शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

८ लाख नागरिकांना मिळणार लस; ३ लाख नागरिकांचे झाले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 14:42 IST

लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कर्मचारी आणावेत कोठून असा प्रश्न पडला आहे.

ठळक मुद्देशहर आणि ग्रामीण भागात अत्यंत तुटपुंज्या लसींवर आरोग्य यंत्रणेला मोहीम राबवावी लागत आहे.दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर आरोग्य यंत्रणेला लढावे लागत आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसरा लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने आता १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ८ लाख तरुणांना लस मिळेल. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून पाहिजे, तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आली आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांचे प्राण वाचविणे हेच सर्वात मोठे ध्येय आरोग्य यंत्रणेसमोर आहे. दुसरीकडे शासनाकडून लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी निर्देश देण्यात येत आहेत. केंद्र राज्य शासनाला पाहिजे तसा लसीचा साठा उपलब्ध करून देत नाही. शहर आणि ग्रामीण भागात अत्यंत तुटपुंज्या लसींवर आरोग्य यंत्रणेला मोहीम राबवावी लागत आहे. दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर आरोग्य यंत्रणेला लढावे लागत आहे.

तुटपुंज्या स्वरूपाचा साठा उपलब्धमहापालिकेकडे मंगळवारी दुपारी लसीचा साठा संपला. ग्रामीण भागात फक्त ६ हजार लसींचा साठा शिल्लक होता. मंगळवारी मध्यरात्री औरंगाबाद जिल्ह्यासाठी ४८ हजार लस देण्यात आल्या आहेत. शहरासाठी फक्त १५ हजार लस देण्यात आल्या आहेत. शहरात या लस अडीच दिवस पुरतील. केंद्र आणि राज्य शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून दिल्या जात नाही.

ज्येष्ठ नागरिकांचा कमी प्रतिसादलसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर फ्रंटलाइन वर्कर, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबतच ज्येष्ठांनाही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात ३ लाख लस देण्यात आल्या. त्यातील फक्त एक लाख लस ज्येष्ठ नागरिकांनी घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद अद्यापपर्यंत योजनेला मिळालेला नाही.

४५ पेक्षा जास्त वयाचे लसीकरणकेंद्र शासनाने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला. मात्र मागील २ महिन्यात एक लाख तीन हजार नागरिकांनी लस घेतली. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा जोरदार प्रयत्न करीत आहे.

दुसऱ्या डोसचे काय?फ्रंटलाइन वर्कर, हेल्थ वर्कर, ज्येष्ठ नागरिक, ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार दुसऱ्या टप्प्यात डोस देण्यात येत आहे. दुसरा डोस घेण्यासाठी काही नागरिक कंटाळा करीत आहेत. चार आठवडे उलटल्यानंतरही स्वतःहून डोस घेण्यासाठी येत नाहीत. महापालिका प्रशासन आरोग्य यंत्रणेकडून दुसऱ्या डोसची आठवण देण्यात येते. लसींच्या डोस अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येत आहे.

लसीकरण केंद्र वाढवावे लागणारकेंद्र शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य यंत्रणेला लसीकरण केंद्र वाढवावे लागणार आहेत. लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कर्मचारी आणावेत कोठून असा प्रश्न पडला आहे.

१८,८६,२८४ -मतदार जिल्ह्यातील८,००,००० -१८ ते ४५ वयोगटातील लोकसंख्या९,९२,८५३ - पुरुष मतदार८,८२,२५८ - महिला मतदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद