शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात मदतीचे ८४ कोटी कागदावर, त्यात पुन्हा ९ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका

By विकास राऊत | Updated: April 10, 2023 20:26 IST

विभागातील एकूण ६०,८१९.१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसानीसाठी ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ८ ते २० मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सुधारित दरानुसार ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांच्या मदतनिधीचा अहवाल शासनाकडे जात नाही तोवर, ७ एप्रिलपासून आजवर झालेल्या गारपिटीमुळे २४१ गावांतील १९ हजार ६४ शेतकऱ्यांचे ९ हजार ९४० हेक्टरवरील बागायत, फळपिकांचे नुकसान झाले आहे. ८४ कोटींची मागणी कागदावर असतानाच पुन्हा नुकसानीची भर त्यात पडणार आहे. वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. लहान मोठे मिळून १०६ जनावरे दगावली. तसेच ६९ मालमत्तांची पडझड झाली आहे.

विभागात ८ ते २० मार्चदरम्यान झालेल्या गारपीट, अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजार १८ शेतकऱ्यांचे सुमारे ६० हजार ४०२ हेक्टर क्षेत्रातील रबी पिके, तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी २० कोटी ९२ लाख, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी ५१ कोटी ५९ लाख, फळपिकांच्या नुकसानीसाठी १२ कोटी २३ लाख, असे सुमारे ८४ कोटी ७५ लाख ९१ हजार रुपयांची मदत नुकसान भरपाईसाठी मागितली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३,५३५ हेक्टरवरील नुकसानीसाठी २२ कोटी १७ लाख, जालन्यात १,९६९.४९ हेक्टरसाठी ३ कोटी ६७ लाख, परभणी ३,९६०.८१ हेक्टरसाठी ४ कोटी ३७ लाख, हिंगोलीत ३,८३८.७२ हेक्टरसाठी ६ कोटी ४ लाख, नांदेड २१,५७९.५० हेक्टरसाठी ३० कोटी ५२ लाख, बीड ३,८०२.०२ हेक्टरसाठी ५ कोटी ९९ लाख, लातूर जिल्ह्यात १०,३६७.८३ हेक्टरसाठी १० कोटी ५६ लाख तर धाराशिव १,३४९.००            हेक्टरसाठी १ कोटी ३९ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. विभागातील एकूण ६०,८१९.१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसानीसाठी ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांची मागणी केली आहे.

तीन दिवसांत झालेले नुकसान असे...छत्रपती संभाजीनगर : ४७९८ हेक्टरबीड : २४१७ हेक्टरलातूर : १४४ हेक्टरधाराशिव : २५८१ हेक्टरएकूण : ९९४० हेक्टर

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद