शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निवृत्त न्यायमूर्तींची समिती सुचविणार औट्रम घाटातील वाहतूक कोंडीवर पर्याय

By प्रभुदास पाटोळे | Updated: December 8, 2023 19:43 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे महामार्गावरील औट्रम घाटातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पर्याय सुचविण्याकरिता उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी गुरुवारी (दि. ७) दिले.

या समितीमध्ये येथील विभागीय आयुक्त , छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक, खंडपीठातील मुख्य सरकारी वकील गिरासे, याचिकाकर्ता ॲड. ज्ञानेश्वर बागुल, छत्रपती संभाजीनगरचे मुख्य वनसंरक्षक, एनएचएआयने नेमलेले सल्लागार यांचा समावेश राहील.

उच्च न्यायालयाच्या ४ ऑगस्ट २०२३च्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या जड वाहनांना ११ ऑगस्टपासून ‘औट्रम घाटातून’ वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. असे असताना या मार्गावरून अद्यापही जड वाहतूक सुरू असून, वाहनांच्या छतावर सुद्धा लोकांना बसवून वाहतूक चालू असल्याची छायाचित्रे याचिकाकर्त्यांनी गुरुवारी खंडपीठात सादर केली. त्यावरून कन्नड आणि चाळीसगाव दरम्यानच्या घाटाच्या दोन्ही बाजूच्या टोकांवर नेमणुकीस असलेल्या वाहतूक विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांना त्वरित बदलून त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकारी नेमण्याचे निर्देश खंडपीठाने छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या पोलिस अधीक्षकांना दिले. या जनहित याचिकेवर २१ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

याचिकाकर्ते ॲड. ज्ञानेश्वर बागूल, ॲड. नीलेश देसले आणि ॲड. श्रीकृष्ण चौधरी, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, एनएचएआयतर्फे ॲड. सुहास उरगुंडे आदी काम पाहत आहेत.

काय होते खंडपीठाचे ४ ऑगस्टचे आदेशखंडपीठाने ४ ऑगस्ट रोजी सर्व जड वाहने, मल्टी एक्सल वाहने, ट्रक, दूध, एलपीजी, पेट्रोल, डिझेल आदींची वाहतूक करणारे टँकर, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस या जड वाहनांना ११ ऑगस्ट २०१३ पासून बंदी घातली आहे. या जड वाहनांनी औट्रम घाटाकडे न जाता याचिकाकर्त्यांनी सुचविल्यानुसार चाळीसगावकडे, तसेच मुंबई-आग्रा महामार्गाकडे जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर-दौलताबाद टी पॉइंट-रंगारी देवगाव-शिऊर बंगला-वाकला-पिंपरखेड-न्यायडोंगरी मार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाला, तसेच नांदगावहून मालेगाव मार्गे मुंबई-आग्रा महामार्गाकडे जाण्यास खंडपीठाने परवानगी दिली होती.

औट्रम घाटातून केवळ याच वाहनांना वाहतुकीची परवानगीशेतकऱ्यांची हलकी वाहने, ट्रॅक्टर, दुचाकी, जीप, महाराष्ट्र आणि परराज्यांच्या परिवहन खात्याच्या प्रवासी बस, रुग्णवाहिका, अग्निशमन विभागाची वाहने, तसेच घाटात एखादे वाहन अडकले असेल तर ते काढण्यासाठी क्रेन आणि आपत्कालीन काळात पॅरा मिल्ट्रीची वाहने आणि पोलिसांची वाहने यांनाच ११ ऑगस्टनंतर औट्रम घाटातून वाहतुकीची परवानगी असेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग