शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ९४ टक्के शालेय विद्यार्थी समाज माध्यमांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 18:49 IST

बालरोगतज्ज्ञ संघटनेचे सर्वेक्षण 

ठळक मुद्दे दिवसभरात मुलांचा किमान १ ते २ तास मोबाईलचा वापर आरोग्यासह अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे नुकतेच मोबाईल वापराविषयी इयत्ता ८ ते १० वीतील ४०० मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून ९४ टक्के विद्यार्थी सोशल मीडियावर असल्याचे समोर आले. दररोज कमीत कमी १ ते २ तास मुले मोबाईलवर व्यस्त असतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा अतिवापर होत असल्याने बालरोगतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली.

आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. संवादासह अनेक गोष्टींसाठी स्मार्ट फोन महत्त्वपूर्ण ठरत आहे; परंतु त्याच वेळी स्मार्ट फोन आणि मोबाईलच्या व्यसनात शालेय विद्यार्थी अडकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा लहान मुले अतिवापर करीत आहेत. औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे ही समस्या रोखण्यासाठी व त्याच्या दुष्परिणामाची जाणीव करून देण्यासाठी संघटनेच्या नव्या कार्यकारिणीकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 

बालरोगतज्ज्ञ संघटनेने शहरातील ८ ते १० वीतील ४०० मुलांना काही प्रश्नावलीच्या माध्यमातून मोबाईलच्या वापराविषयी विचारणा केली होती. त्यातून अनेक मुद्दे समोर आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९४ टक्के मुले सोशल मीडियावर कार्यरत असल्याचे समोर आले. त्यासाठी अनेकांकडे स्वत:चा मोबाईल आहे, तर काहींनी पालकांचा मोबाईल वापरत असल्याचे नमूद केले. अनोळखी लोकांशी मैत्री केली जाते. दिवसभरात मनोरंजनााठी कमीत कमी १ ते २ तास मोबाईलचा वापर करीत असल्याचे मुलांनी नमूद केले. ८८ टक्के मुलांना सायबर क्राईम, दुष्परिणामांविषयी कल्पना नाही. मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर वाढत आहे. त्यामुळे अनेक शाळांनी मोबाईल आणण्यावर बंदी घातल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

डिप्रेशन, लवकर चष्मा, बहिरेपणामोबाईलवर गेम खेळताना एक लेव्हल पार झाल्यानंतर दुसरी लेव्हल पार करण्याची सवय लागते. त्यासाठी तासन्तास वेळ दिला जातो. त्यातून मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. मोबाईल काढून घेतल्यास मुले चिडचिड करतात. अनेक मुले तर डिप्रेशनमध्ये जातात. मोबाईलवर हेडफोन लावून गाणी ऐकली जातात. त्यातून ऐकण्याच्या क्षमतेवर परिमाण होतो, तर लवकर चष्मा लागण्याचे प्रकारही वाढत आहेत. वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. या सगळ्याचा शाळेतील प्रगतीवरही परिणाम होतो. मुले एकाकी राहू लागतात.

३० टक्के मुलांमध्ये दुष्परिणाममुलांचा त्रास होऊ नये, यासाठी आई-वडिलांकडून मुलांना मोबाईल दिला जातो. त्यातून मुलांना मोबाईलच्या अतिवापराची सवय लागते. त्यातून मुलांमध्ये विड्रॉल सिमटन्स दिसतात. मोबाईल दूर केला तर मुले चिडचिड करतात. इतर अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. पालकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. मोबाईलचा वापर करणाऱ्या ३० टक्के मुलांमध्ये अनेक दुष्परिणाम दिसतात.-डॉ. सागर कुलकर्णी, सचिव, औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटना

मुलांच्या विकासावर परिणामइयत्ता ८ ते १० वीतील ४०० मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. मोबाईलचा किती वापर करतात, सोशल मीडियावर आहेत का आदींची विचारणा केली. अनेक विद्यार्थ्यांकडे स्वत:चा मोबाईल आहे, तर अनेक जण पालकांचा मोबाईल वापरतात. त्यातून मुलांच्या शारीरिक वाढीवरही परिणाम होतो. मुलांचे खेळणे थांबते. अभ्यासावरही परिणाम होत असल्याचे दिसून येते. संवादासाठी मुलांना स्मार्ट फोनऐवजी साधा मोबाईल दिला तरी चालतो.-डॉ. तृप्ती बोरूळकर, बालरोगतज्ज्ञ

टॅग्स :MobileमोबाइलHealthआरोग्यAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी