शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मराठवाड्याला मोठा दिलासा, अखेर नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडीकडे निघाले पाणी

By स. सो. खंडाळकर | Updated: November 25, 2023 11:45 IST

नाशिकच्या दारणा धरणातून तर आज सकाळी अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जायकवाडीमध्ये पाणी सोडू नका : शासनाची सूचना, अधीक्षक अभियंत्याच्या पत्राने खळबळ’ हे लोकमतमध्ये छापून आलेले वृत्त शुक्रवारी दिवसभर चर्चेत राहिले. त्याचे पडसाद उमटत राहिले. परिणामी, शासनस्तरावरून वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याच्या हालचाली वाढल्या व तसे लेखी पत्र जारी करावे लागले.त्यानंतर शुक्रवारी रात्री ११ वाजता नाशिकच्या दारणा धरणातून तर आज सकाळी  अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले. हळहळू पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. मोठ्या लढयानंतर जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी झेपावले आहे. दुष्काळी मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा ठरत आहे. 

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या संदर्भात चार आठवड्यापूर्वी आदेश दिले होते. त्यानंतर नाशिक आणि अहमदनगर येथून राजकीय विरोध सुरू झाला होता तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र महामंडळाच्या आदेशाला स्थगिती मिळाली नाही. दरम्यान,पाणी सोडण्यास दिरंगाई होत असल्याने मराठवाड्यात मोठी नाराजी पसरली होती. सर्वपक्षीय एकवटले होते.त्यातच मराठा आरक्षण आंदोलन सुरू असल्याने पाणी सोडू नका असे पत्र शासनाने दिल्याचे लोकमतने उघड केल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर रात्री अचानक शासन स्तरावर हालचाली झाल्या अन् पाणी सोडण्याचा निर्णय झाला.

दरम्यान, शुक्रवारी काल रात्री जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दारणा धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश दिले त्यानुसार मध्यरात्री २००  क्यूसेक वेगाने इतके पाणी सोडण्यात आले आहे, गोदावरी पात्रावरील कालव्यांच्या फळ्या काढण्याचे काम सुरू झाल्यानंतर हळूहळू पुढील विसर्ग करण्यात येणार आहे. दारणा धरण समूहातून २.६४३ टीएमसी आणि गंगापूर धरणातून ०.५ म्हणजे अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश असून त्यापैकी तूर्तास केवळ दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

मराठा आंदोलन बदनाम करू नकाकोणत्या ना कोणत्या बहाण्याने पाणी सोडायचे नाही, पुन्हा दुसऱ्यावर खापर फोडून मोकळे व्हायचे हे धोरण चुकीचे असल्याची प्रतिक्रिया यासंदर्भात उमटत होती. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पाण्याआडून मराठा आंदोलन बदनाम करू नका व पाणी सोडणे टाळू नका, असे ट्वीट करून बजावले. तर अंतरवाली सराटीहून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही मराठा आंदोलन बदनाम करू नका, असे ठणकावले.

सर्वपक्षीय जनआंदोलन समितीला स्पष्ट आश्वासनलोकमतमधील वृत्ताची दखल घेऊन मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीचे एक शिष्टमंडळ गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांना भेटले. त्यात माजी राज्यमंत्री अनिल पटेल, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ व माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाला दिलेल्या पत्रातही तिरमनवार यांनी पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत असल्याचे म्हटले होते.

मराठा समाजाने विचारला जाबपाण्याआडून मराठा समाजाला का बदनाम करता, असा जाब विचारण्यासाठी सकाळीच सकल मराठा समाज व बुलंद छावाच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यालय गाठले. तेथे अधीक्षक अभियंता स. कों सब्बीनवार यांना घेराव घालत माफी मागण्याचा आग्रह धरला. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, असे म्हणत सब्बीनवार यांनी माफीनामाही लिहून दिला.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा