शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाळूज उद्योगनगरीतील ८३२ कारखानदारांकडे ८ कोटींचा कर थकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:17 IST

वाळूज महानगर : रांजणगाव ग्रामपंचायतीचा ८३२ कारखान्यांकडे ८ कोटीचा कर थकीत असून, आतापर्यंत केवळ १२६ कारखानदारांनी जवळपास ३ कोटी रुपयाचा कर भरला आहे. थकीत कराचा भरणा करण्यासाठी कारखानदार टाळाटाळ करीत असल्याने ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले असून, विकास कामे रखडल्याचा आरोप केला जात आहे.

वाळूज महानगर : रांजणगाव ग्रामपंचायतीचा ८३२ कारखान्यांकडे ८ कोटीचा कर थकीत असून, आतापर्यंत केवळ १२६ कारखानदारांनी जवळपास ३ कोटी रुपयाचा कर भरला आहे. थकीत कराचा भरणा करण्यासाठी कारखानदार टाळाटाळ करीत असल्याने ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले असून, विकास कामे रखडल्याचा आरोप केला जात आहे.

वाळूज उद्योगनगरीतील अर्थिकदृष्टया संपन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात लहान-मोठे ९५८ कारखाने आहेत. चालु अर्थिक वर्षात या कारखान्याकडे ९ कोटी ८८ लाख ३ हजार ३ रुपयांचा कर थकीत आहे. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया १२६ कारखान्यांनी नोव्हेंबर अखेरपर्यंत २ कोटी ८७ लाख १ हजार ७०० रुपयाचा कर ग्रामपंचायतीकडे भरला आहे.

ग्रामपंचायतीने उर्वरित संबंधित कारखानदारांना कराचा भरणा करण्यासाठी वेळोवेळी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, बहुतांश कारखानदार कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने या ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले आहे. परिमाणी गावातील विकास कामे रखडली असून, गावातील नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायत पदाधिकाºयांना सामारे जावे लागत आहे. उद्योनगरीत रोजगारांची संधी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या विविध भागांतून आलेले कामगार गावात स्थायिक झाले आहेत. या कामगारामुळे गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायत प्रशासनाची दमछाक होत आहे.

शासनाच्या विविध योजना तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून मिळणारा निधी लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असल्यामुळे गावातील विकास कामांना ब्रेक लागत आहे. किमान नागरी सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असून, पुरेशा निधीअभावी गावातील विकास कामे रखडली आहेत.

विकास कामांवर होतोय परिणामग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया ९५८ पैकी ८३२ कारखान्यांनी ग्रामपंचायतीचा ७ कोटी ७९ लाख ३१ हजार ८३५ रुपयाचा कर थकविला आहे. शासन नियमानुसार कर आकारणी करुनही कारखानदार टाळाटाळ करीत असल्याने थकबाक वाढतच आहे. परिणामी गावातील विविध विकास कामांवरही विपरीत परिणाम होत आहे.

जप्तीची मोहिम राबविणारग्रामपंचायतीचा थकीत कर भरण्यास कारखानदार टाळाटाळ करीत असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने जप्तीची मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात थकबाकीदार कारखानदारांना नोटीसा बजावून कराचा भरणा लवकर न केल्यास पोलिस बंदोबस्तात जप्तीची मोहिम राबवून कारखान्याची यंत्र सामुग्री जप्त केली जाणार असल्याची माहिती प्रभारी सरपंच मोहनीराज धनवटे, ग्रामविकास अधिकारी एस.एन.रोहकले यांनी दिली.--------------------------------------

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद