शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

महावितरणाच्या औरंगाबाद विभागात ८७००० शेतकऱ्यांना हवीय वीज जोडणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 7:18 PM

मराठवाड्यासह औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल ८७ हजार ४८४ शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेली नाही.

ठळक मुद्दे विहिरी, बोअरवेलमध्ये पाणी आहे; पण केवळ वीज जोडणी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाला आलेले पीक व फळबागा जळून गेल्या

- विजय सरवदे 

औरंगाबाद : कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून महावितरणकडे रीतसर पैसे भरले आहेत; परंतु मराठवाड्यातील ६७ हजार ३७४ शेतकरी, तर मराठवाड्यासह औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल ८७ हजार ४८४ शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेली नाही. विहिरी, बोअरवेलमध्ये पाणी आहे; पण केवळ वीज जोडणी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाला आलेले पीक व फळबागा जळून गेल्या. 

प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता याव्यात, शेती उत्पादनात शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त करून देता यावे, यासाठी शासनाने अनेक योजनांच्या घोषणा केल्या; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र शून्यच. अलीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अनियमित, तर काही जिल्ह्यांत अपुरा पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून विहिरी खोदल्या. बोअरवेल घेतल्या. त्यासाठी महावितरणकडे कोटेशन व पैसेही भरले; पण मार्च २०१६ पासून शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. वीज जोडणी मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक निवेदने दिली. 

महावितरणचे उंबरठे झिजविले; तेव्हा प्रादेशिक कार्यालयांतर्गत ११ जिल्ह्यांमधील कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे ११ हजार ६९८ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्यामुळे तारा नाहीत. पोल नाहीत. डीपी आदी साहित्य खरेदी करण्यासाठी महावितरणकडे पुरेसा निधी नाही, असे सांगून शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. 

प्रादेशिक कार्यालयांतर्गत मराठवाड्यातील ८ व उत्तर महाराष्ट्रातील ३, अशी ११ जिल्हे येतात. प्रादेशिक कार्यालयांतर्गत वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांपैकी औरंगाबाद जिल्ह्यात १० हजार ८५२ शेतकरी, जालना जिल्ह्यात १२ हजार ९८० शेतकरी, परभणी जिल्ह्यात ४ हजार ७६५ शेतकरी, हिंगोली जिल्ह्यात ५ हजार ५२९ शेतकरी, नांदेड जिल्ह्यात ७ हजार ७५१ शेतकरी, बीड जिल्ह्यात १० हजार ४७३ शेतकरी, लातूर जिल्ह्यात ६ हजार २१८ शेतकरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ८ हजार ८०६ शेतकरी, तर धुळे जिल्ह्यात ५ हजार ९४० शेतकरी, जळगाव जिल्ह्यात ९ हजार ९२३ शेतकरी आणि नंदूरबार जिल्ह्यात ४ हजार २४७ शेतकरी, असे एकूण ८७ हजार ४८४ शेतकरी आहेत. 

आणखी ४-५ महिने प्रतीक्षा करावी लागेलया संदर्भात महावितरणच्या औरंगाबाद झोनचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, मराठवाडा पॅकेजचा निधी संपला आहे. त्यामुळे औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत या पॅकेज अंतर्गत वीज जोडणी देण्याचे काम थांबले आहे. कृषिपंपांसाठी वीज जोडणी मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांना नवीन योजनेंतर्गत वीज जोडणी दिली जाणार आहे. यासाठी आणखी चार-पाच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रelectricityवीज