शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

९४ वे साहित्य संमेलन ऑनलाईन अशक्य; परिस्थिती सुधारल्यास छोटेखानी सोहळा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 13:09 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांची माहिती 

ठळक मुद्देनाशिक, अंमळनेर, दिल्ली आणि विदर्भातून साहित्य संमेलन घेण्याविषयी प्रस्ताव आले आहेतअवघ्या १५ दिवसांत साहित्य संमेलनाचे ठिकाण निश्चित करण्यापासून सगळी तयारी करू

औरंगाबाद : साहित्य संमेलन म्हणजे लेखक आणि रसिकांचा, साहित्यप्रेमींचा मेळावा. ऑनलाईन साहित्य संमेलनाचा पर्याय सुचविणारे अनेक आहेत; परंतु पुस्तक विक्री, लेखक-वाचकांची प्रत्यक्ष भेट हे ऑनलाईन संमेलनातून शक्य नाही. त्यामुळे ९४ वे साहित्य संमेलन झाले, तर ते छोटेखानी का असेना; पण प्रत्यक्षच होईल. ऑनलाईन पद्धतीने साहित्य संमेलन होणार नाही, असा खुलासा अखिल भारतीय मराठी साहित्य  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

सर्वकाही सुरळीत असते तर जानेवारी २०२१ मध्ये संमेलन होणे अपेक्षित होते; परंतु कोरोनामुळे आता संमेलनाच्या आयोजनाबाबतच प्रश्नचिन्ह आहे. नवा पर्याय स्वीकारत ऑनलाईन साहित्य संमेलन आयोजित करण्याच्या सूचना साहित्य महामंडळाकडे येत आहेत; परंतु अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी ऑनलाईनचा पर्याय अजिबातच अनुकूल नसल्याचे आणि ऑनलाईन आयोजन अर्थहीन असल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.ते म्हणाले की, कोरोनामुळे लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात साहित्य संमेलन  घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन होणार नाही. साहित्य  महामंडळ डिसेंबरपर्यंत वाट पाहणार आहे. त्यानंतर परिस्थिती सुधारत आहे, असे वाटल्यास अवघ्या १५ दिवसांत साहित्य संमेलनाचे ठिकाण निश्चित करण्यापासून सगळी तयारी करू आणि साहित्य संमेलन घेऊ. जानेवारीमध्ये साहित्य संमेलन घेण्यासंबंधी विचार करण्यात येईल.

या ठिकाणांहून आले आहेत प्रस्ताव९४ वे साहित्य संमेलन झाले तर ते होणार कुठे, याविषयी साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. याविषयी विचारले असता ठाले पाटील म्हणाले की, नाशिक, अंमळनेर, दिल्ली आणि विदर्भातून साहित्य संमेलन घेण्याविषयी प्रस्ताव आले आहेत; परंतु हे प्रस्ताव कोरोनाची लाट येण्यापूर्वी आलेले आहेत. आता सर्वकाही  बदलून गेले आहे. त्यामुळे आलेल्या प्रस्तावांपैकीही किती जण आता साहित्य संमेलन घेण्यास उत्सुक असतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनAurangabadऔरंगाबाद