शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ८ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; नांदेड,छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक तडाखा

By विकास राऊत | Updated: March 17, 2023 19:05 IST

आठ जिल्ह्यांत या काळात ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; या पावसाने चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ६ ते ८ व १४ ते १७ मार्च या काळात झालेल्या अवकाळी पावसाचा ८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. आठ जिल्ह्यांत या काळात ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; या पावसाने २१ जनावरांचा जीव गेला आहे. हिंगोलीत वीज पडून एकाचा तर परभणीत तिघांचा असे चार जाण दगावले आहेत. २२ नागरिक जखमी झाले आहेत.

८ मार्च रोजीच्या अहवालानुसार जिरायत एक हजार हेक्टर, बागायत दोन हजार ५५ हेक्टर, तर १७ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. हे सगळे नुकसान छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले होते. १४ ते १७ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये १५२ हेक्टर तर नांदेडमध्ये सर्वाधिक ४ हजार ७९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ जनावरे, जालना ९, नांदेड जिल्ह्यात १५, तर हिंगोलीत ३, बीडमध्ये ३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना, नांदेड जिल्ह्यांत जास्त पाऊस झाला असून, पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. गहू, कांदा, हरभरा, फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे पीक हातून गेल्याने ते हवालदिल झाले आहेत.

संपाचा पंचनाम्यांवर परिणाममराठवाड्यातील ५४ हजार १७१ कर्मचारी संपावर आहेत. विभागातील ४५० मंडळातील तलाठी, मंडळ अधिकारी रजेवर असल्यामुळे प्राथिमक नुकसानीचा अहवाल ई-पाहणीच्या आधारे केला आहे. १४ मार्चपासून महसूल कर्मचारी संपावर आहेत. संपाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. अद्याप संपावर तोडगा निघालेला नाही. याचा पडसाद विधानसभेत उमटले. विभागातील सर्व जिल्हाधिकारी तहसिलदार, एसडीएमच्या पथकांसह बांधावर पोहोचले. त्यांनी शेतकर्यांनी चर्चा केला.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादagricultureशेती