शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

गारपीटग्रस्तांसाठी ८८ कोटी प्राप्त

By admin | Updated: May 23, 2014 00:21 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १९१ कोटी ८५ लाख ८७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १९१ कोटी ८५ लाख ८७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मागणीच्या तुलनेत पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्याला ९८ कोटी ५० लाख रुपये प्राप्त झाले होते. उर्वरित तिसर्‍या टप्प्यातील ८८ कोेटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला सोमवारी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात २२ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे गहू, हरभरा, रब्बी पिके, संत्री, आंबा, द्राक्ष आदी फळपिकांसह भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले. काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला. जिल्ह्यातील आठ तालुक्यातील जिरायत पिकाखाली १ लाख ५५ हजार ७८० हेक्टर, बागायत पिकाखालील १५ हजार ३०७ तर फळ पिकाखालील ५ हजार २४७.२९ हेक्टरवर असे एकूण १ लाख ७६ हजार ३३४.२९ हेक्टवरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पीक नुकसान भरपाईपोटी शासनाकडे १९७ कोटी ८५ लाख ८७ हजार रुपये निधीची मागणी करण्यात आली होती. त्यात शासनाने पहिल्या टप्प्यात ४३ कोेटी तर दुसर्‍या टप्प्यात ५३ कोटी ५० लाख असा एकूण ९८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित ८८ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून राहिलेला चार कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून नुकसान भरपाई दिली जात असली तरी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. (प्रतिनिधी)भूम : तालुक्यात झालेली गारपीट व सोयाबीन पिकाला शासनाच्या वतीने दिले जाणारे अनुदान वाटपामध्ये जिल्हा बँकेकडून अडवणूक होत असल्याची तक्रार राष्टÑीय समाज पार्टीने उपविभागीय अधिकार्‍यांकडे केली आहे. भूम तालुक्यातील शेतकर्‍यांनी जिल्हा बँककडे अनुदान मिळण्यासाठी दिवस दिवस थांबावे लागते. परंतु संगणकाच्या बाबी पुढे करत दिवस ढकलत असून शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहे. याप्रश्नी बेमुदत उपोषण करणार असल्याचे तालुकाध्यक्ष पंडित मारकड व माजी जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.