शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

वाळूज उद्योगनगरीतील ८३२ कारखानदारांकडे ८ कोटींचा कर थकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:17 IST

वाळूज महानगर : रांजणगाव ग्रामपंचायतीचा ८३२ कारखान्यांकडे ८ कोटीचा कर थकीत असून, आतापर्यंत केवळ १२६ कारखानदारांनी जवळपास ३ कोटी रुपयाचा कर भरला आहे. थकीत कराचा भरणा करण्यासाठी कारखानदार टाळाटाळ करीत असल्याने ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले असून, विकास कामे रखडल्याचा आरोप केला जात आहे.

वाळूज महानगर : रांजणगाव ग्रामपंचायतीचा ८३२ कारखान्यांकडे ८ कोटीचा कर थकीत असून, आतापर्यंत केवळ १२६ कारखानदारांनी जवळपास ३ कोटी रुपयाचा कर भरला आहे. थकीत कराचा भरणा करण्यासाठी कारखानदार टाळाटाळ करीत असल्याने ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले असून, विकास कामे रखडल्याचा आरोप केला जात आहे.

वाळूज उद्योगनगरीतील अर्थिकदृष्टया संपन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात लहान-मोठे ९५८ कारखाने आहेत. चालु अर्थिक वर्षात या कारखान्याकडे ९ कोटी ८८ लाख ३ हजार ३ रुपयांचा कर थकीत आहे. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया १२६ कारखान्यांनी नोव्हेंबर अखेरपर्यंत २ कोटी ८७ लाख १ हजार ७०० रुपयाचा कर ग्रामपंचायतीकडे भरला आहे.

ग्रामपंचायतीने उर्वरित संबंधित कारखानदारांना कराचा भरणा करण्यासाठी वेळोवेळी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, बहुतांश कारखानदार कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने या ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले आहे. परिमाणी गावातील विकास कामे रखडली असून, गावातील नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायत पदाधिकाºयांना सामारे जावे लागत आहे. उद्योनगरीत रोजगारांची संधी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या विविध भागांतून आलेले कामगार गावात स्थायिक झाले आहेत. या कामगारामुळे गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायत प्रशासनाची दमछाक होत आहे.

शासनाच्या विविध योजना तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून मिळणारा निधी लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असल्यामुळे गावातील विकास कामांना ब्रेक लागत आहे. किमान नागरी सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असून, पुरेशा निधीअभावी गावातील विकास कामे रखडली आहेत.

विकास कामांवर होतोय परिणामग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया ९५८ पैकी ८३२ कारखान्यांनी ग्रामपंचायतीचा ७ कोटी ७९ लाख ३१ हजार ८३५ रुपयाचा कर थकविला आहे. शासन नियमानुसार कर आकारणी करुनही कारखानदार टाळाटाळ करीत असल्याने थकबाक वाढतच आहे. परिणामी गावातील विविध विकास कामांवरही विपरीत परिणाम होत आहे.

जप्तीची मोहिम राबविणारग्रामपंचायतीचा थकीत कर भरण्यास कारखानदार टाळाटाळ करीत असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने जप्तीची मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात थकबाकीदार कारखानदारांना नोटीसा बजावून कराचा भरणा लवकर न केल्यास पोलिस बंदोबस्तात जप्तीची मोहिम राबवून कारखान्याची यंत्र सामुग्री जप्त केली जाणार असल्याची माहिती प्रभारी सरपंच मोहनीराज धनवटे, ग्रामविकास अधिकारी एस.एन.रोहकले यांनी दिली.--------------------------------------

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद