शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

८ लाख नागरिकांना मिळणार लस; ३ लाख नागरिकांचे झाले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 14:42 IST

लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कर्मचारी आणावेत कोठून असा प्रश्न पडला आहे.

ठळक मुद्देशहर आणि ग्रामीण भागात अत्यंत तुटपुंज्या लसींवर आरोग्य यंत्रणेला मोहीम राबवावी लागत आहे.दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर आरोग्य यंत्रणेला लढावे लागत आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसरा लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने आता १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ८ लाख तरुणांना लस मिळेल. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून पाहिजे, तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आली आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांचे प्राण वाचविणे हेच सर्वात मोठे ध्येय आरोग्य यंत्रणेसमोर आहे. दुसरीकडे शासनाकडून लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी निर्देश देण्यात येत आहेत. केंद्र राज्य शासनाला पाहिजे तसा लसीचा साठा उपलब्ध करून देत नाही. शहर आणि ग्रामीण भागात अत्यंत तुटपुंज्या लसींवर आरोग्य यंत्रणेला मोहीम राबवावी लागत आहे. दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर आरोग्य यंत्रणेला लढावे लागत आहे.

तुटपुंज्या स्वरूपाचा साठा उपलब्धमहापालिकेकडे मंगळवारी दुपारी लसीचा साठा संपला. ग्रामीण भागात फक्त ६ हजार लसींचा साठा शिल्लक होता. मंगळवारी मध्यरात्री औरंगाबाद जिल्ह्यासाठी ४८ हजार लस देण्यात आल्या आहेत. शहरासाठी फक्त १५ हजार लस देण्यात आल्या आहेत. शहरात या लस अडीच दिवस पुरतील. केंद्र आणि राज्य शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून दिल्या जात नाही.

ज्येष्ठ नागरिकांचा कमी प्रतिसादलसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर फ्रंटलाइन वर्कर, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबतच ज्येष्ठांनाही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात ३ लाख लस देण्यात आल्या. त्यातील फक्त एक लाख लस ज्येष्ठ नागरिकांनी घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद अद्यापपर्यंत योजनेला मिळालेला नाही.

४५ पेक्षा जास्त वयाचे लसीकरणकेंद्र शासनाने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला. मात्र मागील २ महिन्यात एक लाख तीन हजार नागरिकांनी लस घेतली. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा जोरदार प्रयत्न करीत आहे.

दुसऱ्या डोसचे काय?फ्रंटलाइन वर्कर, हेल्थ वर्कर, ज्येष्ठ नागरिक, ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार दुसऱ्या टप्प्यात डोस देण्यात येत आहे. दुसरा डोस घेण्यासाठी काही नागरिक कंटाळा करीत आहेत. चार आठवडे उलटल्यानंतरही स्वतःहून डोस घेण्यासाठी येत नाहीत. महापालिका प्रशासन आरोग्य यंत्रणेकडून दुसऱ्या डोसची आठवण देण्यात येते. लसींच्या डोस अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येत आहे.

लसीकरण केंद्र वाढवावे लागणारकेंद्र शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य यंत्रणेला लसीकरण केंद्र वाढवावे लागणार आहेत. लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कर्मचारी आणावेत कोठून असा प्रश्न पडला आहे.

१८,८६,२८४ -मतदार जिल्ह्यातील८,००,००० -१८ ते ४५ वयोगटातील लोकसंख्या९,९२,८५३ - पुरुष मतदार८,८२,२५८ - महिला मतदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद