शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय

By बापू सोळुंके | Updated: June 22, 2023 13:44 IST

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी संततधार आणि अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर रब्बी आणि उन्हाळी पिकांचेही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान केल्याने शेतकरी त्रस्त आहे. या शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही शासनाने दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा पगार कमी मिळेल.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

२६ कोटी ९७ लाख ४३ हजार ९० रुपयांचे नुकसानएप्रिल महिन्यात जिल्ह्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगाम आणि उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू काळा पडला, भाजीपाला आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले. अवकाळीमुळे जिल्ह्यात सुमारे १६ हजार १४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीसाठी प्रशासनाने २६ कोटी ९७ लाख ४३ हजार ९० रुपयांची मागणी शासनाकडे केली.

शासनाच्या निर्णयाचे स्वागतनैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांचे सतत नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचा पगार कपात केला जाईल. बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. यामुळे शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.- परेश खोसरे, जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना.

सामाजिक उपक्रमात अग्रेसर बळीराजाला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक दिवसाचे वेतन देण्यास आमच्या कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली नाही. संघटनेनेच असा प्रस्ताव शासनास दिला होता. कोणत्याही सामाजिक उपक्रमासाठी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेेचे कर्मचारी योगदान देतात.- डॉ. देविदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना.

पेरणीपूर्व मदत द्यावीवर्षातून तीन वेळा नुकसान झाल्यानंतर एखाद्या वेळेस शासनाकडून भरपाई; तीसुद्धा तोकडी मिळते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन घेत असल्याचे कळते, ही चांगली बाब आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये द्यायला हवेत.-कृष्णा पवार, शेतकरी, पिंप्री राजा.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद