शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मराठवाड्यात टँकरचे शतक; हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल

By विकास राऊत | Updated: November 10, 2023 17:32 IST

सध्या १२० हून अधिक टँकरद्वारे पाणीटंचाई असलेल्या गावे, वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सध्या १२० टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून आगामी काळात ही संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल लागली असून गुरुवारी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मराठा आरक्षण पुरावे शोध मोहीम, पीकविमा, पाणीटंचाई, महसुली वसुलीच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली.

आयुक्त आर्दड म्हणाले, मराठा आरक्षण पुरावे शोध मोहिमेसह विभागातील पाणी व चाराटंचाईचा आढावा घेतला. सध्या १२० हून अधिक टँकरद्वारे पाणीटंचाई असलेल्या गावे, वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची कमतरता लक्षात घेता भविष्यात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जनावरांना मुबलक चारा उपलब्ध असावा, टंचाई भासू नये, यासाठी चारा लागवड करा, गाळपेरा यावर प्राधान्य द्या. महाबीजकडून चारा बियाणे घ्यावे. यासाठी डीपीसीतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. तसेच, विभागातील पोलिस ठाणे, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत की नाही यावर बैठकीत चर्चा झाली. कॅमेरे नादुरुस्त असतील तर ते सुरू करण्याबाबत बैठकीत आदेश देण्यात आले. बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

विमा कंपन्याचे आक्षेप फेटाळलेछत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोलीसह लातूर या चार जिल्ह्यांतील संबंधित पीक विमा कंपनीने सादर केलेले आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत. विभागात यंदाच्या पावसाळ्यात १५ टक्के तूट राहिली आहे. विभागातील सूमारे २४५ हून अधिक मंडळांत सलग २१ किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचा खंड पडल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता या बाबीखाली संबंधित शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश दिले आहेत.-मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई