शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

चार कुटुंबांवर काळोख! डीपीसाठी विद्युतवाहिनी जोडताना ४ मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 19:25 IST

शेतातून तारा पसरत नेऊन डीपीपर्यंत नेत असताना अचानक विद्युतप्रवाह त्यात उतरल्याने अनर्थ झाला

कन्नड (औरंगाबाद): नविन डीपीला विद्यूत वाहिन्या जोडताना विजेचा धक्का लागून चार मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी हिवरखेडा ( नांदगिर वाडी ) शिवारात घडली. आदिनाथ बाळकृष्ण मगर( २८ ), भारत बाबासाहेब वरकड ( ३२), गणेश नारायण थेटे ( २८ ) व जगदीश छगनराव मुरकुंडे ( ३७, सर्व रा. नावडी ता. कन्नड) अशी मृतांची नावे आहेत. 

कन्नड येथील हिवरखेडा ( नांदगीरवाडी ) शिवारात नविन डीपी बसविण्याचे काम सुरु आहे. येथे अर्जुन बाळकृष्ण मगर, भारत बाबासाहेब वरकड, गणेश नारायण थेटे आणि जगदीश छगनराव मुरकुंडे ( ३७) हे तारा ओढण्याच्या मजुरीच्या कामावर होते. दुपारी हे चौघे डीपीला विद्युत पुरवठा करण्यासाठी  ११ केव्ही वाहिनी जोडण्याचे काम करीत होते. 

ज्या ठिकाणाहुन विद्युत पुरवठा घ्यावयाचा तेथून नविन डीपीचेपर्यंत चौघे मिळून तार पसरवित होते. नविन डीपी कडून गणेश तार ओढीत पुढे गेला. त्यानंतर काही अंतरावर भारत तार ओढण्यास मदत करित होता. त्यानंतर काही अंतरावर अर्जुन ही मदत करित होता तर नविन डीपी जवळच जगदीश तार ओढण्यास मदत करित होता. तारेचे पहिले टोक घेऊन गणेश सहा पोलपर्यंत पोहोचला असतांना त्यात अचानक विद्युत प्रवाह उतरला. तशात जमिन ही ओलसर होती. त्यामुळे जबरदस्त शॉक लागून  चौघेही जागीच गतप्राण झाले. 

तर पप्पु शब्बीर पठाण ( ३०) हा यात गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती कळताच नावडी गावावर शोककळा पसरली. उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, सपोनि टी आर भालेराव,  उपकार्यकारी अभियंता नितीन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान नावडी येथील नागरीक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूelectricityवीज