शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय

By बापू सोळुंके | Updated: June 22, 2023 13:44 IST

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी संततधार आणि अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर रब्बी आणि उन्हाळी पिकांचेही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान केल्याने शेतकरी त्रस्त आहे. या शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही शासनाने दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा पगार कमी मिळेल.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

२६ कोटी ९७ लाख ४३ हजार ९० रुपयांचे नुकसानएप्रिल महिन्यात जिल्ह्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगाम आणि उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू काळा पडला, भाजीपाला आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले. अवकाळीमुळे जिल्ह्यात सुमारे १६ हजार १४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीसाठी प्रशासनाने २६ कोटी ९७ लाख ४३ हजार ९० रुपयांची मागणी शासनाकडे केली.

शासनाच्या निर्णयाचे स्वागतनैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांचे सतत नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचा पगार कपात केला जाईल. बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. यामुळे शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.- परेश खोसरे, जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना.

सामाजिक उपक्रमात अग्रेसर बळीराजाला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक दिवसाचे वेतन देण्यास आमच्या कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली नाही. संघटनेनेच असा प्रस्ताव शासनास दिला होता. कोणत्याही सामाजिक उपक्रमासाठी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेेचे कर्मचारी योगदान देतात.- डॉ. देविदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना.

पेरणीपूर्व मदत द्यावीवर्षातून तीन वेळा नुकसान झाल्यानंतर एखाद्या वेळेस शासनाकडून भरपाई; तीसुद्धा तोकडी मिळते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन घेत असल्याचे कळते, ही चांगली बाब आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये द्यायला हवेत.-कृष्णा पवार, शेतकरी, पिंप्री राजा.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद