शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त न्यायमूर्तींची समिती सुचविणार औट्रम घाटातील वाहतूक कोंडीवर पर्याय

By प्रभुदास पाटोळे | Updated: December 8, 2023 19:43 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे महामार्गावरील औट्रम घाटातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पर्याय सुचविण्याकरिता उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी गुरुवारी (दि. ७) दिले.

या समितीमध्ये येथील विभागीय आयुक्त , छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक, खंडपीठातील मुख्य सरकारी वकील गिरासे, याचिकाकर्ता ॲड. ज्ञानेश्वर बागुल, छत्रपती संभाजीनगरचे मुख्य वनसंरक्षक, एनएचएआयने नेमलेले सल्लागार यांचा समावेश राहील.

उच्च न्यायालयाच्या ४ ऑगस्ट २०२३च्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या जड वाहनांना ११ ऑगस्टपासून ‘औट्रम घाटातून’ वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. असे असताना या मार्गावरून अद्यापही जड वाहतूक सुरू असून, वाहनांच्या छतावर सुद्धा लोकांना बसवून वाहतूक चालू असल्याची छायाचित्रे याचिकाकर्त्यांनी गुरुवारी खंडपीठात सादर केली. त्यावरून कन्नड आणि चाळीसगाव दरम्यानच्या घाटाच्या दोन्ही बाजूच्या टोकांवर नेमणुकीस असलेल्या वाहतूक विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांना त्वरित बदलून त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकारी नेमण्याचे निर्देश खंडपीठाने छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या पोलिस अधीक्षकांना दिले. या जनहित याचिकेवर २१ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

याचिकाकर्ते ॲड. ज्ञानेश्वर बागूल, ॲड. नीलेश देसले आणि ॲड. श्रीकृष्ण चौधरी, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, एनएचएआयतर्फे ॲड. सुहास उरगुंडे आदी काम पाहत आहेत.

काय होते खंडपीठाचे ४ ऑगस्टचे आदेशखंडपीठाने ४ ऑगस्ट रोजी सर्व जड वाहने, मल्टी एक्सल वाहने, ट्रक, दूध, एलपीजी, पेट्रोल, डिझेल आदींची वाहतूक करणारे टँकर, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस या जड वाहनांना ११ ऑगस्ट २०१३ पासून बंदी घातली आहे. या जड वाहनांनी औट्रम घाटाकडे न जाता याचिकाकर्त्यांनी सुचविल्यानुसार चाळीसगावकडे, तसेच मुंबई-आग्रा महामार्गाकडे जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर-दौलताबाद टी पॉइंट-रंगारी देवगाव-शिऊर बंगला-वाकला-पिंपरखेड-न्यायडोंगरी मार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाला, तसेच नांदगावहून मालेगाव मार्गे मुंबई-आग्रा महामार्गाकडे जाण्यास खंडपीठाने परवानगी दिली होती.

औट्रम घाटातून केवळ याच वाहनांना वाहतुकीची परवानगीशेतकऱ्यांची हलकी वाहने, ट्रॅक्टर, दुचाकी, जीप, महाराष्ट्र आणि परराज्यांच्या परिवहन खात्याच्या प्रवासी बस, रुग्णवाहिका, अग्निशमन विभागाची वाहने, तसेच घाटात एखादे वाहन अडकले असेल तर ते काढण्यासाठी क्रेन आणि आपत्कालीन काळात पॅरा मिल्ट्रीची वाहने आणि पोलिसांची वाहने यांनाच ११ ऑगस्टनंतर औट्रम घाटातून वाहतुकीची परवानगी असेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग