शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

मराठवाड्याला मोठा दिलासा, अखेर नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडीकडे निघाले पाणी

By स. सो. खंडाळकर | Updated: November 25, 2023 11:45 IST

नाशिकच्या दारणा धरणातून तर आज सकाळी अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जायकवाडीमध्ये पाणी सोडू नका : शासनाची सूचना, अधीक्षक अभियंत्याच्या पत्राने खळबळ’ हे लोकमतमध्ये छापून आलेले वृत्त शुक्रवारी दिवसभर चर्चेत राहिले. त्याचे पडसाद उमटत राहिले. परिणामी, शासनस्तरावरून वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याच्या हालचाली वाढल्या व तसे लेखी पत्र जारी करावे लागले.त्यानंतर शुक्रवारी रात्री ११ वाजता नाशिकच्या दारणा धरणातून तर आज सकाळी  अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले. हळहळू पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. मोठ्या लढयानंतर जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी झेपावले आहे. दुष्काळी मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा ठरत आहे. 

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या संदर्भात चार आठवड्यापूर्वी आदेश दिले होते. त्यानंतर नाशिक आणि अहमदनगर येथून राजकीय विरोध सुरू झाला होता तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र महामंडळाच्या आदेशाला स्थगिती मिळाली नाही. दरम्यान,पाणी सोडण्यास दिरंगाई होत असल्याने मराठवाड्यात मोठी नाराजी पसरली होती. सर्वपक्षीय एकवटले होते.त्यातच मराठा आरक्षण आंदोलन सुरू असल्याने पाणी सोडू नका असे पत्र शासनाने दिल्याचे लोकमतने उघड केल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर रात्री अचानक शासन स्तरावर हालचाली झाल्या अन् पाणी सोडण्याचा निर्णय झाला.

दरम्यान, शुक्रवारी काल रात्री जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दारणा धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश दिले त्यानुसार मध्यरात्री २००  क्यूसेक वेगाने इतके पाणी सोडण्यात आले आहे, गोदावरी पात्रावरील कालव्यांच्या फळ्या काढण्याचे काम सुरू झाल्यानंतर हळूहळू पुढील विसर्ग करण्यात येणार आहे. दारणा धरण समूहातून २.६४३ टीएमसी आणि गंगापूर धरणातून ०.५ म्हणजे अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश असून त्यापैकी तूर्तास केवळ दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

मराठा आंदोलन बदनाम करू नकाकोणत्या ना कोणत्या बहाण्याने पाणी सोडायचे नाही, पुन्हा दुसऱ्यावर खापर फोडून मोकळे व्हायचे हे धोरण चुकीचे असल्याची प्रतिक्रिया यासंदर्भात उमटत होती. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पाण्याआडून मराठा आंदोलन बदनाम करू नका व पाणी सोडणे टाळू नका, असे ट्वीट करून बजावले. तर अंतरवाली सराटीहून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही मराठा आंदोलन बदनाम करू नका, असे ठणकावले.

सर्वपक्षीय जनआंदोलन समितीला स्पष्ट आश्वासनलोकमतमधील वृत्ताची दखल घेऊन मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीचे एक शिष्टमंडळ गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांना भेटले. त्यात माजी राज्यमंत्री अनिल पटेल, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ व माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाला दिलेल्या पत्रातही तिरमनवार यांनी पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत असल्याचे म्हटले होते.

मराठा समाजाने विचारला जाबपाण्याआडून मराठा समाजाला का बदनाम करता, असा जाब विचारण्यासाठी सकाळीच सकल मराठा समाज व बुलंद छावाच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यालय गाठले. तेथे अधीक्षक अभियंता स. कों सब्बीनवार यांना घेराव घालत माफी मागण्याचा आग्रह धरला. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, असे म्हणत सब्बीनवार यांनी माफीनामाही लिहून दिला.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा