शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय

By बापू सोळुंके | Updated: June 22, 2023 13:44 IST

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी संततधार आणि अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर रब्बी आणि उन्हाळी पिकांचेही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान केल्याने शेतकरी त्रस्त आहे. या शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही शासनाने दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा पगार कमी मिळेल.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

२६ कोटी ९७ लाख ४३ हजार ९० रुपयांचे नुकसानएप्रिल महिन्यात जिल्ह्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगाम आणि उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू काळा पडला, भाजीपाला आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले. अवकाळीमुळे जिल्ह्यात सुमारे १६ हजार १४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीसाठी प्रशासनाने २६ कोटी ९७ लाख ४३ हजार ९० रुपयांची मागणी शासनाकडे केली.

शासनाच्या निर्णयाचे स्वागतनैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांचे सतत नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचा पगार कपात केला जाईल. बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. यामुळे शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.- परेश खोसरे, जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना.

सामाजिक उपक्रमात अग्रेसर बळीराजाला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक दिवसाचे वेतन देण्यास आमच्या कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली नाही. संघटनेनेच असा प्रस्ताव शासनास दिला होता. कोणत्याही सामाजिक उपक्रमासाठी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेेचे कर्मचारी योगदान देतात.- डॉ. देविदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना.

पेरणीपूर्व मदत द्यावीवर्षातून तीन वेळा नुकसान झाल्यानंतर एखाद्या वेळेस शासनाकडून भरपाई; तीसुद्धा तोकडी मिळते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन घेत असल्याचे कळते, ही चांगली बाब आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये द्यायला हवेत.-कृष्णा पवार, शेतकरी, पिंप्री राजा.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद