरोधात पुन्हा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवाय न्यायालयानेही या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून एसईबीसी आरक्षणाची पदभरतीचा लाभ आणि इतर सवलती असतील, असे स्पष्ट केले. 

यामुळे मराठा समाजाने आता राज्यकर्त्यांना थेट लोकसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, गंगापूर या तालुक्यांतील मराठा समाजाच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. मागील आठवड्यात गंगापूर येथे ५ मार्च रोजी झालेल्या बैठकीत प्रत्येक तालुक्यातून किमान दोन जणांनी उमेदवारी दाखल करावी, असा ठराव घेण्यात आला. गंगापूर तालुक्यात २२४ गावे आहेत. दोन दिवसांपूर्वी वैजापूर येथे झालेल्या बैठकीत तालुक्यातून १६५ गावांतून तब्बल ६६० मराठा बांधव उमेदवारी दाखल करणार आहेत. कन्नड तालुक्यातील मराठा समाजाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत १३८ गावांतून प्रत्येकी दोन उमेदवार मराठा समाज देणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठा समाजातील सक्रिय पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला.

किमान १०० जण उमेदवारी दाखल करतीललहान गावातून एक, दोन तर मोठ्या गावांतून चार ते पाच जणांनी उमेदवारी दाखल करण्याचा ठराव सकल मराठा समाजाच्या बैठकांमध्ये घेतला जात आहे. निवडणूक अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याविषयीची माहिती व्हॉट्सअपद्वारे पुरविली जात आहे. शिवाय मराठा उमेदवारांची यादीही सकल मराठा समाज गोळा करीत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही किमान १०० जण उमेदवारी दाखल करतील.-प्रा. चंद्रकांत भराट, संयोजक, सकल मराठा समाज.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण